अवकाळी पाऊस पडतोय? शेतकऱ्यांच्या स्वप्नांची राख रांगोळी?

By : Polticalface Team ,07-05-2023

अवकाळी पाऊस पडतोय?
शेतकऱ्यांच्या स्वप्नांची राख रांगोळी? ‎छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी योगेश मोरे) सध्या राज्यात अवकाळी पावसाने रब्बी व उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान होत आहे,संपूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील परिसरात आठवडा भरापासून सकाळपासूनच वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी लागत असून,अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच धांदल उडत आहे. कांदा काढण्यासाठी मजूर मिळत नाही , त्यात अवकाळी पाऊस कांदा काढायचा तरी कसा? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. यावर्षी अवकाळी पाऊस शेतकऱ्यांची पाठ काही सोडेना? यामुळे अनेक शेतकऱ्यांची कांदा काढणी रखडली आहे. काहींचा कांदा शेतात पडून आहे. अनेकांची कांदा झाकण्यासाठी धावपळ सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांचा कांदा भिजून नुकसान झाले आहे.
यापूर्वी झालेल्या अवकाळीत अनेकांचा गहू भुईसपाट झाला. हरभरा, ज्वारी, बाजरीचे नुकसान झाले होते. पूर्वीच ओल्या दुष्काळने सततची नापिकी, दुबार पेरणीचे संकट, दुष्काळाच्या पांघरूणाखाली दबत चाललेल्या शेतकऱ्यांना कापूस, तूर, सोयाबीन या पिकांनी पुरते गारद केले असतानाच आता कांदा पीक तरी आशावादी चित्र घेऊन येईल, या आशेवर शेतकरी जगत होता. परंतु, आठवडा भर सुरू असलेल्या अवकाळी पावसाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले. अवकाळी पावसाने कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाने कांद्याचे प्रचंड नुकसान झाल्याने तालुक्यातील शेतकरी पुन्हा विवंचनेत सापडला आहे. दोन दिवसीय वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा जबर तडाखा कन्नड,गंगापूर,वैजापूर,पैठण, खुलताबाद,सोयगाव,सिल्लोड तालुक्यातील हतनूर व मुंडवाडी परिसराला बसला. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले. निसर्गाच्या अवकृपेने पूर्वीच खरिपासह रब्बी हंगामातील पिकांनी शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. हातातोंडाशी आलेला कांदा तरी काही आशा घेऊन येईल! या आशेवर असणाऱ्या शेतकऱ्यांना अवकाळी पावसामुळे निराशेचा सामना करावा लागत आहे. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना पिकांचे संरक्षणही करता आले नसल्याची खंत व्यक्त केली आहे. अद्यापही तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांचा कांदा उघड्यावर पडून आहे. पावसामुळे कांदा सडण्यास सुरुवात झाली असून, शेतकऱ्यांना लाखो रुपयांच्या नुकसानीचा सामना करावा लागणार असल्याची चिंता कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
कवडीमोल भावात विकल्या जातोय कांदा?शेतकऱ्यांचाकांदा निघण्यापूर्वी त्याला चांगला भाव मिळतो. मात्र, बाजारपेठेत विकायला आणताच तो कवडीमोल भावात विकल्या जातो. सध्या ठोक किमतीत तो चार ते पाच रुपये किलो दराने विकला जात असल्याने कांदा उत्पादक शेतकरी आणखीन विवंचनेत सापडला आहे.
कांद्याला लागली सड : कांदा काढण्यासाठी वेळेवर मजूर मिळत नसल्यामुळे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचा कांदा अद्यापही शेतामध्ये उघड्यावरच पडून आहे. सद्या सुरू आलेल्या अवकाळी पावसामुळे कांदा सडायला सुरुवात झाली आहे.
कांदे उत्पादक शेतकरी आपला उदर निर्वाह कांदा पिकावर करत आहेत. आणि करतो, तसेंच बँक कर्ज, परत फेड, लग्न, करणे इतर गोष्टी शेतकरी करत असतो. मात्र त्या कांदे वर फक्त स्वप्नच राहिले
शेतकरी राजा अवकाळी पाऊस झाल्याने पूर्णत: खचून गेला आहे. कांद्याला पूर्णत:सड लागली आहेत. त्यात कांदा, कापुस, आधी पिकांना कवडी मोल, भाव नाही, महाराष्ट्र सरकारनी याकडे लक्ष द्यावे?

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी