रमजानुल मुबारक -१६, दारिद्रय निर्मुलनासाठी - जकात

By : Polticalface Team ,08-04-2023

रमजानुल मुबारक -१६, दारिद्रय निर्मुलनासाठी - जकात
रमजानुल मुबारक - १६
दारिद्रय निर्मुलनासाठी - जकात
*✒️सलीमखान पठाण*
श्रीरामपूर
९२२६४०८०८२
इस्लामी तत्वानुसार प्रत्येक ऐपतदार मुस्लीम व्यक्तिने जकात आदा केली पाहिजे.न देणारे गुन्हेगार आहेत.यासाठी आपल्या दैनंदिन व्यवहाराचा चोख हिशोब ठेवला पाहिजे.हजरत पैगंबरांनीही म्हटले आहे कि कुणाशी देणे घेणे व्यवहार करतांना नेहमी लिहून ठेवीत जा म्हणजे हिशोबात गोंधळ होत नाही.आपल्या देशात करप्रणाली एवढी किचकट आहे कि इन्कम टॅक्स किंवा सेल टॅक्स आदा करतांना खोटे रेकार्ड करुन कर चुकवेगिरीकडे बहुतेकांचा कल असतो. जीएसटीने तर व्यापारी व सर्वसामान्यांना जेरीस आणले आहे. मात्र इस्लामी जकातीमध्ये चोरी अथवा चुकवेगिरी करुन चालत नाही तर दिलेली जकात म्हणजे आपल्या संपत्तीचा मळ असून जकात दिल्याने माल स्वच्छ होतो.व्यापार, व्यवहार,शेती व सर्व प्रकारच्या उदिम व्यापारातील नफ्यावर जकात आदा करणे आवश्यक आहे.एक वर्ष झाल्यावर जकात दिली पाहिजे. जकातीच्या अनेक बाबी आहेत ज्यावर जकात लागू आहे.दैनंदिन वापरातील गाड्या,राहते घर आदिवर जकात नाही.मात्र मालवाहू किंवा प्रवासी वाहने, भाडोत्री दिलेली घरे, शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर जकात दिली पाहिजे. शेकडा अडीच टक्के म्हणजे हजार रुपयाला पंचवीस रुपये एवढे जकातीचे प्रमाण आहे.जकात देतांना रोख स्वरूपात किंवा कपडे , धान्य, किराणा माल आदि स्वरूपातही दिली जाते. समाजातील गरिब व गरजू लोकांच्या गरजा पूर्ण होऊन त्यांनाही इतरांप्रमाणे जीवन जगता यावे हा जकातीचा मूळ उदेयश आहे.मोठ्या शहरातून श्रीमंत लोक गरीब लोकवस्तीत जकातीच्या रकमेतून मदत वाटप करतात. जकात देतांना जवळच्या गरजू नातेवाईकांना प्रथम दिली पाहिजे.मात्र आई, वडील,मामा हे जकातीची मदत घेण्यास पात्र नाहीत.इतर नातेवाईकांना ती देता येते.एखादयाच्या गरजा पूर्ण होतील एवढी मदत त्याला केली पाहिजे. १०० लोकांना देण्यापेक्षा १० लोकांना देऊन ते स्वयंपूर्ण होतील व पुढच्या वेळी त्यांना जकात घेण्याची वेळ येणार नाही अशा पध्दतीने नियोजन करुन समाजाच्या गरजा कशा पूर्ण होतील याकडे लक्ष दिले गेले पाहिजे. सामाजिक,आर्थिक विषमता दूर करण्यामध्ये जकातीचा मोठा वाटा आहे.कधी कधी व्यापार किंवा धंद्यामध्ये तोटा झाल्यास कुटुंब उघड्यावर पडते.दिर्घ आजारपणामुळे ही कुटुंबाची वाताहात होते. गरीबीमुळे जीवन जगणे अशक्य होते अशा उद्भवणाऱ्या कठीण परिस्थितीमध्ये गरजूंना मदतीचा हात देण्यासाठी जकातीच्या रकमेचे मोलाचे योगदान असते. ज्यांच्या मागे कुणी नाही अशा कुटुंबांना यातून मदतीचा हात दिला जातो.अनेक सामाजिक संघटना समाजातील अशा गरजू घटकांना वर्षभर मदत करीत असतात. या कामासाठी लागणारा निधी रमजान महिन्यात जकातीच्या रकमेतून एकत्रित केला जातो व गरजूंना त्याचे वितरण केले जाते. इस्लामी संस्कृतीमध्ये जकातीची व्यवस्था ही सामाजिक दृष्ट्या समरसता कायम करण्यासाठी प्रामुख्याने अस्तित्वात आली आहे.समाजामध्ये कोणीही फार श्रीमंत आणि कुणीही फार गरीब राहू नये. सर्वांच्या गरजा पूर्ण झाल्या पाहिजे.यासाठी जे घटक कमकुवत आहेत.त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये सामील करून सामान्य जीवन जगता यावे हा या जकातीचा मूळ उद्देश आहे. जकातीच्या माध्यमातून गोळा होणारी रक्कम समाजातील गरजू घटकांवर खर्च करावयाची असते. बेरोजगारांना रोजगार निर्मिती साठी देखील जकातीच्या रकमेचा विनियोग केला जातो. त्यातून पुढे त्यांनी स्वतः अर्थार्जन करावे. दरवर्षी कुणाकडे भिक मागू नये हा यामागचा उद्देश आहे. गोरगरिबांना रक्कम देताना धान्य,कपडे, गृहपयोगी वस्तू या माध्यमातून ती दिली जाते.रोख रक्कम सुद्धा देतात.आपल्या उत्पन्नावर जेवढी जकात लागू झाली आहे तेवढी रक्कम या पद्धतीने वाटली जाते. हे करीत असताना थोडे थोडे पैसे वाटण्याऐवजी,दहा लोकांना देण्याऐवजी ती जर दोन लोकांना दिली तर ते दोन लोक त्या रकमेतून स्वतः च्या उदरनिर्वाहाची साधने निर्मिती करून पुढच्या वर्षी लाभार्थी मधून बाजूला होतात आणि अशा पद्धतीने समाजातून दोन गरजू कमी होऊन भविष्यात ते देखील जकात देऊ शकतात अशी ही आदर्श रचना आहे. खलिफा हजरत उमर बिन अब्दुल अजीज यांच्या काळामध्ये समाजात एवढी सुबत्ता होती कि जकात घेणारे कुणीही नव्हते.आदर्श समाजव्यवस्था त्यांनी उभारली होती. मुस्लिम समाजामध्ये परिवर्तनाचे वारे सध्या वहात आहे.शैक्षणिक बाबीसाठी प्रामुख्याने जकातीच्या रकमेचा विनियोग केला जात आहे. शासनाच्या मदतीशिवाय अनेक सामाजिक संस्था शिक्षणासाठी आपले योगदान देत आहेत. युपीएससीचे क्लासेस देखील या द्वारे चालविले जात आहेत.उच्च शिक्षणाच्या सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आज मुस्लिम समाजाची अवस्था इतर मागासवर्गीय समाजापेक्षाही खूप वाईट आहे. शासनाकडून कोणतीही फारशी मदत समाजाला मिळत नाही म्हणून एससी-एसटी च्या धर्तीवर मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांना देखील शैक्षणिक सवलती मिळणे क्रमप्राप्त आहे. परंतु यासाठी शासन व्यवस्था आणि राजकीय इच्छाशक्ती कमी पडते. अशावेळी अनेक एनजीओ आपल्या परीने शैक्षणिक विकास करण्याचे कार्य करीत आहेत ही समाधानाची बाब आहे. जकात व्यवस्थित अदा न करणाऱ्याबाबत कुरआन शरीफ मध्ये तसेच हजरत पैगंबरांनी ठिक ठिकाणी सूतोवाच केले आहे. जे लोक धार्मिक निर्देशांचे पालन करून योग्यप्रकारे आपली जकात आदा करतात ते नफ्यात राहतात आणि जे दुर्लक्ष करतात ते तोट्यात जातात हा निसर्ग नियम आहे. त्यामुळे प्रत्येक ऐपतदार मुस्लिम व्यक्तीने आपल्या सर्व व्यवहाराचा योग्य हिशोब करून जकात आदा करून आपली जबाबदारी पार पाडणे आवश्यक आहे. इस्लाम धर्मामध्ये एक आदर्श समाज व्यवस्था निर्मितीसाठी योग्य अशी रचना केलेली आहे. आपला विकास करीत असताना इतरांचाही विकास झाला पाहिजे. सर्वांना सोबत घेऊन समाजाने पुढे गेले पाहिजे. समानता हा प्रमुख गुणधर्म यामध्ये आहे. सर्वांना विकासाची समान संधी प्राप्त करून दिली पाहिजे. त्यासाठी प्रत्येकाने आपले योगदान द्यावे.जेवढे चांगले करता येईल तेवढे करावे.वाईट विचार डोक्यात आणू नये. ही सुद्धा शिकवण हजरत पैगंबरांनी दिली आहे. (क्रमशः) ************************

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी