काही दृष्ट प्रवृत्तीच्या लोकांनी स्वार्थ साधण्यासाठी कधी बापू तर कधी आमदार पाचपुते यांचा आधार घेतला.

By : Polticalface Team ,15-04-2023

काही दृष्ट प्रवृत्तीच्या लोकांनी स्वार्थ साधण्यासाठी कधी बापू तर कधी आमदार पाचपुते यांचा आधार घेतला. श्रीगोंदा तालुक्याच्या राजकारणात काही वाईट प्रवृत्तीच्या व्यक्तींनी धुडगूस घालत बनवाबनवी करून गावोगावी दूषित वातावरण करत आहेत. त्यांना वेळीच लगाम घालण्याची नितांत गरज असल्याचे प्रखड मत आमदार बबनराव पाचपुते यांनी श्रीगोंदा येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात व्यक्त केले आहे. श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक पार्श्वभूमीवर आमदार बबनराव पाचपुते, राजेंद्र नागवडे, बाबासाहेब भोस यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा येथे विविध संस्था पदाधिकाऱ्यांचा भव्य शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते हे होते. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आमदार पाचपुते पुढे म्हणाले की, बाजार समितीची निवडणूक शेवटच्या टप्प्यावर आलेले आहे. बाजार समितीला खरे रूप दाखवण्यासाठी या निवडणुकीत पक्षविरहित आम्ही योग्य चर्चा केलेली आहे. सद्यस्थिताीला राजकारणाची दिशा बदलत असताना वाईट प्रवृत्तींनी चांगल्या संस्थेत राजकारण करत धुडगूस सुरू केलेला आहे. असे सांगून आमदार पाचपुते पुढे म्हणाले की 40 वर्ष आपण राजकारण करत असताना गलिच्छ राजकारण केले नाही. शिवाजीराव नागवडे बापू मी एकमेकांच्या विरोधात उभे राहिलो. परंतु तिथेच आम्ही एकमेकांच्या सुखदुःखात कायम राहिलो. ती परिस्थिती तालुक्यात राहिलेली नाही. मोकळ्या मनाने आम्ही एकत्र आलेलो असून, कार्यकर्त्यांनी गडबडून जाण्याचे कारण नाही. राजेंद्र नागवडे, बाबासाहेब भोस, आणि मी या निवडणुकीत जो उमेदवार देतील त्याचे प्रामाणिकेपणे काम करावे भरघोस मतांनी उमेदवार निवडून आणावेत निश्चितपणे जिल्ह्यात बाजार समितीचा आदर्शवत असा कारभार करू, मी फुटणार नाही आणि कुणालाही फूटू देणार नाही, अशी शपथ यावेळी प्रत्येक कार्यकर्त्यांना देऊन माफक सल्लादेखील आमदार पाचपुते यांनी यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना दिला यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस यावेळी म्हणाले की, चांगल्या संस्थेत राजकारण नको, म्हणून आम्ही दोन महिन्यापूर्वी खरेदी-विक्री संघाचे निवडणूक सर्व पक्षांनी एकत्रित बिनविरोध करण्याची संकल्पना मांडली. त्याला सर्वांनीच पाठिंबा दिला परंतु त्या निवडणुकीत देखील दृष्ट प्रवृत्तीच्या लोकांनी गद्दारी केली. आणि आमचे उमेदवार या निवडणुकीत पराभूत केले. त्याच क्षणी आमच्या लक्षात आले तालुक्यातील या दृष्ट प्रवृत्तींना दूर ठेवावे लागेल. असे सांगून श्री भोस पुढे म्हणाले की, शब्दाला तिलांजली देणाऱ्यांबरोबर कोणत्याच निवडणुकीत युती नको. असा संकल्प आम्ही सर्वांनी केला. असे सांगून ते पुढे म्हणाले की आमदार पाचपुते यांच्या बोटाला धरून ज्यांना अनेक पदे मिळाली त्यांनीदेखील आमदार पाचपुते यांचा विश्वासघात केला. यापुढे या दृष्ट प्रवृत्तीच्या हातात बाजार समितीची सूत्रे दिल्यास निश्चितपणे बाजार समितीला टाळे ठोकावे लागतील. त्यामुळे सभासदांनी आमदार पाचपुते, राजेंद्र नागवडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीचा बदला या निवडणुकीच्या माध्यमातून घ्यावा लागणार आहे. विरोधकांनी देखील आता स्वतःची ताकद या निवडणुकीत दाखवावी अन्यथा आम्ही तरी आमची ताकद दाखवून देऊ असा इशाराही भोस यांनी यावेळी दिला. यावेळी नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे यावेळी बोलताना म्हणाले की, तालुक्याच्या जडणघडणीत खऱ्या अर्थाने आमदार पाचपुते व शिवाजीराव नागवडे बापू यांनी सर्वसामान्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी रात्रंदिवस कष्ट घेतले. आधार देण्याचे काम केले. मात्र काही दृष्ट प्रवृत्तीच्या लोकांनी स्वार्थ साधण्यासाठी कधी बापू तर कधी आमदार पाचपुते यांचा आधार घेऊन तालुक्यात बनवाबनवी चे राजकारण केले. नुकत्याच खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत विश्वासघात करून गलिच्छ राजकारण केल्यामुळे सर्वसामान्य माणूस संतापले आहेत. बाजार समितीच्या निवडणुकीत मतदारांना अमिष दाखविण्याचा प्रयत्न होणार आहे. त्याला कोणीही बळी पडू नये, असे सांगून श्री नागवडे पुढे म्हणाले की तालुक्याचे राजकारण दूषित करण्यासाठी नहाटा यांनी कधी पवार, विखे व आम्हाला फक्त स्वार्थासाठी जवळ केले. त्यामुळे आम्ही वेळीच सावध होऊन सर्वांनी या दृष्ट प्रवृत्तींना बाजूला करण्यासाठी एकत्र आलो आहोत. सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी एकसंघ आहोत. प्रत्येकाला गंडा घालणाऱ्या व्यक्तींना या निवडणुकीच्या माध्यमातून दूर करण्यासाठी आम्ही हा एक मताने निर्णय घेतला असल्याचे नागवडे यांनी सांगितले. यावेळी प्रामुख्याने दत्तात्रय पानसरे, बंडोपंत पंधरकर, प्रकाश बोरुडे, श्री कातोरे, पोपटराव खेतमाळीस, रामदास झेंडे, अरुणराव पाचपुते, अॅड. बाळासाहेब काकडे, अॅड. डी डी घोरपडे, भगवानराव पाचपुते आदींनी मनोगत व्यक्त करत विरोधकांचा चांगला समाचार घेतला. उपस्थित कार्यकर्त्यांचे प्रतापसिंह पाचपुते आभार यांनी मानले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी