उजनी परिसरात झालेल्या अवकाळी तसेच तुफानी वादळी वाऱ्यामुळे केळीच्या बागा भुई सपाट तर अनेकांचे घरावरील पत्रे उडाली शेतकरी आता मदतीच्या प्रतीक्षेत

By : Polticalface Team ,29-04-2023

उजनी परिसरात झालेल्या अवकाळी तसेच तुफानी वादळी वाऱ्यामुळे केळीच्या बागा भुई सपाट तर अनेकांचे घरावरील पत्रे उडाली शेतकरी आता मदतीच्या प्रतीक्षेत करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात आज दिनांक 28 एप्रिल रोजी दुपारी दोन ते अडीच च्या तालुक्यातील चिकलठाण केडगाव कुगाव शेटफळ या परिसरात तसेच वादळी वाऱ्यामुळे चिखलठाण परिसरातील केळीबागा भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान दर कमी झाल्याने आधीच अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे चिखलठाण परिसरातील शेटफळ, केडगाव,चिखलठाण,कुगाव परिसरात काल शुक्रवारी दुपारी अडीच वाजता अर्धा ते पाऊण तास मोठ्या प्रमाणावर वादळी वारे सुरू होते.नंतर पाऊस झाला वाऱ्याचा वेग इतका जास्त होता की परिसरातील अनेक मोठे वृक्ष उन्मळून पडले. रस्त्याच्या कडेवर असणारी अनेक झाडे रस्त्यावर पडल्याने ठिक-ठिकाणी रस्ते बंद झाले होते. अनेक ठिकाणी विजेचे खांब मोडून पडल्याने विजपुरवठा बंद झाला आहे. शेतातील केळी पिकाला या वादळी वाऱ्याचा सर्वात मोठा फटका बसला आहे. चिखलठाण येथील विशाल गव्हाणे समाधान गव्हाणे सुनील चव्हाण, अवधुत सुरवसे, कुगाव येथील महेश कोकरे, विजय कोकरे, शेटफळ येथील हर्षाली नाईकनवरे, हंबीरराव नाईकनवरे राजेंद्र पोळ, सुधीर घोगरे, विष्णू निंबाळकर, कैलास लबडे, दत्तात्रय गुंड,जोतीराम डीगे, यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या येण झालेल्या व काढणीसाठी जवळ आलेल्या केळी बागा भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे वाऱ्याने आंब्याची झाडे उन्मळून पडली तसेच उभ्या झाडावरील कच्चे आंबे खाली पडून झाडाखाली कैऱ्यांचा सडा पडला होता अनेक लोकांच्या घरावरील पत्रे उडून गेल्याने बेघर होण्याची वेळ आली आहे झालेल्या नुकसानीचे पंचनामे त्वरित करून शासनाकडून भरपाई मिळावी अशी मागणी लोकांमधून केली जात आहे प्रतिक्रिया:-हर्षाली नाईकनवरे( केळी उत्पादक शेतकरी शेटफळ) माझ्या पाऊणे दोन एकर केळी पिकामधील एक हजार पेक्षा जास्त केळीची झाडे वादळी वाऱ्याने पडलेली आहेत.गेल्यावर्षीसुद्धा वादळी वाऱ्याने मोठे नुकसान झाले होते दरवर्षी वादळी वाऱ्याचा फटका केळी पिकाला बसतोय यामुळे अडचणी आलेल्या शेतकऱ्यांना शासनाने भरपाईची मदत केली पाहिजे. विशाल गव्हाणे (केळी उत्पादक शेतकरी चिखलठाण)माझी चार एकर केळीची बाग काढणीला आली. केळी व्यापाऱ्याने येऊन दर ठरवला होता होती एक दोन दिवसात काढली जाणार होती परंतु वादळी वाऱ्याने पडलेला केळीचा माल व्यापारी घेत नाहीत त्यामुळे माझे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे ३)वैभव पोळ (तालुका अध्यक्ष महाराष्ट्र राज्य केळी उत्पादक संघ) वादळी वाऱ्यांमुळे केळी पिकाचे नुकसान होणे ही गोष्ट दरवर्षी होते मुलाप्रमाणे जपलेल्या सोन्यासारख्या पिकाचे डोळ्यासमोर मोठे नुकसान होते परंतु शेतकऱ्यांना भरपाई मिळत नाही आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून योग्य ती मदत मिळावी
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी