यवत ग्रामसभेचा कोरम महिलांमुळे पूर्ण, शासकीय अधिकारी सह अनेक सदस्य गैरहजर, मुख्य चौकात वाहतुक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर
By : Polticalface Team ,27-01-2023
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड ता,२६ जानेवारी,२०२३ यवत ता दौंड जिल्हा पुणे येथील ग्रामपंचायत ग्रामसभेला पुरुषांपेक्षा महिलांनी अधिक उपस्थिती दर्शवली होती.
संत तुकाराम महाराज पालखी स्थळ येथे ग्रामसभेचे आयोजित करण्यात आली होते, या पूर्वी अधिक ग्रामसभा कोरम अभावी तहकूब झाल्या आहेत.
यवत गावातील पुरुषांपेक्षा महिलांनीअधिक उपस्थिती ग्रामसभेला दर्शवली असल्याने ग्रामसभेचा कोरम पूर्ण झाला, यवत गावातील तलाठी मंडल अधिकारी सह अनेक सदस्य ग्रामसभेला गैरहजर दिसुन आले, सरपंच समीर दोरगे यांच्या आदेशानुसार ग्रामविकास अधिकारी बबन चखाले यांनी ग्रामसभेतील वृत्तांत वाचून दाखवले, त्यामध्ये प्रामुख्याने रमाई घरकुल योजनेअंतर्गत मंजुरी मिळालेल्या लाभार्थीनी अद्याप घरकुल बांधकाम सुरू केले नाही, लाभार्थ्यांनी तत्काळ घरकुल बांधकाम सुरू करावे, तसेच काही लाभार्थी यांचे आर्थिक तजबीज नसल्याने व जागा उपलब्ध नसल्याने लाभार्थींनी जागा खरेदी केल्यास शासकीय मदतीचा हातभार होऊ शकतो, याची तत्काळ दखल घ्यावी, असे आश्वासन ग्रामविकास अधिकारी यांनी दिले, ऐनवेळी विषयावर ग्रामस्थांनी व महिलांनी विविध सार्वजनिक प्रश्न उपस्थित केले, शासकीय योजनांची माहिती मिळावी त्यामध्ये प्रामुख्याने संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जेष्ठ नागरिक निराधार, व्यक्तींना मासिक अनुदान मिळण्या बाबत प्रस्ताविक अर्ज संदर्भात सहकार्य करावे, ग्रामपंचायत कार्यालय तलाठी कार्यालयात चकरा मारायला लावू नये, तसेच दिव्यांग नागरिकांना ग्रामपंचायत पाच टक्के वार्षिक अनुदान वेळेत मिळत नाही, ते तत्काळ मिळावे, अशी प्रतिक्रिया दिव्यांग जेष्ठ नागरिक गोपाळराव माळवदकर यांनी व्यक्त केली, सरपंच समीर दोरगे यांनी सदर विषयाचे खंडन करुन, ग्रामपंचायत कर थकबाकीदार असताना देखील दिव्यांग ज्येष्ठ नागरिक यांच्या परिस्थितीची जाणीव ठेवून मागील वर्षी अनुदान देण्यात आले, तसेच गावातील काही दिव्यांग व्यक्ती आर्थिक सबळ सक्षम असून देखील शासनाचे अनुदान घेत आहेत, परंतु कर थककरबाकी भरण्या बाबत सकारात्मक भुमिका घेतली जात नाही या संदर्भात सरपंच समीर दोरगे यांनी शोकांतिका व्यक्त करुन मार्च अखेर पर्यंत दिव्यांग जेष्ठ नागरिकांच्या परिस्थितीची दखल घेऊन अनुदान देण्याची व्यवस्था केली जाईल, असे आश्वासन सरपंच यांनी दिले, या वेळी नागरिक व महिलांनी यवत गावातील विविध मागण्यांचे अर्ज सरपंच व ग्रामविकास अधिकारी चखाले यांना देण्यात आले, या मध्ये मुख्य बाजारपेठेत श्री काळभैरवनाथ मंदिर समोर वाहतूक कोंडीचा प्रश्न उपस्थित केला आहे, या संदर्भात समस्त ग्रामस्थ नागरिकांनी अर्ज दिला आहे, मानकोबा वाडा येथील अधिक आकारलेली पाणीपट्टी कमी करण्या बाबत, मल्हारी नातू बिचकुले यांनी अर्ज दिला आहे, गाव कोंडवळा बाजुला वसुंधरा दुकानदार यांनी झाड तोडून अतिक्रमण केले बाबत, दत्तात्रय कुल यांनी अर्ज दिला आहे या संबंधित विषयाच्या अनुषंगाने तत्काळ पाहणी करून दखल घेतली जाईल असे आश्वासन सरपंच यांनी उपस्थित महिला व नागरिकांना दिली, अनेक महिन्यापासून ग्रामसभा कोरम अभावी तहकुब होत आहे, मात्र महिलांच्या उपस्थितीमुळे ही ग्रामसभा सुरुळीत पार पाडली, शासकीय नियमानुसार ग्रामसभेत स्थानिक शासकीय अधिकारी व सदस्य उपस्थित राहणे बंधनकारक असताना देखील काही ग्रामपंचायत सदस्य व स्थानिक शासकीय अधिकारी जाणिवपूर्वक
गैरहजर असल्याचे दिसून आले,
शासकीय पदाधिकारीच ग्रामसभेत उपस्थित राहत नसल्याने ग्रामसभा वेळोवेळी तहकूब झाल्या आहेत,
सर्वसामान्य नागरिकांनी शासकीय कार्यालयात पायपीट करावी लागते.
नागरिकांनी आपल्या समस्या कुणापुढे मांडाव्यात असा सवाल उपस्थित महिला व नागरिकांनी केला आहे,
या संदर्भात वरिष्ठ अधिकारी दौंड तहसीलदार व गटविकास अधिकारी दखल घेतील का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे, ग्रामपंचायत उपसरपंच सुभाष यादव, सदस्य नाथदेव दोरगे, इम्रान भाई तांबोळी, गौरव दोरगे, मंदाकिनी कुदळे, शितल दोरगे, जिजाऊ ब्रिगेड महिला अध्यक्षा सौ सारिका भुजबळ, बाईजाबाई पवार आशा स्वयंसेविका अंगणवाडी सेविका, विविध महिला बचत गट, आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी