एखाद्यानं(BBC) आपल्या विरोधात बातम्या लावल्या म्हणून त्या प्रसारमाध्यमावर धाड टाकणे हे कोणत्या लोकशाहीत बसते?
By : Polticalface Team ,15-02-2023
मुंबई : बीबीसी कार्यालयावर (BBC offices) आयकर विभागाने (Income Tax Department) छापेमारीवरून शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मोदी सरकारवर (Modi Govt) जोरदार हल्लाबोल केला आहे. बीबीसीच्या कार्यालयावर धाड टाकणं हे कोणत्या लोकशाहीमध्ये बसतं? असे प्रकार वेळीच रोखले नाही तर देशात हुकुमशाही येण्यास वेळ लागणार नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी बीबीसीवरील कारवाईचा निषेध व्यक्त करत मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे.
मागील काही दिवसांपासून बीबीसीने प्रदर्शित केलेल्या इंडिया- द मोदी क्वेश्चन या माहितपटाची चांगलीच चर्चा होत आहे. या माहितीपटातून गोध्रा हत्यांकाडादरम्यान, गुरजातचे तत्कालीन सीएम नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. त्यामुळे या माहितीपटावर बंदी आणावी अशी मागणी केली जात आहे. अशातच बीबीसी कार्यालयावर आज आयकर विभागाने धाड टाकली. त्यामुळे राजकीय वर्तुळातून उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. आज मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत रायगड मधील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी बीबीसीच्या कार्यालयावर पडलेल्या धाडीवर देखील भाष्य केले आहे.
यावेळी ठाकरे म्हणाले, लोकशाहीच्या ४ स्तंभात माध्यम हा महत्त्वाचा स्तंभ आहे. बीबीसीच्या कार्यालयावर धाड टाकली. एखाद्यानं आपल्या विरोधात बातम्या लावल्या म्हणून त्या प्रसारमाध्यमावर धाड टाकणे हे कोणत्या लोकशाहीत बसते? सरकारविरोधात बोलाल तर तो आवाज चिरडून टाकला जाईल, अशीच केंद्र सरकारची भूमिका असल्याचंही ठाकरे म्हणाले.
ते म्हणाले, आम्ही वाटेल ते करू पण तुम्ही आवाज उचलायचा नाही. जर आवाज उठवाल तर चिरडून टाकू. ही पाशवी वृत्ती आज आपल्या देशात फोफावायला बघतेय. ही आपण वेळेवर एकत्र आलो नाहीत आणि ताकद वाढवली नाही तर संपूर्ण देश खाऊन टाकेल, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर घणाघात केला आहे.
दरम्यान, गुलामगिरी ती गुलामगिरीच असते मग ती स्वकीयांची असेल परकीयांची असेल. भारत माता पुन्हा माझी गुलाम कशी होईल, या दिशेने त्यांची जी पावलं चालली आहेत ती पावलं वेळेत ओळखून आपल्याला एकत्र यायला पाहिजे, असंही उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले आहे
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी