By : Polticalface Team ,24-05-2023
अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि सौ अनुराधाताई नागवडे प्रतिष्ठान आयोजित श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघ जनसंवाद अभियान निमित्त लिंपणगाव येथे आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी आपले विचार मांडताना युवा नेते दिग्विजय नागवडे पुढे म्हणाले की, सहकार महर्षी बापूंनी समाजकारण करत असताना श्रीगोंदा या दुष्काळी तालुक्याला उर्जित अवस्थेत आणण्यासाठी प्रतिकूल परिस्थिती असताना खाजगी कारखाना सहकारी तत्त्वावर उभारला आणि तिथूनच खऱ्या अर्थाने श्रीगोंदा तालुक्याचे विकास पर्व सुरू झाले. तालुक्यातील जनतेने अनुभवीले. प्रसंगी बापूंनी स्वतःच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष केले. परंतु तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर इत्यादींच्या कष्टाला दाम मिळाले पाहिजे तो ताठ मानेने जीवन जगला पाहिजे हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून बापूंनी नगर दक्षिण जिल्ह्यामध्ये पहिला सहकारी साखर कारखानदारी उभी करून या सहकार चळवळीच्या माध्यमातून बापूंनी तालुक्यात घोड, कुकडीचे पाणी या दुष्काळी तालुक्याला मिळवून दिले. यासाठी विशाल कुकडी परिषदेचा लढा उभारला. त्यामुळे श्रीगोंदा तालुका आज जवळपास 70 -72 टक्के सिंचन क्षेत्राखाली आला. खेडोपाडी शिक्षणाची ज्ञानगंगा उभी करून सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुला मुलींना गावातच शिक्षणाची सोय केली. सतत विकासाचा ध्यास घेऊन बापूंनी सर्वसामान्यांचे जीवन प्रफुल्लित केल्याचे सांगून ते आणखी पुढे म्हणाले की, तोच वारसा आम्ही नागवडे कुटुंब सक्षमपणे चालवतो आहे. श्रीगोंदा तालुक्यातील जनतेने बापूंच्या नंतरही दादा आईंना मौलिक साथ दिली. काँग्रेस पक्षाने देखील आमच्या नागवडे कुटुंबावर जिल्ह्याची जबाबदाऱ्या सोपवल्या. जिल्हा बँकेतही आम्हाला संधी मिळाली. सहकारी साखर कारखानदारी चालवण्यासाठी सभासदांनी देखील आमच्यावर मोाठा विश्वास टाकला. हा केवळ जनतेचा आशीर्वाद व बापूंनी दिलेले योगदान तोच वारसा आम्ही सक्षमपणे चालवत आहोत. यापुढेही आम्हाला जनतेने भक्कमपणे साथ द्यावी आम्ही निश्चितपणे तालुक्याचा सर्वांगीण विकास करू अशी ग्वाही दिग्विजय नागवडे यांनी यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना दिली.
यावेळी नागवडे कारखान्याचे संचालक सुभाषराव शिंदे म्हणाले की, सहकार महर्षी बापूंनी श्रीगोंदा तालुक्यात डोंगराएवढे काम केले. पद असो वा नसो परंतु सर्वसामान्य माणूस व त्याचे जीवनमान सुधारले पाहिजे हा दृष्टिकोन बापूंनी समोर ठेवला आणि तालुक्यात राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक महत्त्व दिले. तोच वारसा दादा आणि वहिनी यांनी बापूंचे कार्य डोळ्यासमोर ठेवून सर्वसामान्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होत आहेत. त्यांना आधार देण्याचे काम करत आहेत. बापूंचे श्रीगोंदा तालुक्यात लाभलेले योगदान त्यामुळे नागवडे कुटुंबातून देखील आमदार होण्याची पात्रता निश्चितपणे आहे. जनतेने देखील तालुक्याचा उर्वरित विकास साधण्यासाठी राजेंद्र दादा नागवडे व वहिनींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.
... माजी संचालक प्रा सुनील माने यावेळी बोलताना म्हणाले की, नागवडे कुटुंब हे सर्वसामान्यांच्या हिताकडे लक्ष देणारे कुटुंब असून, सर्वसामान्य जनता आणि नागवडे कुटुंब हि नाळ सहकार महर्षी बापूंच्या माध्यमातून गेल्या 50 -60 वर्षापासून जोडले गेले आहे. श्रीगोंदा तालुक्यात सहकार, शिक्षण व सिंचन क्षेत्रात सहकार महर्षी बापूंचे मोठे योगदान आहे. मागील इतिहास पाहता माजी आमदार राहुल जगताप, आमदार बबनराव पाचपुते यांना आमदार करण्यासाठी नागवडे कुटुंबांनी प्रामाणिकपणे साथ दिली. त्यांनी देखील नागवडे कुटुंबातील जो व्यक्ती 2024 च्या विधानसभा निवडणुकीत उभे राहतील त्यांना देखील साथ देण्याचे आवश्यकता आहे प्रसंगी तालुक्यातील जनतेने देखील आता नागवडे कुटुंबातीलच आमदार हवा अशी अपेक्षा व्यक्त केल्या आहेत असे सांगितले.
यावेळी कारखान्याचे संचालक भाऊसाहेब बरकडे, अॅड अशोक रोडे, सुनील जंगले, आदेशशेठ नागवडे, विठ्ठल जंगले, पै. सतीश भगत पद्माकर पवार आदींनी तालुक्याला नागवडे कुटुंबांनी दिलेले योगदान याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी चंद्रकांत भोईटे, चेअरमन प्रमोद शिंदे, संचालक विश्वनाथ गिरमकर, निळकंठ जंगले, रावसाहेब कुरुमकर, विश्वनाथ गिरमकर, उदयसिंह जंगले, चेअरमन रवींद्र खळतकर, मधुकर होले, संपत होले, मा चेअरमन लक्ष्मण भोईटे, दादा कुरुमकर, आदींसह ग्रामपंचायतचे आजी-माजी सदस्य ,सेवा संस्थेचे आजी माजी सदस्य, नागवडे कुटुंबावर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन दादा कुरुमकर यांनी केले. आभार संचालक विठ्ठल जंगले यांनी मानले. वाचक क्रमांक :