राज्य अन्न आयोगाच्या तज्ञ समितीवर शेतकरी नेते अनिल घनवट यांची निवड

By : Polticalface Team ,04-03-2023

राज्य अन्न आयोगाच्या तज्ञ समितीवर शेतकरी नेते अनिल घनवट यांची निवड लिंपणगाव( प्रतिनिधी) - राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत लाभार्थ्यांना वितरीत करण्यात येणाऱ्या जिवनावश्या वस्तूंच्या खरेदी, वितरण आदिंवर होणाऱ्या शासनाच्या परिणामी करदात्यांच्या पैशांचा अपव्यय कमी करण्यासाठी व उत्पादकांना व ग्राहकांना किफायतशीर किंमती मिळण्यासाठी राज्य अन्न आयोगाने गठीत केलेल्या समितीवर शेतकरी संघटनेचे नेते तथा स्वतंत्र भारत पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांची निवड झाली असून त्याचे शेतकरी संघटनेच्या वतिने अभिनंदन करण्यात आले. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याने राज्य अन्न आयोगा दिलेल्या अधीकाराचा वापर करुन जिथे पिकेल, तिथेच विकेल या धर्तीवर स्थानिक पातळीवर शेतकरी बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्या, ग्रामपंचायत किंवा शेतकरी यांच्याकडून अन्न धान्य पुरवठा संकलन करावे.या आशयाची मागणी श्री.किशोर श्रीधर देशपांडे यांनी अन्नसुरक्षा कायदा कलम१६(६)(ग) अन्वये राज्य अन्न आयोगाकडे केली होती.त्या अनुषंगाने सुनावणी दरम्यान आयोगाने जिथे पिकेल तिथेच विकेल या धर्तीवर अन्नधान्य संकलन करुन तेथेच वितरण केल्यास वाहतूक आदींवरी शासनाचा प्रचंड खर्च वाचेल व परिणामी करदात्यांच्या कराचा अपव्यय थांबेल,रोजगारांच्या संधी निर्माण होऊन शेतकऱ्यांना देखील त्यांच्या मालास योग्य भाव मिळेल.व ग्राहकांना देखील जिवनावश्यक वस्तुंचा पुरवठा योग्य दरात होईल.त्याच बरोबर शेतकरी,गट, ग्रामपंचायत, शेतकरी उत्पादक कंपन्या हेही सक्षम होतील.असे म्हटले आहे. परंतू या संदर्भात आयोगाकडे अनेक प्रकरणे आली असून त्यांचाही आशय हाच असल्याने व ही प्रक्रिया गुंतागुंतीची वाटत असल्याने यामध्ये तज्ञांच्या सल्ल्यानेच पुढील निर्णय घेण्यात येईल असेही आयोगाने म्हटले आहे. सर्व अर्जदारांच्या वती ऍड. अजय तल्हार यांनी युक्तिवाद केला. त्यानुसार आयोगाने सहा सदस्यीय समिती स्थापन करून या समितीला चार आठवड्यांत अहवाल सादर करण्याचे कळविले आहे. याच राज्य अन्न आयोगाच्या तज्ञ समितीवर शेतकरी संघटनेचे नेते तथा स्वतंत्र भारत पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.अनिल घनवट यांची नियुक्ती राज्य अन्न आयोगाने केली आहे. याबद्दल अनिल घनवट यांचे लातूर जिल्हा शेतकरी संघटनेच्या वतीने युवा जिल्हाध्यक्ष रुपेश शंके, संपर्क प्रमुख मदन सोमवंशी,कार्याध्यक्ष बालाजी जाधव, उपाध्यक्ष कालिदास भंडे, वसंत कंदगुळे, विवेक पाटील, दत्ता मुगळे, शिवाजी हजारे, वैजनाथ जाधव,दत्ता पाटील आदिंनी अभिनंदन केले आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी