श्रीगोंद्यात मनिपुर अत्याचार घटना व संभाजी भिडे याने महापुरुषांबद्दल काढलेल्या अपशब्द निषेधार्थ अखिल भारतीय समाजातर्फे निषेध सभा
By : Polticalface Team ,07-08-2023
लिंपणगाव (प्रतिनिधी) नुकतीच मनिपुर येथे घडलेली अमानवीय घटना, झालेला जातीय हिंसाचार व महिला भगिनींवर झालेले अत्याचार, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या बद्दल केलेले अशुभनीय व निंदनीय वक्तव्य, महात्मा फुले यांच्या विषयी केलेले अवमान कारक वक्तव्य, तसेच लाखो करोड लोकांचे श्रद्धास्थान असलेले साईबाबा यांच्या बद्दल केलेले वक्तव्य याचा जाहीर निषेध करिता श्रीगोंदा तालुक्यातील विविध सामाजिक संघटना व पदाधिकाऱ्यांनी निषेध सभा आयोजित करण्यात आली होती.
श्रीगोंदा येथे तहसील कार्यासमोर या निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी जिल्हा महिला काँग्रेसचे अध्यक्ष सौ अनुराधाताई नागवडे या होत्या. यावेळी उपस्थितांमध्ये नागवडे कारखान्याचे उपाध्यक्ष व ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस, घनश्याम शेलार, नगराध्यक्ष सौ शुभांगीताई पोटे,अॅड संभाजीराव बोरुडे, जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष स्मितल वाबळे, आदेश नागवडे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रा धर्मनाथ काकडे, प्रशांत दरेकर, बाळासाहेब बळे, कांतीलाल कोकाटे, संजय आनंदकर संतोष खेतमाळीस, टिळक भोस, सुरेखा लकडे, चांगदेव पाचपुते, रंगनाथ बिबे यांच्यासह असंख्य महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या निषेध सभेत आदिवासी समाजातील पाच महिलांचा सर्व धर्मियांतर्फे साडी चोळी देऊन सन्मानित करण्यात आलेहा मुद्दा बातमीच्या मध्यभागी घ्यावा.
याप्रसंगी या निषेध सभेत टिळक भोस, प्रा बाळासाहेब बळे, राहुल साळवे, नगराध्यक्ष शुभांगी पोटे, प्रशांत दरेकर, मुकुंद सोनटक्के, सुनीता दराडे, कांतीलाल कोकाटे, बंडू पंदरकर आदींनी मणिपूर महिलांवरील अत्याचार घटना तसेच माथेफिरू संभाजी भिडे यांनी महापुरुषांबद्दल काढलेल्या वक्तव्यात संदर्भात आपल्या भाषणातून तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत केंद्र व राज्य सरकारवर हल्ला चढवला.
यावेळी नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत म्हणाले की, या देशामध्ये सर्वसामान्य जनतेचे प्रश्न आणि अडचणी या प्रश्नांना बगल देऊन गलिच्छ राजकारण भाजप सरकार करत आहे. प्रत्येकाने आता निर्णय क्षमतेनुसार निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. लोकशाही देशांमध्ये भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर सेवा संस्था व इतर स्थानिक संस्थांच्या निवडणुका जाणीवपूर्वक थांबवल्या जात आहेत. आज देशामध्ये 13 लाख तीस हजार महिला बेपत्ता आहेत. केंद्रातील सरकार काय करत आहे. मणिपूर पेटले असून, फोडाफोडीचे राजकारण भाजपकडून केले जात आहे. देशात महिला सुरक्षित नाहीत. यासाठी सर्वांना एक विचाराने सामूहिक लढा द्यावा लागेल. घडल्या घटनेचा श्री नागवडे यांनी जाहीर निषेध व्यक्त केला.
ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार यावेळी निषेध नोंदताना म्हणाले की, मणिपूर मध्ये घडलेली घटना अत्यंत निंदनीय असून, या विषयावर चिंतन करावे अशी स्थिती आहे. छत्रपती, शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र या दुर्दैवी घटनेत उठत नाही. लढा उभारण्याचे आवश्यकता असून, ही घटना अतिशय लाजिरवाणी आहे. माजी सैनिकाच्या पत्नीची दिंड काढली जात असताना केंद्र सरकार मात्र कायद्यानुसार वागत नाही. त्यामुळे आता सर्वांना वैचारिक निर्णय घ्यावा लागेल. असे सांगून मणिपूर व भिडे याच्या वक्तव्याचा शेलार यांनी निषेध केला.
ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस निषेध व्यक्त करताना म्हणाले ,मनिपुर घटनेचा निषेधार्थ अनेक महिलांनी सडेतोड मते मांडून तीव्र शब्दात निषेध नोंदवला .ही अभिमानास्पद बाब आहे. संभाजी भिडे सारखा माथे फिरू याचा एकत्रितपणे सामूहिकरीत्या विचार संपवावा लागेल. त्यासाठी समाज जागृतीची गरज आहे. असे भोस यांनी म्हटले आहे.
अध्यक्षीय भाषणात महिला काँग्रेस अध्यक्षा सौ अनुराधाताई नागवडे यावेळी निषेध नोंदवताना म्हणाल्या की, मणिपूरमध्ये जी अन्याय व अत्याचारी घटनेमुळे आता महाराष्ट्रात सुद्धा असे प्रकार घडू शकते. वेळीच हे प्रकार रोखण्याची गरज आहे महिलांवर देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर अन्याय अत्याचार घडत आहेत. त्यामुळे सर्वांचा सुरक्षितेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. पक्ष विरहित प्रत्येकाने सामूहिक लढ्याची गरज आहे. असे सांगून घडलेल्या घटनेचा सौ नागवडे यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.
सूत्रसंचालन प्रा धर्मनाथ काकडे व प्रशांत दरेकर यांनी केले आभार मुकुंद सोनटक्के यांनी मानले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी