छत्रपती शाहू महाराजांनी गोरगरिबांसाठी कल्याणकारी योजना राबवल्या ज्येष्ठ व्याख्यानकार श्री उदमले
By : Polticalface Team ,07-05-2023
लिंपणगाव (प्रतिनिधी)-- छत्रपती राजश्री शाहू महाराजांनी सर्वसामान्य नागरिकांसाठी प्रभावीपणे लोककल्याणकारी योजना राबवल्या धाडसी निर्णय घेऊन सर्वसामान्यांना मोठा आधार देण्याचे काम छत्रपती शाहू महाराजांनी केले, असे गौरवद्गार ज्येष्ठ व्याख्यानकार अभिषेक उदमले यांनी व्यक्त केले.
लोणी व्यंकनाथ येथे श्री व्यंकनाथ विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये राजश्री शाहू महाराजांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय सस्ते हे होते.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्याख्यानकार उदमले पुढे म्हणाले की, 48 वर्षाचा जीवन काळ लाभलेले राजश्री शाहू महाराजांचा इतिहास पाहिल्यानंतर एक लोक कल्याणकारी राजा कसा असावा याची निश्चित जाणीव होते. वयाच्या विसाव्या वर्षी कोल्हापूरच्या गादीवर बसण्याची संधी शाहू महाराजांना मिळाली. दोन प्रकारची संकटी त्यांच्यापुढे उभे राहिली. दुष्काळ आणि महाभयंकर प्लेगची साथ. खूप वर्षांनी आपल्याला राजा भेटला सर्वसामान्यांच्या आनंदात भर पडली आणि गोरगरिबांना संकटातून बाहेर काढण्यासाठी राजांनी दुष्काळामध्ये धरण व रस्त्याची कामे सुरू करून गोरगरिबांना रोजगार देण्याचे काम केले असे अनेक कल्याणकारी योजना त्यांनी त्याकाळी राबवल्या असे श्री उदमले यांनी यावेळी सांगितले
सामाजिक कार्यकर्ते अजित दळवी यावेळी म्हणाले की, समाजामध्ये आपण वागत असताना मागील वर्तमान काळ पाहत नाही, परंतु थोर पुरुषांचे इतिहास पाहिले पाहिजे. पोलादी पुरुष म्हणून शाहू महाराजांनी आपली कारकीर्द गाजवली. एक गोरगरिबांचा राजा म्हणून त्यांची ख्याती होती निश्चितच त्यांचे स्मरण होणे गरजेचे असल्याचे दळवी यांनी सांगितले.
अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना प्राचार्य सस्ते पुढे म्हणाले की, शाहू महाराज हे सामान्य घरातील असल्यामुळे त्यांना गोरगरीब जनतेची तळमळ होती. सामान्य माणसाला शाहू महाराजांनी प्रगतीेपथावर नेले. शाहू महाराजांनी त्याकाळी शिक्षणामध्ये अमुकलाग्र बदल करून शिष्यवृत्ती सारख्या योजना प्रभावीपणे राबवल्या. शेतकऱ्यांसाठी धरणे बांधली,. खेळाडूंनाही त्यांनी मोठे प्रोत्साहन दिले. त्यांचा आदर्श तरुणांनी अंगी काढावा निश्चितपणे देश आणखी प्रगतीपथावर जाईल असे सांगितले.
ज्येष्ठ शिक्षक शिवाजीराव इथापे यांनी सूत्रसंचालन करत राजश्री शाहू महाराजांचा जीवनपट सांगितला. यावेळी विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
वाचक क्रमांक :