कोट्यावधी रुपये खर्चाच्या जलजीवन मिशन नळ पाणी पुरवठा योजना नेमक्या कोणासाठी ? ग्रामस्थांचा आणि गावांच्या सरपंच यांचा कट्टर विरोध

By : Polticalface Team ,06-07-2023

कोट्यावधी रुपये खर्चाच्या जलजीवन मिशन नळ पाणी पुरवठा योजना नेमक्या कोणासाठी ? ग्रामस्थांचा आणि गावांच्या सरपंच यांचा कट्टर विरोध दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड ता,०६ जुलै २०२३,दौंड तालुक्यातील पश्चिम भागात बोरीभडक प्रादेशिक जलजीवन मिशन नळ पाणी पुरवठा योजना अंदाजे ३० कोटी रुपये खर्चाची असून या योजनेची नेमकी मागणी कोणी केली, आशा प्रकारचा सवाल,? बोरीभडक , डाळिंब, ताम्हणवाडी आणि बोरिऐंदी येथील सरपंच यांनी उपस्थित करून या योजनेस आमचा विरोध असल्याचे स्पस्तपणे सांगितले आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण,विभाग क्र, १ पुणे यांचे वतीने कविता बोरीभडक प्रादेशिक जलजीवन मिशन नळ पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे, बोरीभडक डाळिंब, ताम्हणवाडी आणि बोरिऐंदी या चार गावासाठी ३० कोटी ९२ लाख ५५ हजार ४३१, रुपये खर्चाची ही योजना आहे.

विशेष बाब अशी की ही योजना मंजूर होऊन कंत्राटदार याने गावोगावी लोखंडी पाईप आणून टाकलेवर सरपंच चौकशी करू लागले, आम्ही तर या योजनेची मागणीच केली नाही, मग ही योजना मंजूर कशी व कोणाच्या मागणीने झाली, असा स्पस्ट सवाल डाळिंबाचे सरपंच बजरंग म्हस्के, बोरी भडकच्या सरपंच कविता बाळासाहेब कोळपे, बोरिऐंदी च्या सरपंच सविता मंगेश भोसेकर, ताम्हणवडीच्या सरपंच श्वेता अभी ताम्हाणे यांनी उपस्थित केला आहे.

ही योजना शेलारवाडी तलावातून करण्यात येणार असून तलाव ते गाव अंतर १३ कि,मी, आहे, या योजनेचा वार्षिक देखभाल दुरुस्ती कामगार आणि वीज खर्च वर्षाला ४५ लाख रुपये दाखवला असून प्रत्येक गावाला ११ लाखच्या वर येणार आहे.

विशेष म्हणजे या गावाच्या नळ पाणी पुरवठा योजना या मुळामुठा कालव्यावर आधारित असल्याने पाणी योग्य प्रमाणात मिळत आहे,या योजना आणि त्या योजनेचा देखभाल दुरुस्ती खर्च या ग्रामपंचायती करीत आहेत, असे असताना अवाढव्य खर्चअसणारी ही योजना गावची मागणी नसताना बळेच माथी मारण्याचे कारण काय ? योजनेचा अवाढव्य खर्च, त्या योजनेचे कर्ज फेड हप्ते आणि देखभाल दुरुस्ती खर्च भागवण्यासाठी गावे अडचणीत येतील, ग्रा पंचायतीचे अर्थ कारण विस्कळीत होईल.

$ योजना नेमकी कोणासाठी ? गावांची पाणी योजना व्यवस्थित योग्य प्रमाणात पाणी मिळत असताना आणि या बिग बजेट योजनेची या चारही गावात मागणी केली नसताना ही योजना मंजूर कशी झाली, असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे, ही योजना त्या योजनेच्या अधिकारी, कंत्राटदार, आणि पुढारी की आणखी कोणाच्या आर्थिक लाभासाठी अशी जोरदार चर्चा या चारही गावातून सुरू झाली आहे.

योजनेला गावकऱ्यांचा कट्टर विरोध होत असुन देखील, व आमची मागणी नसताना आमच्या माथी मारू नये, या योजनेस आमचा कट्टर विरोध असल्याचे ग्रामसभेत ठराव घेऊन तसे लेखी संबधीत खात्यास दिले आहे, त्या अनुषंगाने $ योजना मान्य नसेल तर रद्द करण्यात येईल, या योजने बाबत चारही गावाच्या सरपंच आणि संबधीत अधिकारी यांची आमदार राहुल कुल यांनी दौड येथे मिटिंग घेतली, सरपंच आणि प्रमुख कार्यकर्ते यांची मते ऐकल्यावर सदर योजनेस गावचा विरोध असेल तर ही योजना रद्द करण्यात येईल, असे आमदार राहुल कुल यांनी सांगितले आहे.
कंत्राटदारांची मनमानी, योजना राबवू द्या,सदर योजना अंदाजे ३१ कोटी ची आहे, यामध्ये फार मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे, काहीही करून ही योजना सरपंच व ग्रामस्थ यांनी करू द्यावी, यासाठी या योजनेचा कंत्रायदार सर्वते प्रयत्न करत आहे, विशेषतः आर्थिक आमिष दाखवू लागला आहे, आणि यामध्ये पोट कंत्राटदार असलेले जि.प. सदस्य पंचायत समिती सदस्य, सरपंच विरोधी गट सहकार्य करू लागले असल्याची जोरदार चर्चा आहे.
गावकऱ्यांच्या दृष्टीने पुढील काळात पाणी टंचाय होण्याची शक्यता नाकारता येत नाही, मात्र स्थानिक पातळीवर सरपंच व ग्रामस्थांचा विचार विनिमय घेऊन अंतिम निर्णय घ्यावा अशी अपेक्षा नागरिकांमध्ये व्यक्त केली जात आहे.
माजी सरपंच याचा खोडसाळ पणा आज ही ताम्हणवाडी येथे भरपूर पाणी मिळते, पोट कंत्राटदार असलेल्या येथील एका माजी सरपंच याने, पाण्याची तीव्र टंचाई, पाण्यासाठी वन वन अशी खोडसाळ बातमी एक पेपरला दिली, शेवटी त्याचेच पितळ उघडे पडले आहे

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष