रमजानुल मुबारक -२१ *जे पेराल ते उगवेल*

By : Polticalface Team ,13-04-2023

रमजानुल मुबारक -२१      

*जे पेराल ते उगवेल*   
रमजानुल मुबारक - २१
जे पेराल ते उगवेल
*✒️सलीमखान पठाण*
श्रीरामपूर
९२२६४०८०८२
रमजान महिन्याचा तिसरा आणि शेवटचा भाग काल सायंकाळपासून सुरु झाला आहे.याला जहन्नुम पासून मुक्तीचा काळ संबोधले जाते. रमजानचा हा शेवटचा भाग खूप महत्वाचा आहे.या दहा दिवसात दररोज रात्री अधिक काळ प्रार्थना करुन अल्लाहची मर्जी संपादन करण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे. या महिन्याच्या शेवटच्या भागात लैलतुल कद्र ही एक अशी रात्र आहे कि या रात्री केलेल्या प्रार्थनेचे पुण्य हे हजार महिन्यांच्या पुण्यासमान आहे.पण ती रात्र नेमकी कोणती हे अल्लाहने गुप्त ठेवले आहे. शेवटच्या खंडातील २१ते २९ तारखा दरम्यान विषम संख्येतील ती एक रात्र आहे.म्हणून दहाच्या दहा रात्री जर आपण थोडी अधिक प्रार्थना केली तर बिघड़लं कुठं ? अल्लाहने आपल्याला दिलेले जीवन सत्कारणी लावण्यासाठी आपण सद्वर्तन,सद् विचार, सदाचाराने जगणे आवश्यक आहे. आपण जे इतरांना दयाल ते तशीच परतफेड करतील म्हणून जीवनात प्रत्येक कार्य करतांना मनात हा विचार असावा. व्यापार,व्यवहार,वर्तन या सर्व बाबतीत काळजी घेणे आवश्यक आहे. व्यवहारात खोटेपणा, फसवणूक असे प्रकार करू नये,कारण ज्याला फसवले जाते त्याची हाय किंवा तळतळाट ज्याला बददुआ म्हणतात,ती चांगली नसते. व्यवहारात सचोटी नसल्यास माणसे जीवनातून उठतात. दिलेले शब्द पाळणे व आपल्यावर केलेल्या उपकारांची जाणिव ठेवणे आवश्यक आहे. कृतज्ञता बाळगल्याने आत्मशांती प्राप्त होते तर कृतघ्नपणा केल्याने मनोशiती भंग पावते.जे पेराल ते उगवेल या न्यायाने आपण केलेल्या कामाचा तसाच मोबदला आपणास मिळत असतो.यासाठी ईश्वराशी नाते जोडुन सत्य आणि सचोटीची कास धरल्यास जीवन यशस्वी होते. एका राजाने आदल्या दिवशी घोषणा केली कि उद्या सकाळी दरबारात येऊन कोणी ही व्यक्ति ज्या वस्तूला हात लावील ती त्याची होईल.हे ऐकून प्रत्येक जण विचार करु लागला कि मी सोने, चांदी,नाणे, महाल घेईल. एक खूपच दरिद्री माणूस दरबारात आला व त्याने राजालाच हात लावला. आता राजाच त्याचा झाल्याने राजाची प्रत्येक वस्तू त्याची झाली. याप्रमाणे या सृष्टीचा जो राजा आहे तो ईश्वर / अल्लाह,त्याला आपले केले तर सर्व जग आपले होणार आहे.तेव्हा त्याला आपले करण्याचा जो काही मार्ग आहे तो आपण अंगीकारल्यास सर्व काही आपले होईल हे ध्यानात घ्यावे. पवित्र रमजान महिन्याचा दुसरा अशरा संपन्न काल संपन्न झाला. मगफिरत अर्थात माफीचा हा कालखंड प्रत्येकाने आपल्या कृत्यांबद्दल अल्लाहची माफी मागून व्यतीत केला आहे. आपल्याकडून घडणारे प्रमाद हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात.काही चुका मुद्दाम केल्या जातात,काही अनावधानाने होतात.कोणी कशाप्रकारे चुका केल्या हे परमेश्वर चांगल्या प्रकारे जाणतो. अनावधानाने झालेल्या चुका तो माफ करतो. परंतु जाणून-बुजून, मुद्दामहून केलेल्या चुकांची माफी अल्लाह सुद्धा देत नाही.आपण जर ठरवून कुणाची निंदा-नालस्ती केली तर संबंधित व्यक्ती जोपर्यंत आपल्याला माफ करीत नाही तो पर्यंत अल्लाह सुद्धा तो गुन्हा माफ करणार नाही.एखाद्याला चुकीचे सिद्ध करण्यासाठी कुणी षड्यंत्र रचले असेल तर त्यात तो स्वतः अडकतो. हजरत पैगंबरांनी म्हटले आहे कि कुणालाही कमी लेखू नका.कुणाची निंदा करू नका.ज्याचा त्याचा हिशोब ज्याला त्याला आखेरत मध्ये द्यावा लागणार आहे. त्यामुळे इतरांची चिंता आपण करू नये.आपले आत्मपरीक्षण करावे. अल्लाहच्या प्रती नेहमी कृतज्ञताभाव (शुक्रगुजारी) आपल्या मनात असला पाहिजे. आपण सदैव कृतघ्नपणा (नाशुक्री)करीत असतो.अल्लाहतआला हा आपल्या भक्तांवर खूप प्रेम करतो.सत्तर मातांपेक्षा जास्त प्रेम करतो.आपण त्याला विसरून जातो.तो आपल्याला विसरत नाही.आपण अडचणीत सापडल्यावर देवाचा धावा करतो.तो मात्र दररोज आपल्यावर प्रेम करीत असतो.आपल्या सर्व गरजा पूर्ण करीत असतो.आपल्याला तंदुरुस्त ठेवतो.एक छोटासा जरी आजार झाला तरी आपली अवस्था बिकट होते. शरीराच्या प्रत्येक अवयवावर त्याची कृपा आहे.जे आंधळे आहेत त्यांना उजेडाचे महत्त्व समजते.जे अपंग आहेत त्यांना धडधाकटपणाचे महत्त्व समजते.तेव्हा आपण सातत्याने नेहमी सदैव अल्लाहची कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. रमजान महिन्याच्या या कालखंडामध्ये ही दुआ प्रामुख्याने मागितली जाते कि,ऐ अल्लाह,तू माफ करणारा आहे, माफिस पसंत करतो, मलासुद्धा माफ कर. ज्याच्या मनामध्ये कृतज्ञता असते तो दयाळू असतो. त्याच्या आचार आणि विचारात दयाभाव असतो. इतरांना मदत करतो. आणि मदत करून अल्लाहशी जवळीक (कुर्ब) साधीत असतो.रमजान महिन्यात आपण सुद्धा मनोभावे त्याचे आभार व्यक्त केले पाहिजे. आपल्या आचरणाने कायमस्वरूपी त्याच्याबद्दलची कृतज्ञता केवळ शाब्दिक नव्हे तर आपल्या वागण्यातून, चालण्यातून, बोलण्यातून सिद्ध केली पाहिजे.चांगले केले तर चांगले होणार आहे.ही श्रद्धा मनामध्ये ठेवून प्रत्येकाने वागले पाहिजे. अल्लाहतआला ला सुद्धा हेच अभिप्रेत आहे. हजरत पैगंबरांनी जो मार्ग आपल्याला दाखवला आहे, त्या मार्गानुसारच आपण आचरण केले पाहिजे. तरच आपली सुटका होणार आहे. हे प्रत्येकाने ध्यानात ठेवले पाहिजे.(क्रमशः)

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी