शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चेचा प्रस्ताव सरकारने नाकारल्यामुळे , संतप्त विरोधकांनी केला सभा त्याग
By : Polticalface Team ,08-03-2023
महाराष्ट्र बजेट : राज्यातील अवकाळी पावसाचा मुद्दा राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात चांगलाच गाजला. अवकाळी पाऊसामुळे शेतीचे नुकसान झाले या कारणासाठी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर आज चर्चा व्हावी ही मागणी विरोधकांनी लावून धरली. आज फक्त शेतकऱ्यांच्याच प्रश्नांवर चर्चा करण्याचा प्रस्ताव दिला. मात्र यास विधानसभा अध्यक्षांनी नकार दिल्याने संतप्त होत विरोधी पक्षांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत सभात्याग केला.
अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची पिके अक्षरशः भुईसपाट झाली आहे . गहू, कांदा, टोमॅटो, हरभरा, मका, ज्वारी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मेंढ्या, पाळीव प्राणीही दगावले आहेत . नुकसान पाहून शेतकरी स्वतःलाच मारून घेत आहे. दुसरीकडे पिकाला भाव मिळत नसल्यानेही शेतकरी हवालदिल झाले आहेत, अशा परिस्थितीत सरकारने तातडीने पावले उचलावीत आणि शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी अजित पवार यांनी केली.
राज्यात मागील दोन दिवसांपासून होत असलेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. रब्बी हंगामातील पिके वाया गेलेली आहेत. कांदा, कापूस, मका, हरभरा, गहू अशा पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी प्रचंड वाढल्या असून . आणखीही काही दिवस अशीच परिस्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या परिस्थितीचा विचार करून सरकारने तातडीने शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी पवार यांनी केली.
अवकाळी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून तो हवालदिल झाला. त्याच्या संसाराची होळी झाली आहे. आणि इकडे नेते रंग उधळत आहे असा टोला छगन भुजबळ यांनी लावत गुजरात सरकार प्रमाणे महाराष्ट्रातही अनुदानाच्या बाबत निर्णय व्हावा अशी मागणी त्यांनी केली. छगन भुजबळ यांनी कांदा, द्राक्ष यांसह राज्यातील सर्वच पिकांचे अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. यावरून छगन भुजबळ यांनी मदत मिळावी यासाठी आक्रमक भूमिका घेतली. यावेळी त्यांनी गुजरातच्या सरकारचा संदर्भ त्यांनी दिला.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पण या मुद्द्यावर सरकारला घेरले. त्यानंतर याच मुद्द्यावर सविस्तर चर्चा करावी अशी मागणी विरोधकांनी केली. यापेक्षा जास्त महत्वाचे दुसरे काही असूच शकत नाही असे स्पष्ट करत त्यांनी ही मागणी लावून धरली. पण विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी त्यास नकार दिला. त्यामुळे जयंत पाटील संतप्त झाले. आम्हाला जर बोलूच दिले जात नसेल तर काय उपयोग, असा सवाल करत त्यांनी सभात्याग केला
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी