संविधान निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर,यांचा बहुजनांना संदेश, शिका संघटित व्हा संघर्ष करा,? प्रा, रवींद्र चव्हाण, यांचे स्पष्टीकरण

By : Polticalface Team ,17-04-2023

संविधान निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर,यांचा बहुजनांना संदेश, शिका संघटित व्हा संघर्ष करा,? प्रा, रवींद्र चव्हाण, यांचे स्पष्टीकरण दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड ता,१६ एप्रिल २०२३ रोजी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त,डॉ बाबासाहेब आंबेडकर कार्यकारी समिती पुणे जिल्हा यांच्या वतीने दौंड पुरंदर हवेली या तीनही तालुक्यातील मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका पत्रकार, सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील तसेच उरुळी कांचन परिसरातील अंगणवाडी सेविका, असे ऐकून साठ हुन अधिक बहुजन समाजातील मुख्याध्यापक शिक्षक शिक्षित बांधवांच्या कार्याची दखल घेऊन पुणे जिल्हा कार्यकारी समितीच्या वतीने (आदर्श शिक्षक पुरस्कार) तसेच (समाज भूषण पुरस्कार) विचार पीठा वरील अध्यक्ष, प्रा.रवींद्र चव्हाण, व दौंड तालुका माजी आमदार रमेश आप्पा थोरात यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ टिपणी पुस्तिका सन्मानपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले, यामध्ये दौंड तालुक्यातील मौजे बोरिऐंदी गावचे जेष्ठ पत्रकार एम जी शेलार, मौजे यवत गावातील पत्रकार अनिल रघुनाथ गायकवाड, शिक्षक सतिश सावंत सर, नंदादेवी गावचे माजी सरपंच हरिचंद्र राजाराम चव्हाण, यांना समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दि १६ एप्रिल २०२३ रोजी कस्तुरी हॉल उरुळी कांचन तालुका हवेली जिल्हा पुणे येथे सत्कार मार्गदर्शन समारंभ कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा कार्यकारणी समितीच्या वतीने करण्यात आले होते, या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.रवींद्र चव्हाण,मा संचालक बार्टी महाराष्ट्र राज्य, तसेच प्रमुख उपस्थिती मा.संचालक अध्यक्ष पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, दौंड तालुका माजी आमदार मा,रमेश आप्पा थोरात, यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार व समाज भूषण पुरस्कार देण्यात आले, या वेळी दिपक कांबळे जनरल मॅनेजर युनियन बँक मुंबई, अँड अविनाश जगताप, एवरेस्ट स्पन पाईप इंडस्ट्री, डॉ,बाबासाहेब आंबेडकर कार्यकारी समिती पुणे जिल्हा अध्यक्ष,भिमराव दिवार, एम जी शेलार, उपाध्यक्ष, रा,वि,शिशुपाल सचिव, विजय दादू रोकडे उपसचिव, कस्तुरी प्रतिष्ठान अध्यक्ष, मिलिंद मेमाणे, माध्यमिक शिक्षण संघ पुणे जिल्हा, उपाध्यक्ष अशोक नाळे, संपत कांचन सामाजिक कार्यकर्ते, विचार पिठावर उपस्थित होते, पुणे जिल्हा कार्यकारी समितीचे अध्यक्ष भिमराव धिवार यांच्या हस्ते उपस्थित विचार पीठावरील मान्यवरांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. विचार पीठावरील प्रमुख उपस्थिती दौंड तालुका माजी आमदार रमेश आप्पा थोरात, तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते क्रांतीसुर्य महात्मा फुले छत्रपती शाहू महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली, १४ एप्रिल डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त या सत्कार मार्गदर्शन समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे देशातील बहुउद्देशीय कार्याचे स्पष्टीकरण करण्यात आले, मा दिपक कांबळे, मा अविनाश जगताप, डॉ प्रकाश पवार,आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले, कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात रवींद्र चव्हाण बोलताना म्हणाले, स्वातंत्र्यापूर्वी शासकीय व खासगी कर्मचारी मजुर कामगार तत्पूर्वी बारा तास काम करत असे, मात्र संविधानाच्या तरतुदीत आठ तास काम करण्याची तरतूद करण्यात आली महिलांना समान वेतन व संधी उपलब्ध करून देण्यात आली, प्रस्तुती काळात पगारी सुट्टी, महिलांना समान हिस्सा देण्याची घटनेत तरतूद असताना देखील, अनेक बहिण भाऊ न्याय मिळण्याच्या अपेक्षित आहेत, त्यामुळे न्याय व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केला जात आहे, पूर्वी राजे महाराजे राणीच्या उदरातून युवराज जन्माला येत असे, मात्र भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून, आपला प्रतिनिधी निवडण्याची संधी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या रूपातून प्रत्येक व्यक्तीला एक मत देण्याचा अधिकार प्राप्त करून देण्यात आला. देशातील व राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतीसाठी पाणी उपलब्ध व्हावे म्हणून विविध ठिकाणी धरणांची निर्मिती करण्याची तरतूद घटनेत करण्यात आली असल्याचे रवींद्र चव्हाण यांनी आपल्या भाषणात बोलताना सांगितले, तसेच संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान प्रमाणे बहुजनांच्या मस्तकातील दुषित विचार अंधश्रद्धेने खुळखुळा झालेला समाज कोणत्या दिशेने वाटचाल करीत आहे असा प्रश्न उपस्थित शिक्षित बांधवांना केला, देश किंवा राज्य चालवणारे प्रस्थापित लोकांन पेक्षा शासकीय पद अधिकारी व कर्मचारी यांच्यावर महत्वाची जबाबदारी असल्याचे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले आहे, जा बहुजनांनो तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा तुम्हाला उद्याची शासनकर्ती जमात बनायचं आहे, बहुजनांची तरुण पिढी ढोल ताशा बडवत आहेत हि मोठी शोकांतिका असल्याची खंत रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केली, दौंड पुरंदर हवेली या तीनही तालुक्यातील मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका पत्रकार गाव पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ बाबासाहेब आंबेडकर कार्यकारी समिती पुणे जिल्हा सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक समितीचे उपसचिव प्रा, विजय दादू रोकडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले,या वेळी प्राचार्य वाळुंज सर,मासाळ सर, विकास डोळस राहुल मोरे, यांच्या सह अदी शिक्षक उपस्थित होते, कार्यक्रमाच्या अंतिम प्रसंगी उपस्थित मान्यवरांना उत्कृष्ट स्नेह भोजनदान करण्यात आले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी