अवकाळी पाऊस पडतोय? शेतकऱ्यांच्या स्वप्नांची राख रांगोळी?

By : Polticalface Team ,07-05-2023

अवकाळी पाऊस पडतोय?
शेतकऱ्यांच्या स्वप्नांची राख रांगोळी? ‎छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी योगेश मोरे) सध्या राज्यात अवकाळी पावसाने रब्बी व उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान होत आहे,संपूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील परिसरात आठवडा भरापासून सकाळपासूनच वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी लागत असून,अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच धांदल उडत आहे. कांदा काढण्यासाठी मजूर मिळत नाही , त्यात अवकाळी पाऊस कांदा काढायचा तरी कसा? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. यावर्षी अवकाळी पाऊस शेतकऱ्यांची पाठ काही सोडेना? यामुळे अनेक शेतकऱ्यांची कांदा काढणी रखडली आहे. काहींचा कांदा शेतात पडून आहे. अनेकांची कांदा झाकण्यासाठी धावपळ सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांचा कांदा भिजून नुकसान झाले आहे.
यापूर्वी झालेल्या अवकाळीत अनेकांचा गहू भुईसपाट झाला. हरभरा, ज्वारी, बाजरीचे नुकसान झाले होते. पूर्वीच ओल्या दुष्काळने सततची नापिकी, दुबार पेरणीचे संकट, दुष्काळाच्या पांघरूणाखाली दबत चाललेल्या शेतकऱ्यांना कापूस, तूर, सोयाबीन या पिकांनी पुरते गारद केले असतानाच आता कांदा पीक तरी आशावादी चित्र घेऊन येईल, या आशेवर शेतकरी जगत होता. परंतु, आठवडा भर सुरू असलेल्या अवकाळी पावसाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले. अवकाळी पावसाने कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाने कांद्याचे प्रचंड नुकसान झाल्याने तालुक्यातील शेतकरी पुन्हा विवंचनेत सापडला आहे. दोन दिवसीय वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा जबर तडाखा कन्नड,गंगापूर,वैजापूर,पैठण, खुलताबाद,सोयगाव,सिल्लोड तालुक्यातील हतनूर व मुंडवाडी परिसराला बसला. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले. निसर्गाच्या अवकृपेने पूर्वीच खरिपासह रब्बी हंगामातील पिकांनी शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. हातातोंडाशी आलेला कांदा तरी काही आशा घेऊन येईल! या आशेवर असणाऱ्या शेतकऱ्यांना अवकाळी पावसामुळे निराशेचा सामना करावा लागत आहे. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना पिकांचे संरक्षणही करता आले नसल्याची खंत व्यक्त केली आहे. अद्यापही तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांचा कांदा उघड्यावर पडून आहे. पावसामुळे कांदा सडण्यास सुरुवात झाली असून, शेतकऱ्यांना लाखो रुपयांच्या नुकसानीचा सामना करावा लागणार असल्याची चिंता कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
कवडीमोल भावात विकल्या जातोय कांदा?शेतकऱ्यांचाकांदा निघण्यापूर्वी त्याला चांगला भाव मिळतो. मात्र, बाजारपेठेत विकायला आणताच तो कवडीमोल भावात विकल्या जातो. सध्या ठोक किमतीत तो चार ते पाच रुपये किलो दराने विकला जात असल्याने कांदा उत्पादक शेतकरी आणखीन विवंचनेत सापडला आहे.
कांद्याला लागली सड : कांदा काढण्यासाठी वेळेवर मजूर मिळत नसल्यामुळे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचा कांदा अद्यापही शेतामध्ये उघड्यावरच पडून आहे. सद्या सुरू आलेल्या अवकाळी पावसामुळे कांदा सडायला सुरुवात झाली आहे.
कांदे उत्पादक शेतकरी आपला उदर निर्वाह कांदा पिकावर करत आहेत. आणि करतो, तसेंच बँक कर्ज, परत फेड, लग्न, करणे इतर गोष्टी शेतकरी करत असतो. मात्र त्या कांदे वर फक्त स्वप्नच राहिले
शेतकरी राजा अवकाळी पाऊस झाल्याने पूर्णत: खचून गेला आहे. कांद्याला पूर्णत:सड लागली आहेत. त्यात कांदा, कापुस, आधी पिकांना कवडी मोल, भाव नाही, महाराष्ट्र सरकारनी याकडे लक्ष द्यावे?

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष