करमाळा तालुक्यातील भिलारवाडी येथील मकाई सहकारी साखर कारखान्याची अखेर लागली निवडणूक निवडणुकीच्या रिंगणात मात्र बागल कुटुंब नाही

By : Polticalface Team ,19-05-2023

करमाळा तालुक्यातील भिलारवाडी येथील मकाई सहकारी साखर कारखान्याची अखेर लागली निवडणूक निवडणुकीच्या रिंगणात मात्र बागल कुटुंब नाही जेऊर प्रतिनिधी : करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील महत्त्वाची समजली जाणारी सहकारी संस्था मकाई सहकारी साखर कारखान्याच्या येत्या 16 जून रोजी होऊ पाहणाऱ्या अटीतटीच्या निवडणुकीमध्ये आतापर्यंत आज अखेर एकूण 71 उमेदवारी अर्ज आले आहे या निवडणुकीमध्ये आता चांगलाच रंग भरला असून यामध्ये मोहिते पाटील गट व माजी आमदार नारायण (आबा) पाटील समर्थक पश्चिम भागातील माजी जिल्हा परिषद सदस्या सवितादेवी राजेभोसले यांनी मकाई सहकारी साखर कारखान्याची निवडणुक लढवण्यासाठी १६ उमेदवार रिंगणात उतरवण्याची तयारी केली. सदर ईच्छुकानी आज (गुरुवारी) १६ अर्ज खरेदी केले करुन जेऊर येथे माजी आमदार नारायण पाटील यांच्या भेटीनंतरच आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. ऐनवेळी मोहिते पाटील गटाने मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उडी घेतल्याने सदरची निवडणूक भलतीच रंगतदार होणार आहे यापूर्वी प्राध्यापक रामदास झोळ यांनीही या निवडणुकीकरिता आपल्या पॅनलची जुळवा जुळवा केली असल्याचे समजते मात्र अद्याप पर्यंत त्यांना म्हणावे तसे उमेदवार मिळाले नाहीत व त्यांच्या मागे फारसे जनमत सुद्धा नसल्याचे बोलले जात आहे. वाशिंबे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत स्वतः रामदास झोळ हे निवडणुक रिंगणात असताना ते मतांच्या बाबतीत थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले होते. यामुळे त्यांना आता इतर भागातील उमेदवार शोधताना कार्यकर्त्याची जुळवा जुळवा करता आली नसल्याचे समजते आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने आ. रणजित सिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकूण 16 उमेदवारी अर्ज भरण्यात आले असून बागल गटाच्या कार्यकर्त्यांनी ही आपले उमेदवारी अर्ज भरले आहे उमेदवार अर्जाची छाननी दिनांक 19 मे 2023 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून करण्यात येणार आहे जे उमेदवारी अर्ज ग्राह्य होतील त्यांची यादी 22 मे रोजी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात प्रसिद्ध होणार आहे तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची 22 मे 2023 ते 5 जून 2023 या कालावधीमध्ये सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार असून तदनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे यापूर्वी मकाई साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी यापूर्वी 23 अर्ज दाखल झाले आहे एकंदर पाहता मकाई साखर कारखान्याच्या सत्ताधारी बागल गटाच्या विरोधात आता मोहिते पाटील गट तसेच झोळ-डांगे यांचा मकाई बचाव पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे दिसत आहे चौकट घेणे मकाईच्या निवडणुकीत सत्ताधारी बागल कुटुंब मात्र अलिप्त करमाळा तालुक्यातील श्री मकाई साखर कारखान्यावर स्थापनेपासून आजपर्यंत बागल गटाची एक हाती सत्ता होती बागल गटाचे प्रमुख तसेच सर्वेसर्वा मा. सामाजिक न्याय मंत्री कैलासवासी दिगंबरराव बागल हे स्वतः कारखान्याचे चेअरमन होते त्यांच्या नंतर त्यांची कन्या बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल कोलते व चिरंजीव दिग्विजय बागल उर्फ प्रिन्स यांनी अध्यक्षपद भूषवले होते मात्र सध्याच्या येऊ पाहणाऱ्या मकाईच्या निवडणुकीत मात्र बागल कुटुंबांना उमेदवारी पासून अलिप्त राहण्याची वेळ आली आहे मकाई सहकारी साखर कारखाना बागल गटाच्या ताब्यात असूनही आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी देखील बागल कुटुंबातील एकाही उमेदवाराने उमेदवारी अर्ज भरला नसल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे मध्यंतरी काही दिवसापूर्वी बागल यांच्यावर सहकारी संस्थांमध्ये कर्ज प्रकरणावरून विरोधकांनी बागल यांच्यावर आक्षेप घेतला होता त्यामुळेच की काय बागल कुटुंबाने उमेदवारी अर्ज भरला नसल्याचे समजते
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.