By : Polticalface Team ,17-03-2023
दरम्यान श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे निरीक्षक सचिनराव लगड यांनी म्हटले आहे की शासनाने जुन्या पेन्शन संदर्भात योग्य निर्णय सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे कारण हा प्रश्न कर्मचाऱ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने जिव्हाळ्याचा प्रश्न असून यासाठी पुढाकार घेतला पाहिजे असे सांगितले. व्यक्त केले. शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप यांनी देखील शासन निर्णयविरुद्ध आपले मनोगत व्यक्त केले. यामध्ये NPS योजनेबाबत त्यांनी सविस्तर अशी माहिती सर्व कर्मचाऱ्यांना दिली गेली 14 ते 15 वर्षापासून ते सर्वोच्च न्यायालय मध्ये जुनी पेन्शनची केस लढत आहेत. आणि त्या केस लढवत असताना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य सरकारने काही कमिटी केल्या होत्या त्या कमिटीचे आज सरकारला अहवाल देखील प्रसिद्ध झालेले आहेत. त्या अहवालामध्ये जुनी पेन्शन कर्मचाऱ्यांना दिली पाहिजे असे अहवाल समितीने दिलेले आहेत तरी देखील त्या समितीचे अहवालाची दखल सरकार घेत नाही., अशी खंत सुनील भोर सर यांनी व्यक्त केली. शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप यांनी भेट देऊन कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा देऊन आपले मनोगत व्यक्त केले. मनोगत व्यक्त करत असताना जिल्हाध्यक्ष आप्पासाहेंब जगताप यांनी पूर्वलक्षी प्रवाह आणि सर्व कर्मचाऱ्यांना पेन्शन दिली पाहिजे आणि कोणतेही परिस्थितीत हा संप दीर्घकाळ लांबणार नाही याची सरकारने दक्षता घेतली पाहिजे असे त्यांनी मत व्यक्त केले.
तर नंतर प्राथमिक शिक्षक संघाचे डी एम शिंदे भाऊसाहेब गिरमकर यांनी देखील आपले मत व्यक्त केले. ग्रामसेवक संघटनेचे वतीने पानसरे भाऊसाहेब यांनी मत व्यक्त केले आणि आरोग्य सेवक विभागाच्या वतीने जयश्री तोडकर मॅडम यांनी आपले मत व्यक्त केले. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी श्रीगोंदा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अनिल शिंदे उपस्थित होते. शिंदे साहेब यांनी कर्मचाऱ्यांना तत्काळ पेन्शन योजना लागू करावी मी देखील कर्मचाऱ्यांमधील एक घटक आहे .कर्मचाऱ्यांवरती नवी पेन्शन योजना एनपीएस असल्याने अनेक प्रश्नांना नवीन कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागत कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन सरकारने जुनी पेन्शन योजना द्यावी., असे शिंदे यांनी म्हटले आहे. व या संपाला पाठिंबा दर्शवला
यावेळी वर्षा शिंदे यांनी भारुड गीत तर संदीप मगर यांनी कविता सादर केली. श्रीगोंदा तालुक्याचे माजी आमदार राहुल दादा जगताप यांनी संपला पाठिंबा दर्शविला . जगताप यांनी 2005 नंतरचे कर्मचाऱ्यांना सरकारने तात्काळ जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी सर्व कर्मचारी कर्मचारी बांधवांच्या वतीने शासनाला प्रोत्साहित केले. अनेक वर्ष सरकार दरबारी हा कर्मचारी आपली सेवा करत असतो अखेरच्या सेवानिवृत्तीनंतर अखेरच्या दिवसांमध्ये कर्मचाऱ्यांना आर्थिक विवंचनामध्ये सरकारला पाठवत आहे. अतिशय दुर्दैवाची बाब आहे. असे जगताप यांनी खंत व्यक्त केली सर्व संपकरी कर्मचाऱ्यांच्या सोबत मी आहे. असे म्हटले आहे. .कर्मचारी संपाला माझा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पूर्णतः पाठिंबा आहे असे दादांनी मत व्यक्त केले. त्यानंतर समन्वय समितीचे अध्यक्ष सदाफुले रावसाहेब यांनी संपाची नियोजन आणि उद्याचे नियोजन संपाची सविस्तर माहिती सर्व बांधवांना दिली याप्रसंगी श्रीगोंदा तालुका राज्य सरकारी निम सरकारी शिक्षक कर्मचारी संघटनांचे समन्वय समितीचे सर्चाव कार्यकर्ते उपस्थित होते सूत्रसंचालन शरद गावडे सर यांनी केले. वाचक क्रमांक :