विद्यार्थ्यांनी समाजातील प्रलोभनांपासून दूर राहावे:- पी.एस.आय. समीर अभंग

By : Polticalface Team ,28-06-2023

विद्यार्थ्यांनी समाजातील प्रलोभनांपासून दूर राहावे:-
 पी.एस.आय. समीर अभंग श्रीगोंदा प्रतिनीधी:- युवा पिढीतील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आई-वडिलांचा, शिक्षकांचा आदर करावा. जगामध्ये आपण असणं हेच एकमेव सत्य आहे त्यामुळे स्वतःसाठी जगा. मी कोण आहे मी काय करतो आणि मी काय केले पाहिजे हे प्रश्न स्वतःच्या मनाला विचारून विद्यार्थ्यांनी सूची जाणीव निर्माण करावी. आयुष्यातील विविध प्रश्नांची उत्तरे कोणत्याही पुस्तकात दिलेली नसतात ते प्रश्न अनुभवाच्या आधारे सोडवावे लागतात. विद्यार्थ्यांनी चुकीच्या, वाईट गोष्टींचे, प्रवृत्तींचे समर्थन करू नये. समाजातील विविध प्रलोभनांपासून दूर राहावे. मैत्री करताना ती कोणासोबत करावी याचा विचार करावा. विद्यार्थ्यांनी आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी ध्यानधारणा, अभ्यास व व्यायाम याकडे अधिक लक्ष द्यावे. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनात जर व्यसनापासून दूर राहण्याची क्षमता निर्माण केली, तर पुढील आयुष्यात तो विद्यार्थी कोणत्याही व्यसनाच्या आहारी जात नाही. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने कुठल्याही प्रकारच्या व्यसनाच्या आहारी जाऊ नये. असे प्रतिपादन महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात आयोजित जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पी.एस.आय. समीर अभंग साहेब यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय व श्रीगोंदा पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. आणि व्यसनमुक्ती विषयी विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रकाश साळवे उपस्थित होते. अध्यक्ष भाषणात डॉ. साळवे यांनी विद्यार्थ्यांनी व्यसनापासून तसेच समाजातील वाईट प्रवृत्ती पासून दूर राहावे असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्यूनिअर कॉलेजचे विभाग प्रमुख प्रा. शहाजी मखरे यांनी केले. पर्यवेक्षक प्रा. रत्नाकर झिटे यांनी आभार मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. राम ढगे यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील सर्व शिक्षक बंधू -भगिनी आणि विद्यार्थी- विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष