कर्जत :
अपयशाचे दोर कापून विद्यार्थ्यांनी यशस्वी व्हावे असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्था सातारा ,माजी समन्वय समिती सदस्य श्री.शिवदास आखाडे यांनी केले ते न्यू इंग्लिश स्कूल शिंदे तालुका कर्जत येथील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या शुभचिंतन समारंभ कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष रूपचंद अण्णा घालमे होते. ते पुढे म्हणाले की छत्रपती शिवाजी महात्मा ज्योतिराव फुले कर्मवीर भाऊराव पाटील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इत्यादी महापुरुषांना प्रथमता अपयशच आले होते परंतु त्यांनी त्या अपयशावर कष्ट व जिद्दीने मात केली व ते यशस्वी झाले. याच महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून . प्रत्येक विद्यार्थ्याने आपले पुढील आयुष्य घडवावे .सर्व क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांनी प्राविण्य मिळवावे हीच आई-वडिलांसह गुरुजनांची इच्छा असते ती आपण पूर्ण करावी असेही ते म्हणाले .यावेळी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेसाठी नवीन प्रिंटर खरेदी करण्यासाठी 7600 रुपये रोख रक्कम विद्यालयास देणगी म्हणून दि ली . कार्यक्रमाची सुरुवात रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमा पूजनाने झाली झाली.सर्व सेवकांचा इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांनी सन्मान केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री गोसावी एम व्हि याणी केले .ज्येष्ठ शिक्षक श्री तोरडमल व्हि .वाय वर्गशिक्षक श्री थोरात डी. ए. व घालमे स्नेहल ,घालमे अश्विनी ,घालमे साक्षी ,शिंदे सानिया कांबळे गौरव, इत्यादी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले .कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुद्रिक धनश्री ,घालमे भाग्यश्री यांनी केले आभार घालमे श्रावणी हिने मांडले
वाचक क्रमांक :