राष्ट्रवादी आयोजित राज्यव्यापी महाप्रबोधन यात्रेचे बुलढाणा जिल्ह्यात माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्याकडून जोरदार स्वागत

By : Polticalface Team ,21-02-2023

राष्ट्रवादी आयोजित राज्यव्यापी महाप्रबोधन यात्रेचे बुलढाणा जिल्ह्यात माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्याकडून जोरदार स्वागत बुलढाणा : (प्रतिनिधी): आदरणीय खा.पवार साहेबांच्या आदेशाने, प्रदेशाध्यक्ष मा. जयंतराव पाटील साहेब, माजी उपमुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते मा. अजित दादा पवार साहेब तसेच सुप्रिया ताई यांच्या मार्गदर्शनाखाली "राज्यव्यापी महाप्रबोधन यात्रा" सुरू आहे. यात्रा ३६ जिल्ह्यात अंदाजे १२५ ते १५० तालुक्यांमध्ये जाणार असून, प्रत्येक दिवशी किमान २/३ प्रबोधन सभा होतील. यात्रेची सुरूवात आदरणीय अजितदादांच्या शुभहस्ते राष्ट्रवादी पक्षाचा ध्वज दाखवून पुणे येथून १० फेब्रुवारी रोजी १०:१० प्रारंभ करण्यात आला. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील भव्य सैनिक संमेलनास माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे साहेबांनी सैनिकांशी संवाद साधला व अडीअडचणी जाणून घेतल्या. सैनिक हा नेहमीच देशहिताचे काम करतो म्हणून आम्हालाच काय अवघ्या भारत देशाला अभिमान वाटत असल्याचे आमदार शिंगणे साहेबांनी आपले मत व्यक्त केले. लोकशाही निव्वळ नावापुरती राहिली आहे, सरकारच्या विरोधात आपल्याला बोलणे अवघड झाले आहे.घटनात्मक संस्थांचा गैरवापर करून लोकांची तोंडे बंद केली जात आहेत, सध्या कोणालाही निष्पक्ष, निर्भिडपणे बोलण्याचा किंवा विचार मांडण्याचा अधिकार राहिलेला नाही. महापुरुषांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे, छ. शिवराय, शाहू महाराज, फुले, आंबेडकर यांचे विचार पुसण्याचा प्रयत्न केला जात आहे. म्हणून, लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी व बळकटीसाठी महा पुरूषांचे विचार महाराष्ट्रातील तळा गळातील प्रत्येक वर्गापर्यंत पोहचविण्यासाठी रा. कॉ.पार्टी माजी सैनिक सेलच्या माध्यमातून महाप्रबोधन यात्रेची सुरूवात करण्यात झाली. आदरणीय पवार साहेब, 4 वेळा मुख्यमंत्री, केंद्रीय कृषी व केंद्रीय संरक्षण मंत्री असताना जनसामान्यांचे, शेतकरी व सैनिकांचे हित जोपासण्याचे काम केले आणि खऱ्या अर्थाने "जय जवान, जय किसान" चा नारा बुलंद करून न्याय दिला. ज्या राज्यात व देशात जवान व शेतकरी सुखी समाधानी असतो तेच राज्य खऱ्या अर्थाने प्रगती करू शकते किंवा चांगल्या प्रकारे चालते. म्हणून हा विचार करून शेतकरी आणि सैनिकांचे हित आदरणीय पवार साहेबांनी जपण्याचे काम केले असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माजी सैनिक सेल चे प्रदेशाध्यक्ष दिपक गणपतराव शिर्के यांनी व्यक्त केले. आजपर्यंत सैनिकांना राजकारणात स्थान नव्हते, परंतु आदरणीय पवार साहेबांनी सैनिकांना १४ एप्रिल २२ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संलग्न माजी सैनिक सेलची स्थापना करून राजकीय प्रवाहात सामील करून घेत,माजी सैनिकांना राजकारणात संधी दिल्याबद्दल सैनिकांनी आभार व्यक्त केले. *आदरणीय पवार साहेबांनी नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या माध्यमातून खऱ्या अर्थाने छ.शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार जपण्याचे काम केला. राष्ट्रवादी हा पक्ष आदर्श महापुरुषांचे विचार जपणारा असल्याने त्याला आणखी बळकट करण्याच्या हेतूने आम्ही सर्व माजी सैनिक मंडळी काम करत आहोत असे ही राजे शिर्के मत व्यक्त केले. आदरणीय पवार साहेबांचे पुरोगामी, सर्व समावेशक विचार तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी आम्ही महाराष्ट्रातील लाखो सैनिकांना एकत्र करून एकहाती सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. सध्याचे राज्य व केंद्र सरकार सैनिक व शेतकऱ्याची फक्त दिशाभूल करताना दिसत आहेत असे मत पत्रकार परिषदेत व्यक्त केले. यावेळी प्रसिद्ध प्रबोधनकार, राजश्री छ. शाहू महाराज इतिहासकार लेखक ॲड. संभाजी मोहिते, यांनी लोकराजा छ. शाहू महाराज यांचे विचार लोकशाही साठी कसे महत्वाचे आहेत यावर मार्गदर्शन केले. यावेळी माजी मंत्री राजेंद्र शिंगणे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते तथा राष्ट्रवादी माजी सैनिक सेलचे प्रदेशाध्यक्ष दिपक राजे शिर्के, प्रदेश सरचिटणीस बाबासाहेब जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बुलढाणा जिल्हा अध्यक्ष ॲड. नाझिर काझी, सैनिक सेलचे जिल्हाध्यक्ष राजे प्रभाकर देशमुख, तालुकाध्यक्ष जगन्नाथ वाघ, महिला जिल्हाध्यक्ष खेडकर.ताई आदीसह सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी