सर्व ऊस रसवंती गृहाचे नाव कानिफनाथ , नवनाथ रसवंती गृह का असते?

By : Polticalface Team ,02-04-2023

सर्व ऊस रसवंती गृहाचे  नाव कानिफनाथ , नवनाथ रसवंती गृह  का असते? उन्हाळा सुरु झाला आहे आणि आणि उन्हाळ्यात आपण उसाच्या रसाचा आस्वाद नाही घेतला तर नवलच , आजपर्यंत आपण अनेक ठिकाणी रस पिले पण एक गोष्ट नेहमी सारखीच आढळली ती म्हणजे प्रत्येक उसाच्या रसाच्या दुकानाचे नाव कानिफनाथ किंवा नवनाथ असेच असते . खुप विचार केल्यानंतर उसाच्या रसाच्या दुकानदाराला याबद्दल विचारले असता त्याने दिलेले भन्नाट असे उत्तर रसवंती गृहांची नावे सारखी असण्यामागे तिथे विषय आहे आदर आणि श्रद्धेचा! पडलात ना बुचकळ्यात? चला जाणून घेवू या नावामागचे गौड-बंगाल.

भारतामध्ये अनेक संस्कृती आणि संप्रदाय आहेत. त्यातील एक दत्त संप्रदाय असून . या संप्रदायाची शाखा आहे नवनाथ संप्रदाय, ज्यातील नऊही नाथांचे गुरु आहेत भगवान दत्तात्रय, आता एक आख्यायिका अशी आहे, की या नथानपैकी कानिफनाथांचा जन्म हत्तीच्या कांनापासून झाला. या कारणाने कानिफनाथ यांना उस, गूळ आणि ऊसचा रस अधिक आवडत असे. म्हणून त्यांच्यावरील आदरापायी रसवंती गृहाचे नाव कानिफनाथ रसवंती गृह असे ठेवले जात आहे .

पण तेथे बसलेल्या एक आजोबाने दुसरी गोष्ट अशी सांगितली की, रसवंती गृह व्यवसायामध्ये असणारे जवळपास ९०% व्यावसायिक हे पुणे जिल्ह्यातील पुरंदर व भोर तालुक्यातले आहेत.

नाथ संप्रदायाचा या भागातील लोकांवर जास्त प्रभाव आहे. पुरंदर तालुक्या मध्ये सासवड पासून १२ किलोमीटरवर बोपगाव या ठिकाणी श्री कानिफनाथ यांची समाधी आहे. बोपगाव कानिफनाथांचे समाधी स्थळ असलेल्या डोंगराच्या पायथ्याशी असल्याने कानिफनाथ हे बहुतेक सर्व रसवंति-गॄहचालकांचे पूजनीय दैवत आहेत. त्यामुळे हे लोक श्रद्धेने कानिफनाथ किंवा नवनाथांचे नाव आपल्या दुकानाला देत.

पूर्वी बैलानी फिरवल्या जाणाऱ्या लाकडी घाण्यावर हा रस काढला जायचा. आता लोखंडी मशीन आले. बैल गेले. पण या बैलानी आपल्याला एकेकाळी जगवलेलं आहे याची आठवण या शेतकऱ्याच्या पोरांनी मनाशी जपली आहे. त्यामुळेच बैलाच्या गळ्यातले घुंगरू आजही रस काढणाऱ्या मशीन चरख्याला जोडलेले असते .

बसस्टॅण्ड हे पूर्वीचे हक्काचे असे गर्दीचे ठिकाण त्यामुळे स्टँडवर गिर्हाईक भरपुर असल्याने धंदयाचा जम बसला. मग एकाचे पाहुन दुसऱ्याने, त्याचे पाहून तिसऱ्याने असे करत रसवंती गृह वाढू लागली. त्याकाळी सहकारचा एवढा गवगवा झालेला नव्हता त्यमुळे कारखान्याला जाणार्‍या उसाचे प्रमाण देखील कमीच होते. पुरंदर तालुका हा दुष्काळी तालुका असल्याने तेथील एकजण पोट भरण्यासाठी मुंबईला गेला होता . त्याने तिथे शक्कल लढवून उसाचे गंडेरे बाटलीत भरून विकायला सुरू केले आणि हा देशी मेवा मुंबईकरांना भावला आणि उस पुण्यामुंबईत प्रसिद्ध होऊ लागला , पण हे गंडेरे लगेच खराब होत असत म्हणून त्याचा रस काढून एकाच ठिकाणी दुकानासारखी त्या रसाची विक्री सुरू झाली आणि रसवंती गृहांचा जन्म झाला.

आता पुरंदर तालुक्यात कानिफनाथांची समाधी असल्याने आख्खा पुरंदर तालुका कानिफनाथांचा भक्त आहे. पोटापाण्यासाठी रसवंती गृहाच्या माध्यमातून या तालुक्यातील मंडळी महाराष्ट्रभर विखुरली पण जाताना आपल्या श्रद्धास्थान असलेल्या नवनाथांना आपल्या सोबत घेऊन गेली. परमुलूखात गेली तरी आपली माती ही मंडळी विसरली नाहीत आणि म्हणूनच आपल्याला थंडावा देणार्‍या या रसवंती गृहांची नावे नवनाथ किंवा कानिफनाथ रसवंती गृह असे असते.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी