लिंपणगाव (प्रतिनिधी) -कै.विक्रमसिंह खासेराव वाबळे(दादा) यांच्यासारखी समाजामध्ये थोडीच निस्वार्थ मनाची माणसं शिल्लक होती.त्यांनी आजपर्यत वेगवेगळी पदे भुषवली व मढेवडगावचे नाव श्रीगोंदा तालुक्यात पोहचवीले व गावचा वेगळाच ठसा निर्माण केला पण नंतरच्या काळात राजकारणाने वेगळीच दिशा घेण्यास सुरु केली व त्यांना कधिच ति आवडणारी नव्हती कारण राजकारण हे वेगळ्याच उंबरठ्यावर जावुन पोहचले होते.त्यामुळे त्यांनी राजकारण सोडुन दिले व नंतरच्या काळामध्ये योग्य तरूणांना दिशा देण्याचे काम दादांनी केलेत्या निस्वार्थ देव माणसाच्या पायाला आवर्जुन स्पर्श करावासा वाटायचा.अन त्यांच्या पायाला स्पर्श केल्यावर अलगद ते पाठीवरती एक हात ठेवून चांगल काम करताय असच काम करत रहा व घरी कुटुंबाकडे दुर्लक्ष होवून देवू नका. दसरा, मकर संक्रात किंवा वाढदिवसादिवशी दादांच्या चरणाला स्पर्श करून नवीन काहीतरी घ्यायला भेटायचे. असा देव माणुस पून्हा होणे नाही.देवालाही चांगलीच माणंस आवडतात.अन त्या देव माणसाला आज आपल्यातुन जावून एक वर्ष पुर्ण होत आहे त्यानिमित्त
दादांना भावपुर्ण आदरांजली
शब्दांकन :-अभयसिंह गुंड
संकलन:- नंदकुमार कुरुमकर पत्रकार
वाचक क्रमांक :