मकाई सहकारी साखर कारखान्याचा विजय म्हणजे बागल गटाच्या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या परिश्रमाचा विजय सर्व मतदाराचे मानले युवा नेत्या रश्मी बागल यांनी आभार
By : Polticalface Team ,21-06-2023
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील श्री मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत बागल गटाचा दणदणीत विजयी झाला आहे. सदरचा विजय म्हणजे बागल गटांच्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र घेतलेले परिश्रम आहे या विजयामुळे बागल गटाची सत्ता कायम राहिली आहे. त्यावर नेत्या रश्मी बागल यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
बागल म्हणाल्या आहेत की, लोकनेते दिगंबरराव बागल मकाई पॅनलच्या उमेदवारांना या निवडणुकीत झालेल्या एकूण ९८०० मतांपैकी ८४०० एवढी प्रचंड मते मिळाली आहेत. एवढी प्रचंड मते देऊन सभासदांनी विजयी केले आहे. या प्रचंड मताधिक्यासाठी सर्व सभासदांचे आभार. हा आमच्यासाठी फक्त विजयी नसून एक जबाबदारी आहे. जी पार पाडण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध असू. साखर उद्योग आणि त्यातही सहकारी साखर कारखाने चालवणे कसोटीचे ठरत असतानाही नूतन संचालक मंडळ निश्चितपणे मकाई साखर कारखाना स्व. मामांच्या विचारांना अनुसरून नेटकेपणाने चालवेल असा विश्वास आहे. हा विजयी बागल गटावरील सर्वसामान्य सभासदांचा विश्वास आणि बागल गटाच्या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या प्रचंड कष्टाचा आहे. मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये ज्या माझ्या सर्व ऊस उत्पादक मतदार तसेच कार्यकर्त्यांनी अहोरात्र परिश्रम व कष्ट घेऊन मकाई साखर कारखानावर बागल गटाचा झेंडा फडकवण्यासाठी प्रयत्न केले त्या सर्व मतदार बांधवांचे मी शतशा आभार मानते असे रश्मी बागल बोलताना म्हणाल्या
वाचक क्रमांक :