उजनी धरणातील पाणी पातळी अल्प प्रमाणात असताना लोकप्रतिनिधींनी पाणी सोडण्याची मागणी करणे अन्यायकारक!!! आमदार शिंदेंचा उजनीतील पाणी पळविण्याचा डाव कधीही यशस्वी होऊ देणार नाही डाॅ. विजय रोकडे..

By : Polticalface Team ,17-08-2023

उजनी धरणातील पाणी पातळी अल्प प्रमाणात असताना लोकप्रतिनिधींनी पाणी सोडण्याची मागणी करणे अन्यायकारक!!! आमदार शिंदेंचा उजनीतील पाणी पळविण्याचा डाव कधीही यशस्वी होऊ देणार नाही

डाॅ. विजय रोकडे.. करमाळा प्रतिनिधी करमाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजयमामा शिंदे व बंधू आमदार बबनराव शिंदे यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन उजनी धरणातून सीना-माढा,दहीगाव उपसा सिंचन योजना,उजनी कालवा, कंदर बोगदा या योजनेद्वारे पाणी सोडण्याची मागणी केली आहे.ही मागणी उजनी पाणलोट क्षेत्रातील शेतकर्यावरती अन्याय करनारी आहे.असे मत वांगी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष डॉ.विजय रोकडे यांनी व्यक्त केले आहे. यावेळी रोकडे यांनी बोलताना सांगितले की पावसाळ्याचे अडीच महिन्याहून अधिक कालावधी लोटला आहे.तरी उजनी धरणातील पाणी साठा अवघ्या तेरा टक्क्यांवरती आहे.मागील वर्षी याच वेळी धरणातील पाणी पातळी शंभर टक्के होती.परंतु सद्यस्थितीत पाणी पातळी अल्प प्रमाणात आहे.भविष्यात अशीच परिस्थिती राहीली तर आगामी काळात उजनी लाभक्षेत्रातील ऊस,केळी सह इतर फळबागांचे अस्तित्व धोक्यात येणार आहे.त्यामुळे येथील शेतकरी प्रचंड धास्तावला आहे.उजनी धरणासाठी येथील शेतकर्यांनी कसदार जमिनी दिल्या,वसलेली गावे प्रकल्पासाठी उठविण्यात आली.परंतू प्रकल्प ग्रस्तांना विचारात न घेता उजनीच्या पाण्याचे नियोजन केले जात आहे.उजनीच्या पाण्याचे संवर्धन करण्याची जबाबदारी दारी आमदार या नात्याने शिंदे यांची आहे.तरीही विद्यमान आमदारांकडूनच दहीगाव उपसा सिंचन योजनेचे नाव पुढे करुन माढा तालुक्यातील गावांना पाणी पळवण्याचा घाट घातला जात आहे.परंतु कदापिही हा डाव यशस्वी होऊ दिला जाणार नाही असे डॉ.रोकडे यांनी बोलताना सांगितले.
हा तर आमदार शिंदे बंधूंचा उजनीचा पाणी पळवण्याचा डाव
करमाळा तालुक्याची वरदायिनी असणाऱ्या उजनी धरणातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत चालली असून सध्या पाण्याचे भीषण संकट करमाळा तालुक्यावर भविष्यात येणार आहे अशातच आमदार बबनदादा शिंदे तसेच आमदार संजय मामा शिंदे या दोघा बंधूंनी उजनी धरणातील पाणी सीना माढा बोगद्यातून कालव्याद्वारे तसेच दहीगाव उपसा सिंचन योजनेद्वारे सोडण्या साठी शासन दरबारी निवेदन दिले आहे मात्र सध्या उजनी धरणात फक्त 13 टक्केच पाणी असल्याने ते पाणी उजनी परिसरातील विशेषता करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीसाठी व पिण्यासाठी राखीव ठेवण्यात यावे अशी मागणी करमाळा तालुक्यातील नागरिकांमधून जोर धरीत आहे मात्र उलटपणे आमदार शिंदे बंधू उजनीचे पाणी पळवण्याचा प्रयत्न करीत आहे

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.