रमजानुल मुबारक - ५, मानवी प्रशिक्षणाचा काळ

By : Polticalface Team ,28-03-2023

रमजानुल मुबारक - ५, मानवी प्रशिक्षणाचा काळ
रमजानुल मुबारक - ५
*मानवी प्रशिक्षणाचा काळ*
*✒️सलीमखान पठाण*
श्रीरामपूर
९२२६४०८०८२
रमजान महिना ही जगातील प्रत्येक व्यक्तीसाठी एक पर्वणी आहे. व्यक्तीच्या प्रशिक्षणाचा हा काळ आहे. दैनंदिन जीवनामध्ये वावरतांना अनेक प्रसंगांना आपल्याला सामोरे जावे लागते.त्यांना सामोरे जाताना आपण कशा पद्धतीने वागले पाहिजे याचे प्रशिक्षण रोजाच्या माध्यमातून रमजान महिन्यात होत असते. यासाठी केवळ उपाशी राहून चालत नाही. तर प्रत्यक्ष कृतीची गरज असते आणि महिनाभर झालेली ही कृती पुढे वर्षभर जर आपल्या जीवनात टिकली तर आपण जिंकलो. रोजा असो अगर नसो, प्रत्येक माणसाने बोलताना आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. अश्लील बोलणे, शिव्या शाप देणे, खोटं बोलणे या कृतीमुळे व्यक्तीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून जातो.रोजामुळे आपण कसे वागावे याची एक सीमारेषा आखली जाते. विनाकारण कुणाशी वाद घालू नये, कुणाची निंदा करू नये, शिव्याशाप देऊ नये, समोरच्या व्यक्तीचे मन दुखावेल असं कोणतंही वक्तव्य आपण करू नये ही सर्व शिकवण रोज्यातून मिळत असते. दैनंदिन जीवनामध्ये व्यक्तीने कसे वागावे याची एक आचारसंहिता इस्लाम धर्माने कुरआनच्या माध्यमातून घालून दिलेली आहे. प्रत्येकाने त्या पद्धतीनेच वागले पाहिजे. व्यवहारांमध्ये सचोटी असावी. वागण्यामध्ये नम्रता असावी. कुणाची ही पाठीमागे निंदा करू नये याला गिबत म्हणतात. हा सर्वात मोठा रोग प्रत्येकाला लागलेला आहे. एखाद्याचं चुकलं असेल तर समोरासमोर त्याला सांगणे कधी ही चांगलं. परंतु पाठीमागे दुसऱ्याजवळ त्याच्याबद्दल निंदात्मक बोलणे हे मान्य नाही. कोणी जर आपल्याशी विनाकारण भांडत असेल तर त्याच्या तोंडी न लागता भाऊ मला रोजा आहे असे सांगून शांत राहावे. आपला रोजचा वेळ ईश्वर भक्तीसाठी समर्पित करावा. ईश्वराचे म्हणजे अल्लाहचे नामस्मरण करावे. कुरआन पठण करावे. दानधर्म करावा. आपल्या घरामध्ये चांगले खात असताना आपला शेजारी भुकेला आहे किंवा कसे याची दक्षता घेण्याची शिकवण सुद्धा हजरत पैगंबरांनी दिली आहे. रमजान महिन्यामध्ये केल्या जाणाऱ्या संस्कारांचे मोठे पुण्य आहे. हा पुण्यसंचय करण्यासाठी प्रत्येकाने अल्लाहतआला ने निश्चित केलेल्या मार्गानुसार व हजरत पैगंबरांनी दिलेल्या संदेशानुसार आपले जीवन व्यतीत करण्याचा प्रयत्न केला तर जीवनातून सर्व प्रकारच्या चुकीच्या चालीरीती,वाईट प्रथा नष्ट होऊन एक सार्थ आणि परमार्थ जीवन जगता येईल. आपल्यामुळे इतरांना दुःख होईल किंवा यातना होतील असं वर्तन कुणीही करू नये.याचे प्रत्यक्ष आचरण रमजान महिन्याच्या माध्यमातून केले जाते.ते अंगिकारून प्रत्येकाने आपले जीवन सफल करण्याचा प्रयत्न केल्यास यथार्थ जीवन जगल्याचे समाधान आपल्याला प्राप्त होऊ शकते. यासाठी मनाचा निश्चय करून आपण आपले दैनंदिन वर्तन केले पाहिजे. स्त्री आणि पुरुष दोघांना या सर्व बाबी लागू आहेत.(क्रमशः) *********************

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी