यवत ग्रामपंचायतीची विषेश ग्रामसभा स्थकुप, तर ओढ्यातील दुषित पाणी दुर्गंधीने नागरिक त्रस्त, ओढा बंदीस्त करण्याची होतेय मागणी

By : Polticalface Team ,16-01-2023

यवत ग्रामपंचायतीची विषेश ग्रामसभा स्थकुप, तर ओढ्यातील दुषित पाणी दुर्गंधीने नागरिक त्रस्त, ओढा बंदीस्त करण्याची होतेय मागणी दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड ता १६ जानेवारी २०२३, दौंड तालुक्यातील मौजे यवत ता दौंड जिल्हा पुणे येथील पालखी स्थळ या ठिकाणी निषेध ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती, मात्र कोरम अभावी, सरपंच समीर दोरगे यांच्या आदेशानुसार ग्रामसभा स्थकुप करण्यात आली, अजिंठा वरील विविध विषया संदर्भात कोणतीही चर्चा होऊ शकली नाही, या वेळी उपसरपंच सुभाष यादव, सदस्य व माजी उपसरपंच नाथदेव दोरगे, सदस्य इब्रानभाई तांबोळी, गौरव दोरगे, व इतर अनेक महिला सदस्य, तसेच ग्राम विकास अधिकारी बबन चखाले, आणि काही ग्रामस्थ उपस्थित होते. यवत गावठाणातील महत्वाचा चर्चेत असलेला विषय, गावठाणातील ओढ्यात दुषित पाण्याचा प्रादुर्भाव वाढल्याने व दुर्गंधीने नागरिक त्रस्त या बाबत विषश ग्रामसभेत चर्चा होणे अपेक्षित होते, हजरत बडेशावली बाबा दर्गा, ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिराच्या मागे बाजार मैदानातुन मशानभुमी पर्यंत ओढ्यातील सांड पाणी व मैल दुषित पाण्याचा निचरा थांबला आहे, त्यामुळे या परीसरातील धार्मिक स्थळावर आलेल्या भाविकांनी नाराजी व्यक्त केली, या संदर्भात यवत ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी बबन चखाले यांना विचारले असता, म्हणाले काही दिवसात या सर्व समस्याचे निराकरण होईल, मैल निर्मूलन प्रक्रिया प्रोजेक्टसाठी निधी उपलब्ध झाला असुन लवकरच काम हाती घेतले जाईल अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली, ग्रामपंचायत विद्यमान सदस्य व माजी उपसरपंच, सदानंद दोरगे, बोलताना म्हणाले गावातील ओढ्यात सर्वच नागरिक शौचालयाचे दूषित पाणी सोडत आहेत कॅनल पासून ते स्मशानभूमी पर्यंत ओढा बंदीस्त करण्याची आवश्यकता असल्याचे सांगत, गावातील विविध भागातुन सांड पाणी व शौचालयाचे दूषित पाणी ओढ्यामध्ये सोडले जात आहे, गावठाणातील ओढ्या बंदोबस्त बांधकाम करण्याची मागणी सदानंद दोरगे यांनी केली आहे.

आनंद ग्राम ग्रह सोसायटी व साव्हिल ग्रह सोसायटीच्या संचालक मंडळाने त्यांच्या मर्यादित मैल निर्मूलन प्रक्रिया करून दूषित ड्रेनेज लाईन करून सांडपाण्याची ओढ्यात सोडावे अशी नागरिकांमध्ये चर्चा होत आहे, पुर्वी कॅनोलचे पाणी गळती व पाझर होता त्यामुळे ओढ्याचे पाणी वाहून जात असे, मात्र काही दिवसांपूर्वी कालव्यातील सिमेंट काँक्रेट अस्तरीकरण झाल्याने पाण्याची गळती बंद झाली असल्याने ओढ्याचे पाणी वाहने थांबले आहे, त्यामुळे सांड पाणी व मैल दुषित पाण्याचा निचरा थांबला आहे, अशी प्रतिक्रिया विद्यमान सदस्य व माजी उपसरपंच नाथदेव दोरगे यांनी व्यक्त केली आहे, यवत गावातील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ यात्रा काही दिवसात होणार आहे, यात्रेला आलेल्या पै पाहुणे यांनी यात्रेचा आनंद घ्यायचा की ओढ्यातील दुर्गंधीचा आदर्श, ? असा सवाल गावातील ग्रामस्थ महादेव दोरगे यांनी उपस्थित केला आहे, आनंदग्राम ग्रह सोसायटीचे ड्रेनेज पाईपलाईन ओढ्यात सोडण्यात आले असल्याचे आनंदग्राम गृह सोसायटीचे सचिव अँड सोळंकी,व संचालक डॉ, संतोष बडेकर यांनी सांगितले, यवत गावातील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ व महालक्ष्मी यात्रेच्या निमित्ताने पंचक्रोशीतील नागरिकांची मोठी गर्दी होत असते.

यात्रेतील आकर्षित मनोरंजन म्हणजे लोकनाट्य तमाशा आकर्षित उंच पाळणे, पन्नालाल झूठ ना बोले, मौत का कुवा, विविध प्रकारचे आकर्षित बाजार पेठ या ओढ्याच्या लगत पूर्वीपासून होत आहेत, कॅनलच्या अस्तरीकरणामुळे पाण्याची गळती बंद झाली असल्याने ओढ्याचे वाहते सांड व दुषित पाण्याचे ठिक ठिकाणी ढव साठले असल्याने परीसरात दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे, त्यामुळे गावातील व मंदिर परिसरातील भाविक व नागरिक या दुर्गंधीने त्रस्त झाले आहेत, यवत ग्रामपंचायतीचे या संदर्भात दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे, गावातील ओढ्याची स्वच्छता सुरू करण्यात यावी अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

यवत गावठाणातील हजरत बडेशावली बाबा दर्गा,पुणे सोलापूर महामार्गा खालुन श्री भैरवनाथ मंदिर ते मशानभुमी पर्यंत ओढ्यातील स्वच्छता ग्रामपंचायतीने तत्काळ करावी, व मैल निर्मूलन प्रक्रिया बाबत तत्काळ निर्णय घेण्यात यावा अशी नागरिकांकडून मागणी करण्यात आली आहे.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी