उज्वल भविष्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणा सकारात्मक विचार आत्मविश्वास आणि मेहनत अंगी बाळगावी जिल्हा न्यायाधीश मुजीब शेख
                      
                
            
               By : Polticalface Team ,24-02-2023
       
               
                           
                      लिंपणगाव (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षण घेत असताना आपल्या उज्वल भविष्यासाठी प्रामाणिकपणा, सकारात्मक विचार, आत्मविश्वास व मेहनत अंगी बाळगावी, असे प्रतिपादन जिल्हा सत्र न्यायाधीश मुजीब शेख यांनी व्यक्त केले आहे.
       श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुद्रिक येथील डॉ राजेंद्र प्रसाद विद्यालयाच्या सन 2022- 23 या शैक्षणिक वर्षातील बॅचचा निरोप समारंभ व पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती अलकाताई दरेकर या होत्या.
      यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना न्यायाधीश श्री शेख पुढे म्हणाले की, शिक्षण घेत असताना मुलांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन होणे काळाची गरज आहे. नकळत शिक्षण घेत असताना मुलांकडून मुलांकडे पाहताना नकारात्मक बाबी समोर येतात. हा गुन्हा होऊ शकतो. शिक्षण पूर्ण होईपर्यंत विद्यार्थ्यांकडून कुठल्याही प्रकारचे गुन्ह्याची नोंद होऊ नये. अन्यथा त्याचा नोकरी मिळवताना मोठा अडथळा निर्माण होतो. असे सांगून ते पुढे म्हणाले की, शिक्षण घेत असताना आई-वडिलांकडून मुलांच्या मोठ्या अपेक्षा असतात. मुलींच्या बाबत सोळावे वर्ष धोक्याचे हे खरे आहे. चांगल्या किंवा वाईट मार्गाला जायचे असेल तर गेलेली वेळ सुटेल मात्र बाण माघारी घेता येत नाही. वेळ व प्रवाह हे जीवनात महत्त्वाचे आहेत. आयुष्यामध्ये चांगले व्यक्ती बनण्यासाठी प्रामाणिकपणे वाटचाल केली पाहिजे. असे सांगून ते आणखी पुढे म्हणाले की, विद्यार्थी दशत आई-वडिलांना सुख देत नसाल तर मात्र दुःख देऊ नका. ध्येय निश्चित करण्यासाठी योग्य मार्ग निवडावा. असे सांगून पुढील करिअर कामी विद्यार्थ्यांना न्या. शेख यांनी भरभरून शुभेच्छा व्यक्त केल्या.
            यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना श्रीगोंद्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यावेळी म्हणाले की, विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात शिस्त पाळावी, भरपूर अभ्यास करून आपले करिअर वाढवावे. शिक्षणामध्ये सर्व संधी मिळतात. मात्र शिक्षणाकडे दुर्लक्ष होता कामा नये. चांगले शिक्षण घेऊन डिगऱ्या मिळवा, मोठे व्हा, कौशल्य वाढवा. निश्चितच जीवनाचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही, असे सांगून उपस्थित विद्यार्थ्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या.
               अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापिका श्रीमती अलका दरेकर म्हणाल्या की, ग्रामीण भागातील विद्यार्थी उच्चशिक्षित झाला पाहिजे हा दृष्टिकोन सहकार महर्षी आदरणीय शिवाजीराव नागवडे बापूंनी डोळ्यासमोर ठेवून त्यांनी खेडोपाडी ज्ञानाची गंगोत्री उभ्या केल्या. त्यामुळे ग्रामीण मुला-मुलींना माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण आपल्या गावामध्येच मिळाले. हे आपले सर्वांचे भाग्य आहे. असे सांगून त्यांनी विद्यालयाच्या  कार्याचा स्थापनेपासून ते आतापर्यंतचा चढता आलेख विशेद करत, विद्यालयाच्या जडणघडणीत गावच्या ग्रामस्थांचाही मोठा सहभाग लाभत असल्याचे सांगून विद्यार्थ्यांना पुढील उज्वल आयुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
         यावेळी विद्यालयाचे विद्यार्थी कार्तिक जगताप, कुमारी प्रतीक्षा गायकवाड, आधी विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना आलेले अनुभव कथन केले. यावेळी अशोकराव आळेकर, शशिकांत एरंडे, शहाजी हिरवे खामकर सर आदींची मार्गदर्शनपर भाषणे झाली.
         या कार्यक्रमास नागवडे कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब जगताप, प्रगतशील बागायतदार दीपक तारकुंडे, ग्रामपंचायत सदस्य मंगेश घोडके, माजी सभापती शहाजी हिरवे, शिवाजीराव ननवरे, संभाजी जगताप, शशिकांत एरंडे, छबुराव इथापे, खंडू आरू, रोहिदास सांगळे, सुभाष होले, श्रीमती जावळे पत्रकार दत्ताजी जगताप नंदकुमार कुरुमकर आदी- सह विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी  उपस्थित होते. प्रस्ताविक उपशिक्षक मच्छिंद्र मडके यांनी केले. सूत्रसंचालन व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत अशोकराव आळेकर यांनी केले. आभार उपशिक्षक पांडुरंग बोडखे यांनी मानले.
              
              
वाचक क्रमांक :
                                    
                                    
                                                                   
                                                              
                                                              
                                    
                                        
                                          
                            
              							
							
							
							प्रकाश म्हस्के 
							संपादक 							
 
							
              
                
 
                
                
             		  	 							  
  स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
      
   
														  
  भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती  
  							  
  श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
  							  
  भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
      
   
														  
  भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
  							  
  कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात. 
  							  
  कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न 
      
   
														  
  त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी 
  							  
  श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला  भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
  							  
  दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
      
   
														  
  निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
  							  
  बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. 
  							  
  लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना. 
      
   
														  
  पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे 
  							  
  पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट 
  							  
  दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
      
   
														  
  लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
  							  
  दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई 
  							  
  श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
      
   
														  
  श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष