ग्रामीण विकास केंद्र निवारा बालगृहाचे संस्थापक अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते ॲड. डॉ अरुण जाधव यांना गंगाई-बाबाजी आदर्श सामाजिक पुरस्कार प्रदान.

By : Polticalface Team ,23-01-2023

ग्रामीण विकास केंद्र निवारा बालगृहाचे संस्थापक अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते ॲड. डॉ अरुण जाधव यांना गंगाई-बाबाजी आदर्श सामाजिक पुरस्कार प्रदान. करमाळा(प्रतिनिधी) अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60:- ग्रामीण विकास केंद्र, निवारा बालगृहाचे संस्थापक अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते ॲड. डॉ. अरुण जाधव यांना गंगाई - बाबाजी आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार सूप्रसिद्ध सिने अभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, शाल, पुष्पहार असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

गंगाई-बाबाजी सांस्कृतिक महोत्सवाचे स्वागताध्यक्ष तथा शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष माजी आ. भिमराव धोंडे यांच्या अध्यक्षतेखाली आष्टी येथील भगवान महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित गंगाई-बाबाजी महोत्सवात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर सौ. दमयंती ताई धोंडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ. अजय दादा धोंडे, पाटोदा पंचायत समिततीच्या सभापती सौ. सुवर्णा ताई लांबरुट, ज्येष्ठ संचालक विठ्ठल अण्णा बनसोडे, प्राचार्य डॉ. दत्तात्रय वाघ, ह. भ. प.आंधळे महाराज आदी मान्यवर उपस्थित होते.

ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी ग्रामीण विकास केंद्र या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून ७ वर्षांपूर्वी जामखेड येथे अनाथ, निराधार, वंचित, गोर गरीब, भटके विमुक्त, आदिवासी, ऊसतोडणी कामगार, विट भट्टी कामगार, व लोक कलावंतांच्या मुलां मुलींसाठी निवारा बालगृहाची स्थापना केली. सध्या जामखेड पासून ७ किमी अंतरावर मोहा फाटा येथील समता भूमीवर २ मजली इमारती मध्ये निवारा बालगृह चालविले जाते. सध्या तेथे पहिली ते दहावी पर्यंत शिकणारी ७० मुले मुली निवासी शिक्षण घेत आहेत. देणगी, लोक वर्गणी, वस्तुरुपी व आर्थिक स्वरूपातील मदतीतून निवारा बाल गृह चालविले जाते. या बालगृहास महिला व बाल कल्याण विभागाची मान्यता असून त्याला कुठलेही शासकीय अनुदान मिळत नाही. तर समाजातील दानशूर व्यक्ती व काही कंपन्यांच्या मदतीतून हे बालगृह चालविले जाते.

ग्रामीण विकास केंद्र या संस्थेच्या वतीने समता भूमीवर सध्या विधवा, परित्यक्ता, व एकल महिलांसाठी माय लेकरू हा महाराष्ट्रातील पहिलाच प्रकल्प अकराला येत आहे. संस्थेच्या वतीने मुंबईतील कोरो या संस्थेच्या सहकार्यातून आदिवासी व भटके विमुक्त महिला सक्षमीकरण, सबलीकरण उपक्रम राबविला जातो त्याच बरोबर महिला तक्रार निवारण केंद्र देखील चालवले जाते. जामखेड, कर्जत व श्रीगोंदा या ३ तालुक्यात हा प्रकल्प चालू असून संस्थेने गेल्या २५ वर्षांत आदिवासी व भटके विमुक्तांसाठी उल्लेखनीय सामाजिक कार्य केले आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी