उजनी धरणातील पाणी पातळी अल्प प्रमाणात असताना लोकप्रतिनिधींनी पाणी सोडण्याची मागणी करणे अन्यायकारक!!! आमदार शिंदेंचा उजनीतील पाणी पळविण्याचा डाव कधीही यशस्वी होऊ देणार नाही डाॅ. विजय रोकडे..

By : Polticalface Team ,17-08-2023

उजनी धरणातील पाणी पातळी अल्प प्रमाणात असताना लोकप्रतिनिधींनी पाणी सोडण्याची मागणी करणे अन्यायकारक!!! आमदार शिंदेंचा उजनीतील पाणी पळविण्याचा डाव कधीही यशस्वी होऊ देणार नाही

डाॅ. विजय रोकडे.. करमाळा प्रतिनिधी करमाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजयमामा शिंदे व बंधू आमदार बबनराव शिंदे यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन उजनी धरणातून सीना-माढा,दहीगाव उपसा सिंचन योजना,उजनी कालवा, कंदर बोगदा या योजनेद्वारे पाणी सोडण्याची मागणी केली आहे.ही मागणी उजनी पाणलोट क्षेत्रातील शेतकर्यावरती अन्याय करनारी आहे.असे मत वांगी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष डॉ.विजय रोकडे यांनी व्यक्त केले आहे. यावेळी रोकडे यांनी बोलताना सांगितले की पावसाळ्याचे अडीच महिन्याहून अधिक कालावधी लोटला आहे.तरी उजनी धरणातील पाणी साठा अवघ्या तेरा टक्क्यांवरती आहे.मागील वर्षी याच वेळी धरणातील पाणी पातळी शंभर टक्के होती.परंतु सद्यस्थितीत पाणी पातळी अल्प प्रमाणात आहे.भविष्यात अशीच परिस्थिती राहीली तर आगामी काळात उजनी लाभक्षेत्रातील ऊस,केळी सह इतर फळबागांचे अस्तित्व धोक्यात येणार आहे.त्यामुळे येथील शेतकरी प्रचंड धास्तावला आहे.उजनी धरणासाठी येथील शेतकर्यांनी कसदार जमिनी दिल्या,वसलेली गावे प्रकल्पासाठी उठविण्यात आली.परंतू प्रकल्प ग्रस्तांना विचारात न घेता उजनीच्या पाण्याचे नियोजन केले जात आहे.उजनीच्या पाण्याचे संवर्धन करण्याची जबाबदारी दारी आमदार या नात्याने शिंदे यांची आहे.तरीही विद्यमान आमदारांकडूनच दहीगाव उपसा सिंचन योजनेचे नाव पुढे करुन माढा तालुक्यातील गावांना पाणी पळवण्याचा घाट घातला जात आहे.परंतु कदापिही हा डाव यशस्वी होऊ दिला जाणार नाही असे डॉ.रोकडे यांनी बोलताना सांगितले.
हा तर आमदार शिंदे बंधूंचा उजनीचा पाणी पळवण्याचा डाव
करमाळा तालुक्याची वरदायिनी असणाऱ्या उजनी धरणातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत चालली असून सध्या पाण्याचे भीषण संकट करमाळा तालुक्यावर भविष्यात येणार आहे अशातच आमदार बबनदादा शिंदे तसेच आमदार संजय मामा शिंदे या दोघा बंधूंनी उजनी धरणातील पाणी सीना माढा बोगद्यातून कालव्याद्वारे तसेच दहीगाव उपसा सिंचन योजनेद्वारे सोडण्या साठी शासन दरबारी निवेदन दिले आहे मात्र सध्या उजनी धरणात फक्त 13 टक्केच पाणी असल्याने ते पाणी उजनी परिसरातील विशेषता करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीसाठी व पिण्यासाठी राखीव ठेवण्यात यावे अशी मागणी करमाळा तालुक्यातील नागरिकांमधून जोर धरीत आहे मात्र उलटपणे आमदार शिंदे बंधू उजनीचे पाणी पळवण्याचा प्रयत्न करीत आहे

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी