By : Polticalface Team ,10-04-2023
                           
              
  रमजानुल मुबारक - १८
कुरआनचा मानवता संदेश
*✒️सलीमखान पठाण*
               श्रीरामपूर
      
     ९२२६४०८०८२
रमजान महिन्याचा पूर्वार्ध पूर्ण होऊन उत्तरार्ध सुरू झाला आहे.सतरा दिवस कसे निघून गेले ते कळले देखील नाही.आता प्रत्येक घरातील वातावरण रमजानमय झाले आहे.कुरआन शरीफचे दुसऱ्यांदा तर काहींचे तिसऱ्यांदा वाचन सुरु आहे. कुरआन मध्ये अल्लाहने असे ही म्हटले आहे कि - अजाणतेपणामुळे झालेल्या चुका अल्लाह माफ करील पण जाणूनबुजून,मुद्दामहून केलेल्या चुकांना माफी नाही,कुणीही कुणाचे गुन्हयाचे ओझे उचलू शकणार नाही,ज्याचा भार त्यालाच पेलावा लागेल.अल्लाहचे आदेश उपदेश रुपाने लोकांपर्यंत पोहोचवा गरीबी व दारिद्रयाच्या भितीने आपल्या मुलामुलींची हत्या करू नका , ज्या गोष्टीचे ज्ञान नाही तिच्या मागे धावू नका,निराधार व अस्पष्ट कामांच्या मागे लागू नका,परवानगी शिवाय कुणाच्याही घरात प्रवेश करू नका,जीवनाकडे दुर्लक्ष करू नका,जे अल्लाह वर यकीन
(विश्वास) ठेवतील, अल्लाह त्यांचे सरंक्षण करील.जमीनीवर सावकाश व आरामात चला,अल्लाह सोबत कुणालाही सामिल करु नका,समलैंगिक संबंधापासून नेहमी दूर रहा,चांगल्या कामाचा नेहमी उपदेश करा, वाईट कामाची मनाई करा,जमिनीवर गर्वाने चालू नका,अल्लाह शिर्क (अल्लाह समान अन्य कुणाला सामिल करणे) शिवाय सर्व गुन्हे माफ करील,वाईटाला चांगल्याने नामशेष करा, विचारविनिमय (मशवरा) करुन कामे हाती घ्या, ज्ञानी लोक अल्लाहच्या दृष्टीने श्रेष्ठ आहेत, इतरांशी उचित सदवर्तन करा,चुका झाल्यास अल्लाहची माफी मागा, तो दयालु व माफ करणारा आहे.अशा प्रकारच्या मानवतेशी निगडीत खूप सूचना (हिदायात) कुरआन मध्ये अल्लाहने केल्या आहेत.या सर्व सूचनांचा प्रत्येक व्यक्तिने आपल्या दैनंदिन जीवनात वापर केल्यास जगातून सर्व प्रकारची दुष्कृत्ये नामशेष होतील.यासाठी प्रत्येकाने या सूचना अंगीकारल्या पाहिजेत. 
भारतासारख्या बहुधर्मिय देशात अनेक चालीरितींची सरमिसळ होऊन त्या रुढ झाल्या आहेत.मात्र यातील चांगल्यांचा स्विकार व वाईटांचा इन्कार करुन आपले जीवन ईतरांना व स्वतःला ही प्रेरणादायी वाटेल असे वर्तन प्रत्येक स्त्री पुरुषांकडून होणे अपेक्षित आहे.     
कुरआन हा दैवी ग्रंथ फक्त मुस्लीमांसाठी नाही तर जगभरातील समस्त मानवजातीसाठी आहे व तो जगाच्या प्रत्येक भाषेत उपलब्ध आहे. जगात कोटयावधी लोक आज कुरआन चा अभ्यास करीत आहेत. त्याचा अर्थ समजाऊन घेत आहेत. त्यात सांगीतलेल्या बाबींची पडताळणी करून घेत आहेत.त्याप्रमाणे आचरण करीत आहेत. प्रत्येक गोष्टीशी संबंधित मार्गदर्शन कुरआन मध्ये सामावलेले आहे.
कुरआन हा जीवनाचा गाईड असून प्रत्येकाने तो समजून घेण्याची गरज आहे. दरवर्षी लाखोंच्या संख्येने लोक कुरआनच्या मार्गदर्शनाचा लाभ घेत आहेत.
 तरावीहच्या नमाज मध्ये दरवर्षी संपूर्ण कुरआन शरीफ चे वाचन आणि पठण केले जाते.ही साडे चौदाशे वर्षांची परंपरा आहे.त्यामाध्यमातून कुरआनचा संदेश आणि त्यामध्ये अल्लाहतआला ने मानव जातीसाठी केलेले मार्गदर्शन समजून घेतले जाते.मानव जातीच्या कल्याणासाठी हा दैवी ग्रंथ अल्लाहने पाठवला.यामध्ये दैनंदिन जीवनामध्ये निर्माण होणाऱ्या सर्व प्रश्नांची उकल नमूद केली आहे. पण त्यासाठी वारंवार कुरआन पठण करून, त्यावर चिंतन करून तो समजून घेण्याची आवश्यकता आहे. आपल्या हातून कोणत्याही प्रकारची चूक घडायला नको. त्यासाठी कुरआनच्या दिव्य प्रकाशामध्ये प्रश्न सोडवले गेले पाहिजे. हजरत पैगंबरांच्याकाळात त्यांचे अनुयायी (सहाबा) कुरआनला खूप समजून घेत.एकट्या सूरए बकरा चे आकलन करून घेण्यासाठी त्यांना आठ वर्ष लागल्याची नोंद इतिहासात आहे. ते दररोज आठ-दहा आयत पठण करीत.त्यांचा अर्थ समजून घेत.त्याच्यावर स्वतः अंमल करीत. आणि मग पुढचे पाठ सुरू होत. केवळ तरावीहमध्ये कुरआन पठण केल्यामुळे त्याचे हक्क आदा होत नाही. कुरआनमध्ये अल्लाह तआला ने दिलेली शिकवण प्रत्येकाने प्रत्यक्ष आचरणात आणली पाहिजे. जगातील प्रत्येक मानवासाठी हा ग्रंथ आहे.जर आपण त्यातील अल्लाहच्या आदेशाप्रमाणे वागायला सुरुवात केली तर या जगामध्ये कोणताही प्रश्न शिल्लक राहणार नाही. दुर्दैवाने हे घडत नाही.वेगळे विचार, वेगळे आचार यामुळे मूळ प्रश्न समजून न घेता प्रत्येक जण आपल्या पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करतो. आम्ही मनमानी जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. प्रत्यक्षात रब चाही जिंदगी व्यतीत करण्याची आवश्यकता आहे.त्यासाठी वारंवार कुरआन समजून घेऊन त्याचा अर्थ आत्मसात करण्याची आवश्यकता आहे.समाजामध्ये घडणाऱ्या वाईट घटनांबद्दल कुराणमध्ये कठोर शिक्षा सांगितलेली आहे.आजही अनेक वाईट घटना घडतात. परंतु गुन्हेगारांना शिक्षा करण्याऐवजी त्यांना वाचविण्याचे प्रयत्न होतात. यामुळे जे पीडित आहेत,त्यांच्यावर अन्याय केला जातो. अल्लाहच्या नजरेत हा न्याय नाही.जेव्हा अन्याय आणि अत्याचार वाढतात.त्यावेळी पृथ्वीवर कोरोना सारखी संकटे,भूकंप,अतिवृष्टी, वादळे, मोठे अपघात, अग्नितांडव अशा घटना घडतात.त्यासाठी आपल्या जीवनामध्ये कुरआन शरीफचा अंगीकार करून त्यामधील मार्गदर्शनाप्रमाणे जीवन जगण्याचा संकल्प सर्वांनी करण्याची आवश्यकता आहे.अल्लाहतआला आम्हाला आमच्या जीवनामध्ये सत्य मार्ग स्वीकारण्याची सुबुद्धी देवो.आमीन.(क्रमशः)
*********************
              
              
वाचक क्रमांक :
							प्रकाश म्हस्के 
							संपादक 							
 
  स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
      
   
														  
  भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती  
  							  
  श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
  							  
  भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
      
   
														  
  भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
  							  
  कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात. 
  							  
  कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न 
      
   
														  
  त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी 
  							  
  श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला  भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
  							  
  दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
      
   
														  
  निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
  							  
  बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. 
  							  
  लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना. 
      
   
														  
  पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे 
  							  
  पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट 
  							  
  दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
      
   
														  
  लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
  							  
  दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई 
  							  
  श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
      
   
														  
  श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष