अडीच वर्षे फेसबुक लाईव्ह मुख्यमंत्री भोगणाऱ्यांना जनतेचे प्रश्न काय समजणार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा ठाकरेंवर हल्लाबोल, पवार कुटुंबावरील नाव न घेता केली जहरी टीका

By : Polticalface Team ,12-03-2023

अडीच वर्षे फेसबुक लाईव्ह मुख्यमंत्री भोगणाऱ्यांना जनतेचे प्रश्न काय समजणार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा ठाकरेंवर हल्लाबोल, पवार कुटुंबावरील नाव न घेता केली जहरी टीका करमाळा प्रतिनिधी माझे कुटुंब तुमची जबाबदारी असे सांगत महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षे फेसबुक लाईव्ह द्वारे कारभार करून महाराष्ट्राचा कारभार ठप्प केला त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी घेण्याला महाराष्ट्रातील जनता बांधील नाही तळागाळातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी जनसामान्यात सहभागी व्हावे लागते अशी टीका सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

करमाळा येथील कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आमदार सचिन कल्याण शेट्टी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर जिल्हा कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे भाजपचे तालुका अध्यक्ष गणेश चिवटे आधी पदाधिकारी उपस्थित होते यावेळी उपस्थित त्यांचे स्वागत मकाई कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल व आदिनाथच्या संचालिका रश्मीताई बागल यांनी केले यावेळी बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचा विकासाचा रथ जोरात दवडू लागला आहे.

पुणे जिल्ह्यातील पुढाऱ्यांनी सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या तोंडातील हक्काचे पाणी स्वतःच्या जिल्ह्यासाठी पळवले विशेषता सोलापूर नगर जिल्ह्याचे पाणी पळवले तर आपली जनता त्यांनाच डोक्यावर घेऊन नाचत होती मात्र आता जनता हुशार झाली असून आपल्या हक्काचे पाणी मिळवण्यासाठी शेतकरी जागृत झाला आहे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देश बलवान होत असून देशातील शेतकऱ्यांसाठी जवळपास वीस हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी उपलब्ध केला आहे महाराष्ट्र शासनाने सुद्धा शेतकरी सक्षम करण्यासाठी अनेक योजना सुरू केले आहेत. तालुक्यातील आदिनाथ व मकाई कारखान्याला शासनाच्या वतीने मदत करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून जास्तीत जास्त मदत करू बोलताना आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील म्हणाले की जातेगाव ते टेंभुर्णी हा रखडलेल्या रस्त्याच्या कामासंदर्भात पालकमंत्री विखे पाटील यांनी पुढाकार घेऊन केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी कडून हा प्रश्न मार्गी लावावा शिवाय करमाळा शहरातील 384 गेली 40 वर्षापासून रहिवास असलेल्या नागरिकांचा मालमत्ता कार्ड उघडून त्यांना घरकुलाचा लाभ द्यावा यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी स्वर्गीय दिगंबर बागल यांच्या अनेक आठवणी सांगितल्या

यावेळी बोलताना रणजीत सिंह मोहिते पाटील म्हणाले की आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निमित्ताने बागल कुटुंबीय व मोहिते पाटील कुटुंबात मतभेद झाले होते पण मनभेद झाले नव्हते आदिनाथ चा निवडणुकीनंतर सर्व निवडणुका एकत्रित लढवायची ठरली होती पण ती वेळ गेली मात्र आता इथून पुढे कशा निवडणुका लढवायच्या आहे हे लवकरच ठरवू असे सांगत नारायण पाटील व बागल गट यांची युती करण्यासाठी मोहिते पाटील पुढाकार घेणार असे स्पष्टपणे संकेत दिले

यावेळी बोलताना दिग्विजय बागल यांनी स्वर्गीय दिगंबर बागल यांची अकाली निधन झाल्यानंतर राजकारणात आम्ही पोरके झाले असून आता इथून पुढे राधाकृष्ण विखे पाटील हर्षवर्धन पाटील व रणजीत सिंह मोहिते पाटील यांनी आमचे पालकत्व घ्यावे अशी जाहीर व्यासपीठावर हात जोडून विनंती केली. या विनंतीला उपस्थित बागल समर्थकांनी टाळ्याच्या कडक करून करून साथ दिली

राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भाषणाने बागल गटाचे चैतन्य आले असून व्यासपीठावरील मान्यवरांनी आगामी राजकारणात बागल कुटुंबाला साथ देण्याची ग्वाही दिल्यामुळे गटाचे नेते रश्मी बागल कोलते यांच्या चेहऱ्यावर हसू फुलून आत्मविश्वास वाढल्याचे त्यांच्या हालचाली येऊन दिसत होते

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी