होळीच्या दिवशी गावातील झाडे, शाळा रंगवा, प्रहार जनशक्तीचे तालुकाध्यक्ष संदीप तळेकर यांनी केले आवाहन
By : Polticalface Team ,06-03-2023
करमाळा प्रतिनिधी होळीच्या दिवशी रंग खेळण्याच्या ऐवजी झाडे आणि शाळा रंगवून समाज उपयोगी कामात योगदान द्या असे आवाहन प्रहार जनशक्ती पक्ष करमाळा तालुकाध्यक्ष संदीप तळेकर यांनी केले आहे. माजी राज्यमंत्री बच्चु कडू यांच्या आदेशानुसार हा उपक्रम राज्यात राबविला जाणार आहे. त्यामुळे मोठ्या सामाजिक कार्यात प्रहार सहभाग घेणार आहे. गावातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पुढारी यांनी हा उपक्रम राबविला पाहिजे. रंगासाठी होणारा खर्च टाळून हा उपक्रम राबविला पाहिजे असे मत व्यक्त केले जात आहे. बच्चू कडू यांनी केलेल्या या संकल्पनेचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. तळेकर यांनी रंग खेळण्याऐवजी होणारा खर्च टाळावा व एक आगळ्यावेगळ्या समाज उपयोगी कार्याला हातभार लावावा असे आव्हान तळेकर यांनी शेवटी केले आहे
वाचक क्रमांक :