श्रीगोंद्यात तिसऱ्या दिवशी देखील राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक कर्मचाऱ्यांच्या संपाची तीव्रता मोठ्या संख्येने वाढली, एकच मिशन जुनी पेन्शन चा नारा देत संपकरी आक्रमक
By : Polticalface Team ,17-03-2023
लिंपणगाव (प्रतिनिधी )-श्रीगोंद्यात तिसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी 16 मार्च रोजी राज्य सरकारी निमसरकारी कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी संप अधिक तीव्र स्वरूपाचा होताना दिसला विविध मागण्यांसाठी हे कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. आज संपाचा तिसरा दिवस असल्याने कर्मचाऱ्यांनी आपले काम बंद आंदोलन कायम ठेवून जवळपास 700 कर्मचारी या संपामध्ये सक्रिय झाल्याचे दिसले. श्रीगोंद्यात दररोज श्रीगोंदा तालुका राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीने जोपर्यंत राज्य सरकार जुनी पेन्शन कार्यरत कर्मचाऱ्यांना लागू करत नाही. तोपर्यंत हा संपाचा लढा चालू ठेवण्याचा निर्णय समन्वय समितीने घेतला असल्याचे तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष राजेंद्र खेडकर यांनी श्रीगोंदा येथे संपकरी कर्मचाऱ्यांसोबत बोलताना सांगितले.
दरम्यान 16 मार्च रोजी संपाचा तिसरा दिवस असल्याने श्रीगोंदा तहसील कार्यालयाच्या प्रांगणात पेन्शनर संघटनेचे एम एस लगड यांच्या अध्यक्षतेखाली ठिय्या आंदोलन करून शासनाला आपल्या मागण्यांची जाणीव व्हावी, यासाठी विविध शासकीय खात्यातील कर्मचाऱ्यांसह पेन्शनर नेत्यांनी मनोगत व्यक्त करून या संपाला जाहीर पाठिंबा दिला. यावेळी महिला कर्मचाऱ्यांची संख्या लक्षणीय ठरली.
यावेळी शिक्षक बँकेचे माजी अध्यक्ष बन्सी उबाळे यावेळी म्हणाले की, राज्य सरकार सरकारी निमसरकारी कर्मचाऱ्यांना आपल्या हक्कापासून वंचित ठेवत आहे. यापूर्वी 54 दिवसाचा संप झाला त्याकाळी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे नेते र. ग. कर्णिक यांनी आपल्या निर्णयावर ठाम राहून राज्य सरकारवर मोठा दबाव आणला. त्याकाळी वसंतदादा पाटील हे मुख्यमंत्री होते. काही दिवसांमध्ये दादांचे सरकार गडगडले आणि पुन्हा शरदचंद्र पवार हे मुख्यमंत्री बनले. पवार साहेबांनी सरकार सत्तेवर आल्यानंतर प्रथम सरकारी कर्मचारी हे कुटुंबाचा घटक समजून कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या मान्य केल्या त्यातून सर्वांना लाभ मिळाला. आता पुन्हा पूर्वीच्या संपाचे दिवस आठवले कर्मचाऱ्यांनी देखील आपल्या निर्णयावर ठाम राहावे. सेवानिवृत्तीनंतर पेन्शन महत्त्वाचे आहे .सर्वांनी या संपाच्या तीव्र लढ्यात सहभागी व्हावे असे सांगितले.
प्राथमिक शिक्षकांचे नेते अविनाश निंभोरे यावेळी बोलताना म्हणाले, सरकारने नोकऱ्या दिल्या हा उपकार नव्हे. आमच्यामध्ये बुद्धी कौशल्य भावी पिढीला उत्तम संस्कार देऊन सरकारच्या योजना तळागाळापर्यंत राबवतो. अंमलबजावणी करतो सरकारी नोकरीत आम्हाला देखील सर्व मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी शासकीय लाभ मिळाला पाहिजे ही आमची अपेक्षा असते. परंतु सरकार मात्र या आमच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते. राज्याचे उपमुख्यमंत्री दररोज मीडियासमोर आश्वासने देतात आम्ही मागण्या तत्वता मान्य करतो, परंतु त्याची कार्यवाही होत नाही, जुनी पेन्शन हे आम्हाला म्हातारपणाचा आधार आहे. परंतु तो देखील आम्हाला मिळत नाही. आमदार खासदारांना सर्व वेतन भत्ते व सर्व सुविधा तात्काळ मंजूर करून दिल्या जातात. सद्यस्थितीला संपाच्या लढ्याची तीव्रता संपूर्ण राज्यात वाढत चालली असून, महिला कर्मचारी देखील आता या लढ्यात मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. राज्य सरकारने तात्काळ जुन्या पेन्शन सह कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या तात्काळ मान्य करून त्याची अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा निंभोरे यांनी व्यक्त केली.
यावेळी प्रा बाळासाहेब बळे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक कर्मचाऱ्यांच्या मागण्या हे त्यांच्या भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. परंतु सरकार मात्र वेळ काढून करतय .आंदोलन, बेमुदत संपाची तीव्रता संपूर्ण राज्यात शंभर टक्के दिसती. संपकेरी कर्मचाऱ्यांनी शेवटपर्यंत एक संघ संपामध्ये सक्रिय राहून, न्याय मागण्या मान्य होण्यासाठी सहभागी व्हावे, सरकार नावाची व्यवस्था सतत संघटनांमध्ये मोठ्या प्रमाणात असून, सरकार मात्र फोडा व झोडा ही नीती वापरत आहे. सरकारला ठिकाणावर आणायचे असेल तर संघटन महत्त्वाचे आहे .असे सांगून बळे पुढे म्हणाले की, कर्मचारी हे शेतकऱ्यांची मुले असल्याने शेतकऱ्यांनाही त्याची पूर्ण जाणीव आहे. संपकरांकडून आंदोलनाची तीव्रता कमी होता कामा नये .शासन संघटनेत फूटपाडून संपाची धार कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे. प्रत्येक संघटनेने सक्रिय राहून समन्वय ठेवावा यश निश्चित मिळणार आहे.
यावेळी राम जंजिरे, महेश शिंदे, पंढरीनाथ सुपेकर ,शरद राऊत, राजेंद्र खेडकर, राम जाधव, पाडळे मॅडम, श्री ढीसले आदींनी शासनाच्या भूमिक वर आपल्या भाषणातून ताशेरे ओढली.
* याप्रसंगी प्रांतअधिकारी सुधाकर भोसले यांनी संपकांरी कर्मचाऱ्यांची भेट देत पाठिंबा देऊन कर्मचाऱ्यांच्या भावना शासनापर्यंत सादर करू असे आश्वासन दिले. यावेळी गटविकास अधिकारी रामकृष्ण जगताप यांनी पाठिंबा देत आंदोलन स्थळी भेट दिली. .
या आंदोलनात राजेंद्र खेडकर, बाळासाहेब जठार, वसंत दरेकर, रमजान हवालदार, उद्धव गायकवाड ,सचिन झगडे, बापूराव भिसे, केशव मोंढवे, सचिन जामदार, रामदास ठाकर, विजय गावडे ,मधुकर नागवडे, हनुमंत रायकर, राजेंद्र हिरवे ,नारायण झेंडे, रवींद्र भोंडवे पंडित लष्करे आदींसह विविध शासकीय खात्यातील संघटनाचे कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन संजय रामफळे व शरद गावडे यांनी केले. आभार दिलीपराव काटे यांनी मानले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी