रमजानुल मुबारक -२७ *हिशोबासाठी तयार रहा*

By : Polticalface Team ,19-04-2023

रमजानुल मुबारक -२७ 

*हिशोबासाठी तयार रहा*    रमजानुल मुबारक -२७ *हिशोबासाठी तयार रहा* *✒️सलीमखान पठाण* श्रीरामपूर *9226408082* रमजान महिन्यातील पवित्र अशी शबेकद्र रात्री संपन्न झाली.महिनाभर तरावीहच्या नमाज मध्ये कुरआन शरीफचे पूर्ण पठन ही पूर्ण झाले. त्यामुळे आता आपली जबाबदारी संपली असे समजून उर्वरित दोन किंवा तीन दिवस तरावीह कडे पाठ फिरवू नये. कुरआन शरीफचे वाचन व पठन पूर्ण होत असतांना रमजान महिना अलविदा होत आहे ही जाणिव प्रत्येकाला होत आहे. कित्येक जणांच्या डोळयात अश्रू दाटले आहेत. रमजान महिना आपल्यातून निघून जात असतांना आपण त्याचे किती पालन केले याचा परामर्श प्रत्येकाने घेण्याची आवश्यकता आहे.अल्लाहने आपल्याला हा महिना दिला मात्र त्याचे पूर्णतः पालन आपण करु शकलो नाही. कुरआन मध्ये अल्लाहने जीवन कसे जगावे याबाबतचे सखोल मार्गदर्शन केले आहे.त्याप्रमाणे जर प्रत्येकाने आपले आचरण ठेवले तर आपले जीवन सार्थ ठरेल. दररोजच्या व्यवहारातील अनेक बाबींबाबत आपल्या कडून कधी मुद्दाम तर कधी अजाणतेपणाने दुर्लक्ष होते.पण असे होणे किंवा करणे योग्य नाही. मोजमापाच्या व्यवहारात देतांना कमी देऊ नका व घेतांना जास्त घेऊ नका कारण तुम्हाला प्रत्येक कृत्याचा हिशोब दयावा लागणार आहे याची जाणिव ठेवूनच प्रत्येकाने वागणे अपेक्षित आहे. रोजच्या जीवनात आपल्याकडून घडणारे प्रत्येक वर्तन हे काळजीपूर्वक केले पाहिजे.जगाचा निर्माता आपल्या प्रत्येक बाबीवर लक्ष ठेवून आहे. त्याचे दोन फरिश्ते आपल्या वर्तनाची प्रत्येक बाब दर क्षणी नोंदवित आहेत याची जाणिव प्रत्येकाने ठेवली पाहिजे. कुरआन मध्ये अल्लाहने म्हटल्याप्रमाणे प्रत्येकाला प्रत्येक बाबीचा हिशोब कयामतच्या दिवशी दयावा लागणार आहे. आपण जे काही कृत्य करतो त्याची नोंद होत असते.भले ते कृत्ये उजेडात करा किंवा गडद अंधारात करा.केलेल्या प्रत्येक कृत्याचा हिशोब किंवा जाब प्रत्येकाला दयावा लागेल याबाबत कुणीही शंका बाळगू नये. अल्लाह किंवा ईश्वराने मानव निर्माण केला. जगातील सर्व मानव सारखेच आहेत. प्रत्येकाला दोन हात, दोन कान,एक नाक, दोन पाय देवाने दिले. जगातील सर्व लोकांच्या रक्ताचा रंग एकच म्हणजे लाल. देवाने माणूस जन्माला घातला.पण या दुनियेने माणसांची विभागणी विविध जातिधर्मात,पंथात केली. बरं *जगातील कोणताही धर्म वाईट शिकवण देत नसतांना माणसं मात्र वाईट वागतात याचेच आश्चर्य वाटते.* मध्यंतरी एक पोस्ट वाचली कि गेल्या वर्षभरात देशात झालेल्या दंगली,संप, मोर्चे, आंदोलने या मुळे देशाचे एक लाख आठशे कोटी रुपयांचे नुकसान झाले. वास्तवतः थोडीशी दूरदृष्टी दाखविली तर हे सर्व टाळता येऊ शकते. दंगली म्हणजे आपल्या देशाला लागलेला शाप होय. यामुळे काहींचा फायदा होत असला तरी समस्त देशाचे, जनतेचे कधीही भरून न येणारे अपरिमित असे नुकसान होते याची जाणिव कुणाला कशी होत नाही याचेच दुःख वाटते. यासाठी प्रत्येकाने नागरिक म्हणून आपली जबाबदारी पार पाडावी म्हणजे या घटना टाळता येऊन माणुसकी दृढ होईल. *समानता म्हणजे नेमकं काय ?* रमजान महिन्याचे तीन किंवा चार दिवस आता शिल्लक आहेत.तीव्र उन्हाच्या झळा सोसत अल्लाहच्या प्रार्थनेच्या ध्येयाने पूर्ण महिन्याचे पालन करण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी केलेला आहे.अगदी नऊ दहा वर्षाच्या मुला मुलींनी देखील पूर्ण रोजे केलेले आहेत.ईश्वरावर असलेल्या अपार श्रद्धेचे हे प्रतीक आहे.अल्लाह तआला सर्व रोजेदारांचे रोजे कबूल करो.आमीन. प्रत्येक समाजाचे आपल्या धर्मानुसार चालीरीती,रूढी,परंपरा यांच्याशी संबंधित काही कायदे आहेत.त्यानुसार समाज आपली वाटचाल करीत असतो.विवाह, मृत्यु,व्यवहार यांचे सुद्धा काही नियम प्रत्येक समाजाने आपल्या धर्मानुसार निर्माण केलेले आहेत.कुरआन शरीफनुसार प्रत्येक मुस्लिमाने कसे जगावे आणि कसे जीवन व्यतीत करावे यासाठी काही नियम घालून दिलेले आहेत. त्यानुसार इस्लामी शरीयत कायदा तयार झाला आहे व त्याप्रमाणे प्रत्येक मुस्लिमाने आपले आचरण ठेवावे अशी अपेक्षा आहे.आपल्या बहुधर्मीय देशात विवाह आणि घटस्फोट याबाबत विविध धर्माचे वेगवेगळे नियम आहेत तसेच मृत्यू नंतर अंत्यविधीचे वेगवेगळे प्रकार आहेत. प्रत्येक समाजाच्या चालीरीती सुद्धा वेगळ्या आहेत.आजपर्यंत सर्व जण त्याप्रमाणे आपले आचरण,वर्तन करीत आहेत.एका धर्माच्या चालीरीतीचा दुसऱ्या धर्मावर कोणताही परिणाम झालेला नाही. गुण्यागोविंदाने सर्व देशवासी राहत आहेत. एक देश म्हणून देशवासियांसाठी भारतीय घटनेनुसार काही कायदे समान केलेले आहेत.गृह खात्याशी संबंधित कायदे देशाच्या सर्वधर्मीय नागरिकांना लागू आहेत.त्यामुळे वेगवेगळ्या धर्माच्या शिक्षा वेगळ्या असल्या तरी आपल्या देशात त्या लागू होत नाहीत. उदाहरणार्थ इस्लामी राजवटीमध्ये चोरी करणे,बलात्कार करणे, खून करणे अशा गुन्ह्यांना ज्या शिक्षा आहेत,त्या आपल्या देशातील घटनेने देशवासीयांना लागू केलेल्या नाहीत. फसवणुकीसाठी जी शिक्षा इस्लामी कायद्यात आहे,भारतीय कायद्यात ती नाही.सर्व भारतीयांसाठी वेगळे नियम आहेत.असे असताना देखील कधी कधी समान नागरी कायदा या विषयाची चर्चा होत असते. जवळजवळ ९८ टक्के भारतीयांना एकच कायदा लागू आहे.फक्त विवाह आणि वारसा हक्क यांचे कायदे प्रत्येक धर्मानुसार वेगळे आहेत. सर्व देशवासियांसाठी समान कायदा हवा याबाबत कोणाचे दुमत असण्याचे कारण नाही. पण काही संवेदनशील विषयांबाबत व्यापक चर्चेतून निर्णय झाले पाहिजे.मुस्लिमांमध्ये बहुपत्नीत्वाचा कायदा अस्तित्वात आहे.त्याला सातत्याने विरोध होत असतो.परंतु तो कायदा आहे त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी किती लोक करतात यावर ही संशोधन झाले पाहिजे म्हणजे वस्तुस्थिती स्पष्ट होईल.एकीकडे दुसरी पत्नी करू नये असा काही धर्मात नियम आहे पण मग अनैतिक संबंध ठेवलेले चालतात का ? याबाबतही नियम झाले तर सर्वांना समान सूत्रात गुंफणे योग्य होईल. (क्रमशः) ------------------------------------
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी