By : Polticalface Team ,08-01-2023
याबाबत दादासाहेब राजाराम जावळे (वय ४२, रा.गुंडेगाव, ता.नगर) यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.६) फिर्याद दिली आहे. फिर्यादी जावळे यांनी गावच्या महिला सरपंच मंगल संतोष सकट यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी ग्रामपंचायतच्या जागेत अतिक्रमण करत घर बांधले असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व साक्षी पुरावे पाहून महिला सरपंच मंगल सकट यांचे सरपंचपद रद्द केलेले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयाविरोधात सकट यांनी नाशिक विभागीय आयुक्तांकडे अपील केलेले आहे. या पार्श्वभूमीवर तक्रारदार जावळे हे गुरुवारी (दि.५) सकाळी १० च्या सुमारास घरासमोर बसलेले असताना सरपंच पती संतोष लिंबाजी सकट हे तेथे गेले व त्यांनी तक्रार केल्याचा राग मनात धरून जावळे यांना शिवीगाळ केली. तसेच नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयाकडे फिरकल्यास तलवारीने हात पाय तोडण्याची व कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे जावळे यांनी फिर्यादीत म्हंटले आहे. आता या गंभीर विषयीं नगर तालुका पोलिस काय भुमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणारा आहे. बातमी स्रोत : पोलीस फिर्याद वाचक क्रमांक :