आदानी उद्योग समूहात वीस हजार कोटी रुपये कोणी गुंतवले? जिल्हा महिला काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षा सौ अनुराधाताई नागवडे यांचा सवाल

By : Polticalface Team ,01-04-2023

आदानी उद्योग समूहात वीस हजार कोटी रुपये कोणी गुंतवले? जिल्हा महिला काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षा सौ अनुराधाताई नागवडे यांचा सवाल
लिंपणगाव (प्रतिनिधी) -आदानी उद्योग समूहात वीस हजार कोटी रुपये कोणी गुंतवले ? व आदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संबंध काय? असा प्रश्न संसदेत विचारल्यानंतर या प्रश्नाचे उत्तर देणे ऐवजी राहुल गांधींना खोट्या केसमध्ये अडकवून त्यांना दोन वर्षाचे शिक्षा देणे व त्यांची खासदारकी रद्द करणे हे केंद्र सरकारचे कृत्य भारतीय लोकशाहीचा गळा घोटणारे असून खरे बोलणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय ही बाब अतिशय गंभीर असून भविष्यात भारत हुकूमशाही कडे वाटचाल करत असल्याचे द्योतक असल्याची टीका अहमदनगर जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अनुराधा नागवडे यांनी केली.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात सौ. नागवडे यांनी म्हटले आहे की, दि.७ फेब्रुवारी रोजी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संसदेत उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे देणे ही केंद्र सरकारची नैतिक जबाबदारी होती. परंतु तसे झाले नाही. त्यांच्या परदेश दौऱ्यातील वक्तव्यावर संसदेत त्यांना बोलू दिले नाही.उलट आदानी यांच्या घोटाळ्यासंदर्भातील राहुल गांधी व मल्लिकार्जुन खर्गे यांच्या भाषणाचा भागच कामकाजातून वगळून टाकला आणि केंद्र सरकार आदानीची पाठ राखण करण्यासाठी उभे राहत आहे याचा अर्थ काय? सर्वात विशेष म्हणजे आज देशातील विविध न्यायालयात हजारो केसेस प्रलंबित असताना त्यांची वर्षानुवर्ष सुनावणी होत नाही. मात्र राहुल गांधींनी अदानी संदर्भात संसदेत प्रश्न विचारला आणि नऊ दिवसातच त्यांच्या विरोधात मानहानीचे प्रकरण बाहेर काढून सुनावणी झाली, शिक्षाही सुनावली, आणि त्यांची खासदारकीही तातडीने रद्द केली. हा सर्व घटनाक्रम पाहता केंद्र सरकारच्या विरोधात जो बोलेल तो अपराधी ठरेल व त्याला शिक्षा दिली जाईल ही भारतीय लोकशाहीच्या दृष्टीने धोक्याची घंटा असल्याचे मत सौ. नागवडे यांनी व्यक्त केले आहे.

काँग्रेस पक्ष व गांधी घराण्याने देशाच्या स्वातंत्र्यासाठी फार मोठे योगदान दिले असून इंदिरा गांधी व राजीव गांधी यांनी देशासाठी बलिदान दिलेले आहे. त्यांचे विचार व संस्कार घेऊनच राहुल गांधींनी 3500 किलोमीटरची भारत जोडो यात्रा केली. अशा व्यक्तीला देशद्रोही ठरविण्याचा प्रयत्न अतिशय निंदनीय असून भारत जोडो यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे पाहून केंद्र सरकार धास्तावले असल्यामुळेच त्यांनी विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी त्यांच्यावर कारवाई केलेली आहे.

आज देशात शेतकरी, बेरोजगारी, कामगार, महागाई, इंधनाचे वाढलेले दर असे सामान्य माणसाच्या जीवनाशी निगडित असणारे कितीतरी प्रश्न गंभीर रुप धारण करून उभे आहेत परंतु पंतप्रधान त्यावर बोलत नाहीत. दिवसेंदिवस खाजगीकरण चालू आहे. म्हणून हा देश व या देशातील लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेस पक्षांनी ही लढाई सुरू केलेली असून उद्या जनतेच्या दरबारात जाणार असल्याचे सौ. नागवडे यांनी म्हटले आहे.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष