उज्वल भविष्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणा सकारात्मक विचार आत्मविश्वास आणि मेहनत अंगी बाळगावी जिल्हा न्यायाधीश मुजीब शेख
By : Polticalface Team ,24-02-2023
लिंपणगाव (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षण घेत असताना आपल्या उज्वल भविष्यासाठी प्रामाणिकपणा, सकारात्मक विचार, आत्मविश्वास व मेहनत अंगी बाळगावी, असे प्रतिपादन जिल्हा सत्र न्यायाधीश मुजीब शेख यांनी व्यक्त केले आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुद्रिक येथील डॉ राजेंद्र प्रसाद विद्यालयाच्या सन 2022- 23 या शैक्षणिक वर्षातील बॅचचा निरोप समारंभ व पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती अलकाताई दरेकर या होत्या.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना न्यायाधीश श्री शेख पुढे म्हणाले की, शिक्षण घेत असताना मुलांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन होणे काळाची गरज आहे. नकळत शिक्षण घेत असताना मुलांकडून मुलांकडे पाहताना नकारात्मक बाबी समोर येतात. हा गुन्हा होऊ शकतो. शिक्षण पूर्ण होईपर्यंत विद्यार्थ्यांकडून कुठल्याही प्रकारचे गुन्ह्याची नोंद होऊ नये. अन्यथा त्याचा नोकरी मिळवताना मोठा अडथळा निर्माण होतो. असे सांगून ते पुढे म्हणाले की, शिक्षण घेत असताना आई-वडिलांकडून मुलांच्या मोठ्या अपेक्षा असतात. मुलींच्या बाबत सोळावे वर्ष धोक्याचे हे खरे आहे. चांगल्या किंवा वाईट मार्गाला जायचे असेल तर गेलेली वेळ सुटेल मात्र बाण माघारी घेता येत नाही. वेळ व प्रवाह हे जीवनात महत्त्वाचे आहेत. आयुष्यामध्ये चांगले व्यक्ती बनण्यासाठी प्रामाणिकपणे वाटचाल केली पाहिजे. असे सांगून ते आणखी पुढे म्हणाले की, विद्यार्थी दशत आई-वडिलांना सुख देत नसाल तर मात्र दुःख देऊ नका. ध्येय निश्चित करण्यासाठी योग्य मार्ग निवडावा. असे सांगून पुढील करिअर कामी विद्यार्थ्यांना न्या. शेख यांनी भरभरून शुभेच्छा व्यक्त केल्या.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना श्रीगोंद्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यावेळी म्हणाले की, विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात शिस्त पाळावी, भरपूर अभ्यास करून आपले करिअर वाढवावे. शिक्षणामध्ये सर्व संधी मिळतात. मात्र शिक्षणाकडे दुर्लक्ष होता कामा नये. चांगले शिक्षण घेऊन डिगऱ्या मिळवा, मोठे व्हा, कौशल्य वाढवा. निश्चितच जीवनाचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही, असे सांगून उपस्थित विद्यार्थ्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या.
अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापिका श्रीमती अलका दरेकर म्हणाल्या की, ग्रामीण भागातील विद्यार्थी उच्चशिक्षित झाला पाहिजे हा दृष्टिकोन सहकार महर्षी आदरणीय शिवाजीराव नागवडे बापूंनी डोळ्यासमोर ठेवून त्यांनी खेडोपाडी ज्ञानाची गंगोत्री उभ्या केल्या. त्यामुळे ग्रामीण मुला-मुलींना माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण आपल्या गावामध्येच मिळाले. हे आपले सर्वांचे भाग्य आहे. असे सांगून त्यांनी विद्यालयाच्या कार्याचा स्थापनेपासून ते आतापर्यंतचा चढता आलेख विशेद करत, विद्यालयाच्या जडणघडणीत गावच्या ग्रामस्थांचाही मोठा सहभाग लाभत असल्याचे सांगून विद्यार्थ्यांना पुढील उज्वल आयुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
यावेळी विद्यालयाचे विद्यार्थी कार्तिक जगताप, कुमारी प्रतीक्षा गायकवाड, आधी विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना आलेले अनुभव कथन केले. यावेळी अशोकराव आळेकर, शशिकांत एरंडे, शहाजी हिरवे खामकर सर आदींची मार्गदर्शनपर भाषणे झाली.
या कार्यक्रमास नागवडे कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब जगताप, प्रगतशील बागायतदार दीपक तारकुंडे, ग्रामपंचायत सदस्य मंगेश घोडके, माजी सभापती शहाजी हिरवे, शिवाजीराव ननवरे, संभाजी जगताप, शशिकांत एरंडे, छबुराव इथापे, खंडू आरू, रोहिदास सांगळे, सुभाष होले, श्रीमती जावळे पत्रकार दत्ताजी जगताप नंदकुमार कुरुमकर आदी- सह विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रस्ताविक उपशिक्षक मच्छिंद्र मडके यांनी केले. सूत्रसंचालन व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत अशोकराव आळेकर यांनी केले. आभार उपशिक्षक पांडुरंग बोडखे यांनी मानले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी