By : Polticalface Team ,12-05-2023
मराठवाडा विभागीय (प्रतिनिधी योगेश मोरे ):
गंगापूर तालुक्यातील वरखेड येथील गट नंबर 13 मध्ये नांदूर मधमेश्वर कालव्या वरती बांधलेल्या पुलाची दिशा बदलल्यामुळे रणजीत प्रभाकर वाघ यांच्या शेत जमिनीवर पूर्वीचा रस्ता सोडून नवीन रस्ता करून नांदूर मधमेश्वर विभागाने अतिक्रमण केले व या अतिक्रमण केलेल्या रस्त्याचे भूसंपादनही केले नाही.त्यामुळे तीन वर्षापासून नांदूर मधमेश्वर विभागाशी पत्र व्यवहार करूनही दखल घेतलेली नाही,त्याचबरोबर या कालव्याला इमर्जन्सी एस्केप गेट आहे, वरखेड येथे परंतु या गेट वरती बेकायदेशीररित्या नांदूर मधमेश्वर विभागातील अधिकाऱ्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर माती मुरूम टाकलेला आहे; त्यामुळे पाणी चालू असताना काही दुर्घटना घडल्यास हा गेट खोलू शकत नाही व यामुळे जर कदाचित पाठ फुटला तर जीवित हानी मोठ्या प्रमाणावर होऊ शकते व जमिनीचेही नुकसान होऊ शकते हे लक्षात घेता या गेटवरती मुरूम नसायला हवा व हे गेट सुस्थितीत असायला हवे. परंतु शेतकऱ्यानी ही मागणी करूनही नांदूर मधमेश्वर विभागातील अधिकारी हे काम करण्यास तयार नाही व शेतकऱ्यांना या गेटमधून पाणी देण्यासाठी नकार दिला जातो व पर्याय म्हणून शेतकऱ्याला पाणी घेण्यासाठी डोंगळे पाईप आणण्यासाठी शेतकऱ्यांना सांगण्यात आले. शेतकऱ्यानी व्याजाने पैसे घेऊन हे डोंगळे पाईप आणले. परंतु या अधिकाऱ्यांनी यावर याच विभागातील अधिकाऱ्यांनी त्यावर गाडी घातली व हे सर्व डोंगळे फोडले. शेतकऱ्यावर जुलूम करण्याची ही कोणती व्यवस्था आहे? त्यामुळे नाईलाजाने रणजित वाघ या शेतकऱ्यानी गोदावरी नदीवर कायगाव येथे बांधलेल्या पुलावरून उडी मारून आत्मदहन करण्याचा इशारा कार्यकारी अभियंता नामंका विभाग वैजापूर यांना निवेदनाद्वारे दिला आहे.