धरण उशाला,अन् कोरड घशाला,निष्क्रिय ग्रामपंचायत सदस्यांचा अजब कारभार....

By : Polticalface Team ,23-06-2023

धरण उशाला,अन् कोरड घशाला,निष्क्रिय ग्रामपंचायत सदस्यांचा अजब कारभार.... अहमदनगर(प्रतिनिधी :दादासाहेब जावळे )- गुंडेगावयेथील ग्रामपंचायतीचा ढिसाळ कारभार पिण्याची पाण्याची समस्या व नागरी समस्या विरोधात गुंडेगाव येथील वार्ड क्रमांक ५ (पाच) मधील महिलांनी व नागरिकांनी एकत्र येऊन आपल्या तक्रारी बाबत माहिती मा.जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ यांच्या उपस्थितीत मांडली आहे. गुंडेगाव ग्रामस्थांच्या पिण्याचे पाणी,लाईट समस्या, स्वच्छता, घरकुल योजना तसेच गावातील रस्ते, बंद पथदिवे आदी समस्यांबाबत गेल्या तीन वर्षापासून ग्रामस्थ,महिला, शेतकरी वैतागले आहेत.हे प्रश्न सोडवण्यासाठी सत्ताधारी ग्रामपंचायतचे सदस्य काहीच उपायोजना करत नसल्याचा आरोप यावेळी नागरिकांकडून करण्यात आला आहे. गावाला जिल्हा परिषद मार्फत पाच लाख रुपये खर्च करून शुद्ध पिण्याचे पाणीपुरवठा व्हावा यासाठी गेली चार महिन्यांपूर्वी आरो प्लांटची उभारणी पूर्ण झाली असून सुद्धा गावकऱ्यांना पाणी पुरवठा केला जात नाही.तसेच पाणी पट्टी ही आकारली जात आहे पिण्याचे पाणी विकत घेऊन आमचे आर्थिक नुकसान होत आहे.गावाला खेटूनच मुख्य पाझर तलाव आहे या तलावामध्ये पूर्ण उन्हाळ्यात पाणी पुरवठा करण्यात येईल एवढा पाणी साठा असून देखील सत्ताधारी लोकांनी जनतेचे हाल केले आहेत.जर या तलावातून जवळच असलेल्या पाण्याच्या टाकीत पाणी उपलब्ध करून गावाला पाणीपुरवठा घरोघरी झाला असता.गत तीन वर्षापासून एक वार्डात नव्हे तर पूर्ण गुंडेगावात समस्या व तक्रारी आहेत तसेच ग्रामपंचायत नियोजना अभावी आज गुंडेगावात पाण्याची समस्या ही उद्भवत आहे. पाणीपुरवठा योजना ही तांत्रिक प्रश्न नसून या पाईपलाईन साठी कुशल कामगारांचा वापर नसणे तसेच पाणी प्रेशरची दिशा चुकलेली आहे. यावेळी मा.जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ यांनी आपल्या भाषणात सांगितले की जर माझ्या माता भगिनींना आठ-आठ पंधरा,महिनाभर पाणी मिळत नसेल तर या ग्रामपंचायत सत्ताधारी लोकांनी पदावर राहणे योग्य नाही.यांना सत्ता देऊन आम्ही एक प्रकारे विकासाची संधी दिली होती.परंतु यांना सत्तेत आम्ही जर विरोध केला असता तर हे बोलले असते की गावात बाळासाहेब हराळ का लक्ष घालत आहेत.म्हणून मी लक्ष घातले नाही परंतु जर माझ्या गावच्या जनतेचे अशा प्रकारे हाल होत असतील तर आता मला गावासाठी खऱ्या अर्थाने उतरावे लागेल.आज मोहरवाडी पाणी पुरवठा योजनेवर लक्ष देण्याची गरज आहे.आपल्या आघाडीच्या काळात ही योजना मंजूर झाली होती.योजनेसाठी साडे तीन कोटींची योजना असताना या योजनेसाठी साडे तेरा कोटी रुपये मंजूर करुन घेतले कारण भविष्यात ही योजना चांगली व्हावी परत या योजनेसाठी परत पैसे मिळणार नाही म्हणून आम्ही आग्रही भूमिका मांडत राहिलो. पुढील काळात आपण ग्रामसभा लावा प्रत्येक ग्रामसभेला मी उपस्थित राहील आज कोण काम करत आम्हाला घेणेदेणे नाही परंतु काम निकृष्ट होत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. आज जनतेनी सत्ता बदलाचे परिणाम कसे सहन करावे लागत आहेत हे पाहत आहेत.या लोकांनी जर पाणी पुरवठा नाही केला तर आपण पदर पैसे भरून गावाला पाणी उपलब्ध करून देऊ.आज माझ्या बंधु भगिनींना लाईट पूर्ण वेळ देऊ शकत नाही ही शोकांतिका आहे.आम्ही सत्तेतून पायउतार झालो आम्ही जनतेचा कौल मान्य करुन काम करत होतो परंतु जो पर्यंत जनता जनार्दन म्हणत नाही तो पर्यंत आम्ही ही गावाच्या विकासात लक्ष घातले नाही.आज माझ्या या जनतेच्या म्हणण्यानुसार मी इथपर्यंत आपल्या समस्या सोडविण्यासाठी आलो आहे. ज्या समस्या सोडवण्यासाठी आपण मला बोलावले आहे. सत्ताधाऱ्यांना गावची साधी लाईट सुद्धा दुरुस्त करता येत नाही.मोहरवाडी तलावातून जी पाईपलाईन आलेली आहे त्याकडे लक्ष देऊन करुन घ्यावी.एका वर्षात दलित वस्तीला ऐंशी लाख रुपये मिळू शकतात एवढा निधी उपलब्ध होऊ शकतो.गावात साधं बसायला समाज मंदिर नाही.आज गावात पाणी असताना तहान लागलेली माणसं पहायला मिळत आहेत.मनुष्य चुकतो कदाचित आम्ही ही चुकलो असू.या पुढील काळात आम्हाला लक्ष घालावा लागेल घन कचरा,सांडपाणी व्यवस्थापनासाठी ३६ लाख रुपये येऊन पडले आहेत.यांना आलेला निधी खर्च करता येत नाही.मला तुला असे यांचे चालले आहे. गावातील पाणीपुरवठा, घरकुल, स्वच्छता,शिक्षण,या सर्वांची अवस्था खुप वाईट आहे येणाऱ्या पुढील ग्रामसभेला हे विषय मार्गी लावू.ज्यांना घरकुल नसेल त्यांना घरकुल उपलब्ध करून देण्यात येईल. यावेळी जिल्हाचे नेते श्री बाळासाहेब हराळ,श्री वामनराव जाधव गुरुजी तसेच ग्रामपंचायतचे मा.सरपंच तथा विद्यमान सदस्य संजय कोतकर,श्री सुनील भापकर,सेवा सोसायटीचे चेअरमन श्री छबुराव हराळ, चेअरमन चंद्रकांत निकम, व्हाईस चेअरमन संदीप भापकर , शिवनाथ कोतकर, संदिप जाधव,तसेच सेवा सोसायटीचे आजी-माजी चेअरमन व सर्व सदस्य यांना निमंत्रित केले होते.यावेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या यामध्ये रेखा लष्करे,अर्चना जावळे, अलका जावळे, ज्योती जावळे,शितल देवकर, मनिषा जावळे,पुजा मुदगुले,सुशिला सकट,माया सकट, सुशिला दादा सकट, हिराबाई माने,आरती मुदगुले, सविता मुदगुले,विद्या लष्करे,शितल कुसळकर, सविता कुसळकर,लता राऊत आदी महिला उपस्थित होत्या. नागरिकांमध्ये शिक्षक रमेश चौधरी, रावसाहेब हराळ गुरुजी, संजय येठेकर, दादासाहेब आगळे,अनिल हराळ मेजर, आप्पासाहेब जाधव, नंदकुमार माने, ज्ञानदेव कुसळकर, राजेंद्र राऊत, साईनाथ मोहिते, राजेंद्र मोहिते, अमोल कुसळकर, विकास हराळ,अनिल सकट,सचिन सकट,संजय मोहिते,छगन येठेकर मेजर, भाऊसाहेब शिंदे, डॉ.विलास सकट,दादासाहेब जावळे,पापाभाई तांबोळी, साहेबराव सकट, रमेश माने, प्रदिप पवार, रामदास कुताळ, पोपट तांबे, रामदास कोतकर, उत्तम कुसळकर, संतोष जावळे,कुताळ संजय,मयुर हराळ,विजय माने, प्रसाद लंके,गोरख ढवळे,राजू तांबोळी, मयूर जाधव, अनिल भापकर,मोहन सातपुते,भरत सोनवणे, सचिन कुताळ,सुभाष भापकर, अंकुश कुताळ,नारायण भापकर, गणेश भापकर, मंगेश हराळ, विनोद दवणे आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गेली चार महिन्यांपासून सुरू आहे.सांडपाणी व्यवस्था नाही,कधीतरी पाणी रात्री दोन वाजता अचानक सोडले जाते.पाणी सुटलेले माहीत होत नाही.त्यामुळे पाण्याची टंचाई येऊन पाणी विकत घ्यावे लागते यामुळे आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.संरपच, सदस्य यांना याबाबत लवकरात लवकर उपायोजक करून पाण्याची व्यवस्था करावी.. अर्चना जावळे (महिला ग्रामस्थ,गुंडेगाव)

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी