(शब्दांकन:योगेश मोरे,छ्त्रपती संभाजीनगर)
16 मे 1988 ला लक्ष्मण बहिर यांचा जन्म बीड येथील शिरापुर गावात एका सामान्य घरात झाला; आई वडिलांची हालाखीची परिस्थिती होती. शिक्षणासाठी पंधरा किलोमीटर पायी जावे लागत होते; रोज. सातवी ते बारावी रोज 14 km प्रवास जीव घेणा होता; परंतु आई वडील शेतात राब राब राबून लेकरासाठी शाळेचे कपडे पुस्तके वह्या शाळेची फीस भरत होते.
दोन मोठ्या बहिणी आणि एक लहान भाऊ असे चौघेजण!चौघांचे शिक्षणाचा खर्च न परवडणारा होता? तरी पण त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना 12 वी पर्यंत हलाकीच्या परिस्थितीत शिकवलं. बारावीचे शिक्षण झाले; त्यांच्या आई-वडिलांची इच्छा होती की आपल्या मुलानी आदर्श शिक्षक व्हावे. बहिर यांनी डीएडचा फॉर्म भरला आणि त्यांचे सरकारी खात्यामधून तिसऱ्या फेरीमध्ये नंबर लागला तो लागला सातारा, पाटण तालुका, बापूजी साळुंखे यांचे गुरुजन महाविद्यालय पाटण येथे D.ED चे शिक्षण पूर्ण केले.त्या नंतर त्यांनी 2011 ला इंडस मोबाईल टॉवर येथे नोकरी जॉईन केली आणि 12 वर्ष इंडस टॉवर प्रा. मध्ये काढली. त्या काळात त्यांचा अनेक लोकांशी सपंर्क येऊ लागला. लोकांच्या समस्या सोडवणे हे आई वडिलांकडून शिकले होतो. त्याच काळात ते अखिल भारतीय सेनेचा युवा छ्त्रपती संभाजीनगर जिल्हा सपंर्क प्रमुख म्हणून काम केले, गो शाळा असो, कि कामगारांचे प्रश्न;जिल्हा लेव्हलला सोडवण्याचा प्रयत्न करत होते; याचीच दाखल घेत रुग्ण हक्क परिषदने त्यांना जिल्हा समन्वयक म्हणून पद दिले. कोणते पण हॉस्पिटल असो; गरिबांची लूट असेल तर ते
स्वखर्चाने तिथे जाऊन डॉक्टरला बोलून प्रश्न सोडवत असे.त्यानंतर त्यांच्या कामाची पोच पावती म्हणून त्यांना रुग्ण हक्क परिषद ने जिल्हा प्रमुख म्हणून पद दिले ते एकवर्षा साठी होते. त्यातपण मेहनतीने जनतेची सेवा केली. त्याच काळात अनेक लोकांच्या समस्या सोवण्यासाठी ते स्वतः धडपड करत असतात. रात्र आणि दिवस कधीच पाहिला नाही. परंतु त्याच काळात अखिल भारतीय सेनेचे पद अंतर्गत काही कारणास्तव सोडावे लागले?त्यांनी ठरवले की आता फक्त समाजसेवा करायची परंतु माणसाला एखादा चांगला स्टेज प्लॅटफॉर्म लागतो. मंग त्यांची ओळख गंगापूर चे उपजिल्हा प्रमुख अविनाश पाटील यांच्यासोबत झाली. सत्याची बाजू मांडणारे एकमेव नेता म्हणून त्यांची ओळख त्यांच्याच मार्गदर्शनाखाली काम करत असताना लक्ष्मण बहिर यांना पुन्हा शिवसेना उपशहर प्रमुख पदाची जिम्मेदारी दिली.त्यांनी गावानं गाव शिव सपंर्क अभियान अंतर्गत पिंजून काढले. कोरोना काळात. मास्क असो कि हॉस्पिटल मधील अडचणी मधील लोकांना मोफत जेवण असो; असे अनेक कामे त्यांच्या मार्फत झाले. कारण खरं बोलायची आणि खरं ते खरच आणि चुकीचे ते चुकीचे अशी भूमिका असल्यामूळे लोकांचा विश्वास त्यांच्यावर बसला . हे विशेष टाकायचे म्हणजे 16 मे ला त्यांचा जन्मदिवस असतो; त्या निमित्त आमच्या पॉलिटिकल फेस वेब पोर्टलने घेतलेला हा महत्वपूर्ण आढावा!खास मराठी साहित्यिक योगेश मोरे यांच्या लेखणीतून!
वाचक क्रमांक :