राष्ट्रपिता महात्मा फुले जयंती ११ एप्रिल रोजी, शासकीय सुट्टी जाहीर करावी, दौंड तालुका अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची मागणी

By : Polticalface Team ,06-04-2023

राष्ट्रपिता महात्मा फुले जयंती ११ एप्रिल रोजी, शासकीय सुट्टी जाहीर करावी,  दौंड तालुका अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची मागणी दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड ता ०५ एप्रिल २०२३ दौंड तालुका अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने ११ एप्रिल रोजी सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले जयंती महोत्सव, देशात व राज्यात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते, महाराष्ट्र शासनाने ११ एप्रिल रोजी शासकीय सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी दौंड तालुका अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे तालुका अध्यक्ष मंगेश राजाराम रायकर यांनी जिल्हा व राज्य स्तरीय पदाधिकारी यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तसेच दौंड तालुका तहसिलदार कार्यालय, येथे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

या प्रसंगी दौंड तालुका अध्यक्ष मंगेश राजाराम रायकर, तसेच महाराष्ट्र राज्य, व जिल्हास्तरीय अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते, महाराष्ट्र राज्यातील वरीष्ठ अधिकारी तहसीलदार याचा संप काळ सुरू असल्याने दौंड तहसिल कार्यालयातील कुळकायदा शाखा अव्वल कारकून, गिरीश भालेराव यांनी सदर निवेदन स्वीकारले असून संबंधित वरीष्ठ अधिकारी यांच्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात येईल अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुले यांच्या जनकल्याणी कार्याचा आढावा पाहता महात्मा फुले यांनी देश हितार्थ राज्यातील बहुउद्देशीय कार्य केले आहेत, खडकवासला धरणाचे बांधकाम, पुणे रेल्वे स्टेशन परिसरातील शासकीय सेंट्रल बिल्डिंग इमारतीचे बांधकाम केले, गंजपेठेतील अस्पृश्य मुलींची पहिली शाळा भिडे वाड्यात सुरू केली, मागासवर्गीय अस्पृश्य समाजासाठी पिण्याच्या पाण्याचा हाऊद खुला केला, त्यामुळे राज्यातील अस्पृश्यता संपुष्टात आनुण परिवर्तन घडवले आहे, परस्थिती बदली स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय हि मुल्ये भारत देश नव्हे तर पूर्णविश्वात रुजविण्यासाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले. छत्रपती शिवाजी महाराज यांची रायगडवरील समाधी शोधून काढली,व कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवजयंती उत्सव सुरु केला, पोवाड्याच्या माध्यमातून मराठी भाषा साता समुद्रा पार पोचवली, छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रथम शिवचरित्राचे लिखाण तात्यासाहेब महात्मा फुले यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात लिहून छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास जगासमोर आणला.

कुळवाडी भूषण रयतेचा राजा या उपमा देऊन बहुजन समाज बांधवांना सत्यशोधक चळवळीच्या माध्यमातून जागृत केले, देशातील व राज्यातील बहुजन व मागासवर्गीय अस्पृश्य समाजातील शोषित पिढीत वंचित असलेल्या समाजातील मुली मुलांना व स्त्रियांना प्रस्थापितांनी शिक्षणापासून वंचित ठेवले होते, मात्र तात्यासाहेब महात्मा फुले यांनी स्त्रियांसाठी शिक्षण खुले केले, या महान कार्याची दखल घेण्या ऐवजी शनिवार वाड्यातील तत्कालीन व्यवस्थेने गोविंद रावच्या पोराने धर्म बाटवला म्हणून वाळीत टाकले, तरी कोणाच्याही दबावाला बळी न पडता तात्या साहेबांनी मागासवर्गीय यांच्या जाती येत्येच्या बेड्या तोडून उलथुन टाकल्या, त्यांनी अधिक जोमाने कार्य सुरू ठेवले होते, पुस्तकातील लिखाणाच्या माध्यमातून बहुजन समाजाला शिक्षित व जागृत केले, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा फुले त्यांचे अपूर्ण कार्य भारतीय संविधानाच्या चौकटीत समावेश करुन स्वातंत्र्य समता बंधुता व न्याय कायम स्वरुपी ठेवले आहे, भारत देश व महाराष्ट्र राज्याला दिशा देणारी महत्वाची भुमिका तात्या साहेबांनी जोपासली होती, त्यामुळे महाराष्ट्र राज्यात महात्मा जोतिबा फुले ११ एप्रिल रोजी शासकीय सुट्टी जाहीर करण्यात यावी अशी प्रतिक्रिया सर्व सामान्य नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे, महाराष्ट्र शासनाने शासकीय सुट्टीचा आदेश तत्काळ देण्यात यावा अशी मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

या प्रसंगी, मंगेश राजाराम रायकर. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद दौंड तालुका कार्याध्यक्ष..डॉ. दत्तात्रय ब. जगताप ( राज्य संयोजकIMP) निलेश पो. बनकर (जिल्हा संयोजक सत्यशोधक ओबीसी महासंघ) निलेश शेंडे (सत्यशोधक ओबीसी महासंघ) नवनाथ माने (छत्रपती क्रांती सेना दौं.ता.अध्यक्ष) रामचंद्र भागवत (क्रांतीजोती प्रतिष्ठाण पाटस) प्रमोद भागवत (क्रांतीजोती प्रतिष्ठाण) दत्ता माने (क्रांतीजोती प्रतिष्ठाण) अमोल भागवत (राष्ट्रिय फुले ब्रिगेड दौं. ता. अध्यक्ष) जयश्री भागवत (राष्ट्रवादी युवती कार्याध्यक्ष माजी सरपंच कुरकुंब) राजाराम होले (माजी सरपंच गोपाळवाडी) विजय गिरमे (अ.भा.महात्माफुले समता परिषद पुने जि. सरचिटणीस) सचिन शिंदे (अध्यक्ष दौंड तालुका ओबीसी सेल) सचिन डेंबळकर (उपाध्यक्ष ओबीसी सेल) अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व समविचारी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी