रमजानुल मुबारक -१७ *जकात आदा करण्याचे फायदे

By : Polticalface Team ,09-04-2023

रमजानुल मुबारक -१७

*जकात आदा करण्याचे फायदे रमजानुल मुबारक - १७
जकात आदा करण्याचे फायदे
*✒️सलीमखान पठाण*
श्रीरामपूर
९२२६४०८०८२
इस्लाम धर्माची पाच मूलतत्वे प्रामुख्याने मानली गेली आहेत.पहिला कलमा, दुसरी नमाज,तिसरा रोजा,चौथी जकात व पाचवे हज.यापैकी जकातची अदायगी प्रामुख्याने या रमजान महिन्यात केली जाते.समाजातील सधन वर्गाने (साहिबे निसाब) जकात ही दयावयाची असते. यासाठी ज्याच्या जवळ साडेसात तोळे सोने किंवा साडे बावन्न तोळे चांदी किंवा त्यांच्या किंमतीची रोख रक्कम शिल्लक आहे अशी व्यक्ति जकात आदा करण्यासाठी पात्र समजली जाते. बहुतांश लोक रमजान महिन्यातच जकात दयावी असे समजतात मात्र तसे नाही.तुमच्या नफ्याच्या मालाला जेव्हा एक वर्ष पूर्ण होईल तेव्हा जकात दिली पाहिजे. रमजान महिन्यात मिळणारे जास्त पुण्य प्राप्त व्हावे या हेतूने जकात या महिन्यात देण्याकडे कल जास्त असतो. समाजातील सर्व घटकांचा विकास व्हावा. कुणी गरीब राहू नये, असेल तर त्याच्याही गरजा पूर्ण व्हाव्यात या हेतूने हजरत पैगंबरांनी जकातीची ही व्यवस्था निर्माण केली. समाजातील अगदी शेवटचा घटक देखील वंचित राहू नये हा या मागचा मुख्य उद्देयश आहे. समाजातून गरीबीचे उच्चाटन करणे हा देखील हेतू आहे. तसेच समाजातील वृध्द , विधवा,अनाथ यांचे पालनपोषण करणे, गंभीर आजारी रुग्णांना मदत करणे, शिक्षणासाठी हातभार लावणे असे अनेक उद्देश यामागे अभिप्रेत आहेत. जकात आदा केल्याने आपल्या व्यापार उदिमात वाढ होते.बरकत येते.जे व्यापारी किंवा ईतर व्यावसायिक वर्षभराच्या आपल्या व्यापार, व्यवसायाचा काटेकोरपणे हिशोब करुन योग्य ती जकात आदा करतात त्यांची भरभराट झालेली पहावयास मिळते.तर जे याबाबत कुचराई करतात त्यांना तोटा सहन करावा लागत असल्याची अनेक उदाहरणे समाजात पहावयास मिळतात. आपल्याकडे प्रामुख्याने धार्मिक पाठशाळा (मदरसा) ना जकातीची रक्कम मोठया प्रमाणावर दिली जाते. या रकमेतून मदरसात शिकणाऱ्या मुलामुलींचे जेवण,कपडे व राहण्याचा खर्च भागविला जातो. अलिकडच्या काळात समाजातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठीही या रकमेचा सदुपयोग केला जात आहे.गरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाचा खर्च जकात च्या रकमेतून केला जात आहे. अनेक सामाजिक संस्था व व्यक्ती याबाबत अग्रेसर आहेत.जकात देतांना ती देण्याचे जाहीर प्रदर्शन टाळावे, घेणाऱ्याला कमीपणा वाटणार नाही अशा पध्दतीने दयावी. गरजूंचा शोध घेऊन शक्य तो गुप्तपणे त्यांची मदत करावी. ही मदत अल्लाहच्या मर्जीसाठी दिली जात असल्याने तोच याचा मोबदला आपल्याला देईल ही श्रध्दा त्यामागे असावी . दरवर्षी एकूण वार्षिक व्यवहारातून झालेल्या नफ्यावर शेकडा अडीच टक्के जकात देणे फर्ज आहे.जकात म्हणजे इस्लामी टॅक्स.जो समाजातील गरजू व गरीब घटकांच्या मदतीसाठी वापरला जातो.जगामध्ये इन्कम टॅक्स आणि सेल टॅक्स म्हणजे आयकर व विक्रीकर देण्याची पद्धत आहे.परंतु इस्लाम मध्ये तुम्हाला जे उत्पन्न मिळाले आहे,त्यातून जो नफा झाला आहे,त्या नफ्यावर तुमच्या मर्जीने टॅक्स म्हणून जकात आदा करावयाची आहे.विक्री करामध्ये चोरी केली जाते.उत्पन्न दडवले जाते. विक्री लपविली जाते.जकाती मध्ये मात्र झालेला नफा लपवता येत नाही. जकातीच्या टॅक्स रुपी रकमेची चोरी करता येत नाही.खोटी रक्कम अदा करता येत नाही.कारण नफा आपला असतो. त्यावर जकात आदा केल्याने आपली एक जबाबदारी पूर्ण होते. या जकातीच्या आदा करण्यामध्ये काही अफरातफर केल्यास होणारे नुकसान देखील आपलेच असते व गुन्हा सुद्धा आपल्याच नावावर नोंदवला जातो.ही जाणीव असल्यामुळे कोणतीही व्यक्ती जकात आदा करण्यामध्ये कुचराई करीत नाही. समाजातील दारिद्र्य नष्ट करण्यासाठी आणि समाजातील सर्वांना समान न्याय,समान आनंद,समान संधी देण्यासाठी जकातीची व्यवस्था रुढ झालेली आहे.जे लोक आपल्या सर्व प्रकारच्या कारभारावर,वार्षिक उत्पन्नावर जकातीची रक्कम अदा करतात, अल्लाहच्या नजरेमध्ये ते फार भाग्यवान आहेत. गोरगरिबांच्या गरजा पूर्ण करुन पुण्य कमावण्याची संधी अल्लाहतआला ने त्यांना उपलब्ध करून दिलेली असते. प्रत्येक जण या संधीचं सोनं करण्यासाठी आतुर झालेला असतो. एकटया आपल्या भारत देशामध्ये सरकारी टॅक्स शिवाय या देशातील मुस्लिम बांधव अब्जावधी रुपये जकात म्हणून दरवर्षी देत असतात. शासकीय कर व धार्मिक कर अशाप्रकारे दुहेरी कर ते आदा करतात. समाजातील अनाथ, विधवा,आजारी रुग्ण व सर्व प्रकारच्या गरजू घटकांना जकातच्या रूपातून मदत दिली जाते. आज मुस्लिम समाजाच्या अनेक गरजा पूर्ण करण्यासाठी आणि या समाजाला देशाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी आर्थिक सुधारणांची खूप गरज आहे.दुर्दैवाने केंद्र सरकार तर मुस्लिम समाजाचे किती हितरक्षण करते हे जगजाहीर आहे. राज्य सरकारकडूनही फार अपेक्षा नाहीत.परंतु जोपर्यंत मुस्लिम समाजाला देशाच्या मुख्य प्रवाहामध्ये सामील करून घेऊन इतर घटकांबरोबर विकासाच्या समान संधी मिळत नाहीत,तोपर्यंत हा समाज प्रगती करू शकत नाही.सध्यातरी समाजाच्या मूलभूत गरजा या समाजातील जकातीच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नातून भागविल्या जातात. जकातीची एक आदर्श व्यवस्था इस्लामने जगाला दिलेली आहे. तिचा सुयोग्य वापर करून प्रत्येक समाज आणि देश आपली प्रगती करू शकतो (क्रमशः) **********************

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी