*रमजानुल मुबारक - २६* *क्या पाया,क्या खोया - विचार करा*

By : Polticalface Team ,19-04-2023

*रमजानुल मुबारक - २६*

*क्या पाया,क्या खोया - विचार करा* रमजानुल मुबारक - २६ *क्या पाया,क्या खोया - विचार करा* *✒️सलीमखान पठाण* श्रीरामपूर *9226408082* आज सायंकाळी येणारी रमजानची सत्ताविसावी रात्र ही शब ए कद्र म्हणून सर्वत्र पाळण्यात येते.आज रात्री गेले महिनाभर तरावीह मध्ये पठण करण्यात आलेल्या कुरआन पठणाची सांगता होणार आहे अर्थात कुरआन शरीफचे वाचन,पठन पूर्ण होणार आहे.ही एक महत्त्वपूर्ण घटना आहे. गेले महिनाभर प्रत्येकाने तरावीहच्या माध्यमातून कुरआन पठन पूर्ण केले आहे.ते समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे.आता प्रत्यक्ष त्याचे आपल्या जीवनात आचरण करण्याची गरज आहे. आपल्या जीवनामध्ये प्रत्येक जण विशिष्ट ध्येयापोटी काही ना काही मिळविण्याचा प्रयत्न करीत असतो. पद,प्रतिष्ठा,संपत्ती,सेवा यासाठी सतत धडपडत असतो.या सर्व गोष्टी प्राप्त करताना त्यात नशिबाचा देखील मोठा वाटा असतो.नशीब आपल्या हातात नसलं तरी आपल्यासाठी योग्य प्रकारचा निर्णय लावून घेणे हे आपल्या हातात आहे.त्यासाठी सर्वात मोठे हत्यार म्हणजे दुआ मागणे.असं म्हटलं जातं कि दुआ मोमिन का हथियार है.जिथे सर्व मार्ग संपतात,सर्व प्रयत्न अपुरे पडतात, कोणताही वशिला कामी येत नाही,सगळीकडून निराशा हाती येते, त्यावेळी एक प्रभावी हत्यार आपल्याकडे असते,ते म्हणजे दुआ. ज्यावेळी एखादा त्रस्त माणूस अत्यंत वियोगाने सर्व मार्ग बंद झालेले असताना ईश्वराकडे तन्मयतेने दुआ मागतो. त्यावेळी ईश्वर आणि भक्त या दोघांमध्ये कोणीही नसतं.ती दुआ थेट अर्शपर्यंत जाते.ती जर कबूल झाली तर जगातील कोणती ही ताकद तुम्हाला रोखू शकत नाही.म्हणून या दुनियेमध्ये याच्या त्याच्याकडे हात पसरवण्यापेक्षा ईश्वराच्या दरबारामध्ये हात उंच करा,तेथे मागा आणि आपले प्रयत्न सुरू ठेवा. निश्चितपणे आपले इप्सित साध्य होते. दररोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये माणसाची धावपळ सारखी सुरू असते.तो कधी आराम करीत नाही.सुखाच्या मागे तो धावत असतो. पण हे सर्व करून आपण काय मिळवले याचा तो कधी विचार करीत नाही.एक अपेक्षा पूर्ण झाली की दुसरी अपेक्षा मनात जन्म घेते. मग तिच्या पूर्तीसाठी तो पुन्हा धावपळ करीत असतो.पण हे सर्व व्यर्थ आहे.जे मिळालं ते आपलं आणि जे मिळेल ते ही आपलं.एवढी माफक अपेक्षा ठेवून जर आपण जीवन बसर केले तर नक्कीच मनाचं समाधान झाल्याशिवाय राहत नाही. रमजान महिन्यातील आज सायंकाळी येणारी रात्र ही सत्ताविसावी शब (रात्र) ही शब ए कद्र म्हणून सर्वत्र साजरी केली जाते.रमजान महिन्यातील शेवटच्या तिसर्‍या खंडातील सर्व रात्री या लैलतुल कद्र किंवा शब ए कद्र म्हणून गणल्या जातात. या रात्री केलेल्या प्रार्थनेचे मूल्य एक हजार महिन्यांच्या पुण्य प्राप्ती समान आहे. म्हणून शब ए कद्र मध्ये जास्तीत जास्त प्रार्थना केली जाते. शब ए कद्र च्या रात्रीमध्ये कुरआन शरीफचे अवतरण झालेले असल्याने देखील या रात्रींना खूप महत्त्व आहे.रमजान महिन्यातील शेवटच्या दहा दिवसातील विषम तारखा म्हणजे २१, २३,२५,२७,२९ या रात्री पैकी एक रात्र ही शब ए कद्र आहे.प्रत्येक वर्षी जर ही रात्र एखाद्याला प्राप्त झाली तर दहा वर्षात ८३० वर्ष प्रार्थनेचे पुण्य त्याला प्राप्त होऊ शकते.जे कयामतच्या दिवशी त्याला कामी येईल.धार्मिक श्रध्देने शब ए कद्र प्राप्तीसाठी शेवटच्या चरणात सर्वत्र या रात्रीत अनेक जण प्रार्थना करतात आणि शब ए कदर चा शोध घेतात. रमजान महिन्याचे आता शेवटचे चार दिवस बाकी आहेत.महिनाभर प्रत्येक मुस्लिम घरामध्ये एक वेगळे वातावरण निर्माण झाले आहे.पहाटे सहरी, तीलावत ए कुरआन, नमाज,इफ्तार अशा पद्धतीने एक धार्मिक वातावरण घराघरातून दिसून येते.हे वातावरण महिनाभरच न राहता वर्षभर कायमस्वरूपी करण्याची आवश्यकता आहे. रमजान महिन्यामध्ये सर्व प्रकारच्या वाईट कृत्य पासून दूर राहण्याचा प्रयत्न प्रत्येक जण करीत असतो. भांडण नाही,शिवीगाळ नाही,वाद विवाद नाही, त्यामुळे एक प्रकारची मानसिक शांतता प्राप्त होते.परंतु पूर्ण वर्षभर सर्वांनीच जर या पद्धतीने वागण्याचे ठरवलं तर निश्‍चितपणे एक चांगला समाज अस्तित्वात येईल. यासाठी समाजातील सर्वच घटकांनी जे जे चांगले आहे ते स्वीकारावे, त्याचा अंगीकार करावा आणि आपले जीवन समृद्ध आणि संपन्न करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. रमजान महिना हा व्यक्तीच्या जीवन प्रशिक्षणाचा काळ म्हणून गणला जातो.या महिन्यात आत्मसात केले जाणारे सर्व गुण पुढील वर्षभर जर आपल्यात टिकून राहिले तर नक्कीच आपण मानसिक, आत्मिक दृष्ट्या देखील सुदृढ राहू शकतो. (क्रमशः) -------------------------------------
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष