रमजानुल मुबारक - १८ *कुरआनचा मानवता संदेश*

By : Polticalface Team ,11-04-2023

रमजानुल मुबारक - १८ *कुरआनचा मानवता संदेश* रमजानुल मुबारक - १८
कुरआनचा मानवता संदेश
*✒️सलीमखान पठाण*
श्रीरामपूर
९२२६४०८०८२
रमजान महिन्याचा पूर्वार्ध पूर्ण होऊन उत्तरार्ध सुरू झाला आहे.सतरा दिवस कसे निघून गेले ते कळले देखील नाही.आता प्रत्येक घरातील वातावरण रमजानमय झाले आहे.कुरआन शरीफचे दुसऱ्यांदा तर काहींचे तिसऱ्यांदा वाचन सुरु आहे. कुरआन मध्ये अल्लाहने असे ही म्हटले आहे कि - अजाणतेपणामुळे झालेल्या चुका अल्लाह माफ करील पण जाणूनबुजून,मुद्दामहून केलेल्या चुकांना माफी नाही,कुणीही कुणाचे गुन्हयाचे ओझे उचलू शकणार नाही,ज्याचा भार त्यालाच पेलावा लागेल.अल्लाहचे आदेश उपदेश रुपाने लोकांपर्यंत पोहोचवा गरीबी व दारिद्रयाच्या भितीने आपल्या मुलामुलींची हत्या करू नका , ज्या गोष्टीचे ज्ञान नाही तिच्या मागे धावू नका,निराधार व अस्पष्ट कामांच्या मागे लागू नका,परवानगी शिवाय कुणाच्याही घरात प्रवेश करू नका,जीवनाकडे दुर्लक्ष करू नका,जे अल्लाह वर यकीन (विश्वास) ठेवतील, अल्लाह त्यांचे सरंक्षण करील.जमीनीवर सावकाश व आरामात चला,अल्लाह सोबत कुणालाही सामिल करु नका,समलैंगिक संबंधापासून नेहमी दूर रहा,चांगल्या कामाचा नेहमी उपदेश करा, वाईट कामाची मनाई करा,जमिनीवर गर्वाने चालू नका,अल्लाह शिर्क (अल्लाह समान अन्य कुणाला सामिल करणे) शिवाय सर्व गुन्हे माफ करील,वाईटाला चांगल्याने नामशेष करा, विचारविनिमय (मशवरा) करुन कामे हाती घ्या, ज्ञानी लोक अल्लाहच्या दृष्टीने श्रेष्ठ आहेत, इतरांशी उचित सदवर्तन करा,चुका झाल्यास अल्लाहची माफी मागा, तो दयालु व माफ करणारा आहे.अशा प्रकारच्या मानवतेशी निगडीत खूप सूचना (हिदायात) कुरआन मध्ये अल्लाहने केल्या आहेत.या सर्व सूचनांचा प्रत्येक व्यक्तिने आपल्या दैनंदिन जीवनात वापर केल्यास जगातून सर्व प्रकारची दुष्कृत्ये नामशेष होतील.यासाठी प्रत्येकाने या सूचना अंगीकारल्या पाहिजेत. भारतासारख्या बहुधर्मिय देशात अनेक चालीरितींची सरमिसळ होऊन त्या रुढ झाल्या आहेत.मात्र यातील चांगल्यांचा स्विकार व वाईटांचा इन्कार करुन आपले जीवन ईतरांना व स्वतःला ही प्रेरणादायी वाटेल असे वर्तन प्रत्येक स्त्री पुरुषांकडून होणे अपेक्षित आहे. कुरआन हा दैवी ग्रंथ फक्त मुस्लीमांसाठी नाही तर जगभरातील समस्त मानवजातीसाठी आहे व तो जगाच्या प्रत्येक भाषेत उपलब्ध आहे. जगात कोटयावधी लोक आज कुरआन चा अभ्यास करीत आहेत. त्याचा अर्थ समजाऊन घेत आहेत. त्यात सांगीतलेल्या बाबींची पडताळणी करून घेत आहेत.त्याप्रमाणे आचरण करीत आहेत. प्रत्येक गोष्टीशी संबंधित मार्गदर्शन कुरआन मध्ये सामावलेले आहे. कुरआन हा जीवनाचा गाईड असून प्रत्येकाने तो समजून घेण्याची गरज आहे. दरवर्षी लाखोंच्या संख्येने लोक कुरआनच्या मार्गदर्शनाचा लाभ घेत आहेत. तरावीहच्या नमाज मध्ये दरवर्षी संपूर्ण कुरआन शरीफ चे वाचन आणि पठण केले जाते.ही साडे चौदाशे वर्षांची परंपरा आहे.त्यामाध्यमातून कुरआनचा संदेश आणि त्यामध्ये अल्लाहतआला ने मानव जातीसाठी केलेले मार्गदर्शन समजून घेतले जाते.मानव जातीच्या कल्याणासाठी हा दैवी ग्रंथ अल्लाहने पाठवला.यामध्ये दैनंदिन जीवनामध्ये निर्माण होणाऱ्या सर्व प्रश्नांची उकल नमूद केली आहे. पण त्यासाठी वारंवार कुरआन पठण करून, त्यावर चिंतन करून तो समजून घेण्याची आवश्यकता आहे. आपल्या हातून कोणत्याही प्रकारची चूक घडायला नको. त्यासाठी कुरआनच्या दिव्य प्रकाशामध्ये प्रश्न सोडवले गेले पाहिजे. हजरत पैगंबरांच्याकाळात त्यांचे अनुयायी (सहाबा) कुरआनला खूप समजून घेत.एकट्या सूरए बकरा चे आकलन करून घेण्यासाठी त्यांना आठ वर्ष लागल्याची नोंद इतिहासात आहे. ते दररोज आठ-दहा आयत पठण करीत.त्यांचा अर्थ समजून घेत.त्याच्यावर स्वतः अंमल करीत. आणि मग पुढचे पाठ सुरू होत. केवळ तरावीहमध्ये कुरआन पठण केल्यामुळे त्याचे हक्क आदा होत नाही. कुरआनमध्ये अल्लाह तआला ने दिलेली शिकवण प्रत्येकाने प्रत्यक्ष आचरणात आणली पाहिजे. जगातील प्रत्येक मानवासाठी हा ग्रंथ आहे.जर आपण त्यातील अल्लाहच्या आदेशाप्रमाणे वागायला सुरुवात केली तर या जगामध्ये कोणताही प्रश्‍न शिल्लक राहणार नाही. दुर्दैवाने हे घडत नाही.वेगळे विचार, वेगळे आचार यामुळे मूळ प्रश्न समजून न घेता प्रत्येक जण आपल्या पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करतो. आम्ही मनमानी जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. प्रत्यक्षात रब चाही जिंदगी व्यतीत करण्याची आवश्यकता आहे.त्यासाठी वारंवार कुरआन समजून घेऊन त्याचा अर्थ आत्मसात करण्याची आवश्यकता आहे.समाजामध्ये घडणाऱ्या वाईट घटनांबद्दल कुराणमध्ये कठोर शिक्षा सांगितलेली आहे.आजही अनेक वाईट घटना घडतात. परंतु गुन्हेगारांना शिक्षा करण्याऐवजी त्यांना वाचविण्याचे प्रयत्न होतात. यामुळे जे पीडित आहेत,त्यांच्यावर अन्याय केला जातो. अल्लाहच्या नजरेत हा न्याय नाही.जेव्हा अन्याय आणि अत्याचार वाढतात.त्यावेळी पृथ्वीवर कोरोना सारखी संकटे,भूकंप,अतिवृष्टी, वादळे, मोठे अपघात, अग्नितांडव अशा घटना घडतात.त्यासाठी आपल्या जीवनामध्ये कुरआन शरीफचा अंगीकार करून त्यामधील मार्गदर्शनाप्रमाणे जीवन जगण्याचा संकल्प सर्वांनी करण्याची आवश्यकता आहे.अल्लाहतआला आम्हाला आमच्या जीवनामध्ये सत्य मार्ग स्वीकारण्याची सुबुद्धी देवो.आमीन.(क्रमशः) *********************

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी