येणाऱ्या काळात शेतकऱ्याचा आवाज म्हणून भारत राष्ट्र समिती काम करेल! संतोष माने

By : Polticalface Team ,06-05-2023

येणाऱ्या काळात शेतकऱ्याचा आवाज म्हणून भारत राष्ट्र समिती काम करेल! संतोष माने (योगेश मोरे, छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी) छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील शेतकरी आसमानी सुलतानी तसेच शासनाच्या नाकर्तेपणामुळे संकटात असून, येणाऱ्या काळात शेतकऱ्याचा आवाज बुलंद करण्यासाठी भारत राष्ट्र समिती ताकतीने काम करणार असल्याचे मत भारत राष्ट्र समितीचे नेते संतोष माने यांनी व्यक्त केले.
पक्षाच्या सदस्य नोंदणी संदर्भात आयोजित केलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते; यावेळी विनोद काळे,संपत रोडगे,बाळासाहेब शिंदे, समाधान गायकवाड, चंद्रकांत चव्हाण, पद्माकर निकम, राजू सूकाशे, अनिल तुपे, दीपक साबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.पक्षाची राज्यभरामध्ये 10 मे पासून सदस्य नोंदणी अभियान सुरू होत आहे त्या अनुषंगाने गंगापूर तालुक्यातील सर्कलनीय पदाधिकाऱ्याची बैठक घेऊन सदस्य नोंदणी संदर्भात सूचना देण्यात आल्या महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभा मतदारसंघांमध्ये किसान रथ प्रचार-प्रसार अभियान एक महिना चालेल. दहा लाख किलोमीटर प्रवास, २८८ विधानसभा *मतदारसंघांमध्ये दीड हजारापेक्षा जास्त प्रमुख कार्यकर्ते पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहे; प्रचार वाहन प्रत्येक गावात फिरून भारत राष्ट्र समितीच्या पक्ष,किसान आघाडी, महिला, युवक, विद्यार्थी अशा विविध आघाडी व त्यांच्या समित्या गठीत करून पक्षांचे संघटन मजबूत करून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पक्ष काम करत येणाऱ्या जिल्हा परिषद,पंचायत समिती, नगरपालिका,ग्रामपंचायत पक्षाचे उमेदवार उभे करून संपूर्ण ताकतीने निवडणुका लढवणार आहे. या वेळी गणेश चव्हाण, शाहरुख पटेल, स्वप्नील खवले, ऋषिकेश पाठे, प्रसाद भातोडेकर, अजय सोनवणे, योगेश शेजुल, प्रतीक लिंगायत, राहुल नारोडे, आकाश काटकर, आकाश जाधव, राजू जाधव, कृष्णा ताठे, नवनाथ बरबडे आदी मान्यवर उपस्थित होते.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी