आधुनिक तंत्रज्ञानाबरोबर सेंद्रिय खतांचा वापर करून भरघोस उत्पन्न मिळवा राजेंद्र पवार
नागवडे कारखाना कार्यस्थळावर ऊस पिक चर्चासत्र उत्साहात संपन्न
By : Polticalface Team ,21-08-2023
लिंपणगाव (प्रतिनिधी)- ऊस शेती बरोबरच इतर पिके घेत असतानाच प्रत्येक शेतकऱ्याने आता भविष्य काळात शेती सुधारण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञाना बरोबर सेंद्रिय खतांचा जास्तीत जास्त वापर करूनच शेती सुधारावी असा मौलिक सल्ला ज्येष्ठ शेतीतज्ञ राजेंद्र पवार यांनी ऊस शेती परिसंवाद कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.
सहकार महर्षी नागवडे कारखाना कार्यस्थळावर नागवडे कारखाना यांच्या संयुक्त विद्यमाने धनश्री एंटरप्राइजेस खत डेपोचा उद्घाटन समारंभ व ऊस पिक चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे हे होते.
यावेळी प्रमुख उपस्थितांमध्ये नागवडे कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस, डॉ. हेमांगी जांभेकर, दीपकराव सपकाळ, भूषण जांभेकर, यांच्यासह कारखान्याचे आजी-माजी संचालक कार्यकारी संचालक रमाकांत नाईक शेतकी अधिकारी एस बी कुताळ, कोजन मॅनेजर डी.एम तावरे, ऊस विकास अधिकारी प्रसाद भोसले, इंजिनिअर मधुकर जगताप यांच्यासह सर्व खाते प्रमुख, सभासद, ऊस उत्पादक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना राजेंद्र पवार पुढे म्हणाले की, श्रीगोंदा तालुका हा 75 टक्के सिंचन क्षेत्रा खाली मोडतो. सिंचनाबाबत तालुक्यात चांगले काम झालेले आहे. परंतु अलीकडे पावसाचे होत असलेले अत्यल्प प्रमाण लक्षात घेता ठिबक सिंचनचा अधिकाधिक वापर करून शेतकऱ्यांनी अधिक उत्पन्न मिळवली पाहिजे. उसाच्या बाबतीमध्ये देखील आधुनिक पद्धतीने ऊस शेती केली पाहिजे, खर्च कमी आणि उत्पन्न जास्त याकडे अभ्यासपूर्ण शेती उद्योग हाताळला पाहिजे. बौद्धिक दृष्ट्या शेती करण्याची गरज असल्याचे श्री पवार यांनी यावेळी सांगितले.
वसुमित्र कृषी सल्लागार डॉ. हेमांगी जांभेकर यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, रासायनिक खत व क्षारयुक्त पाणी यामुळे जमिनीचा ऑर्गानिक कार्बन कमी झालेला असल्याने साधारणता तो दोन ते पाच टक्के पर्यंत पाहिजे, यासाठी रासायनिक शेती ऐवजी सेंद्रिय खतांचा वापर अधिक केला पाहिजे. प्रेस मेड पासून प्रोम तयार करून त्याचा वापर उसा सारख्या पिकाला फॉस्फेटची कमतरता भरून येऊ शकते. यासह विविध पिकांना कोणते व किती खते वापरावीत याविषयी सविस्तर असे मार्गदर्शन केले.
कृषी सल्लागार विश्वजीत वाबळे यावेळी म्हणाले की शेतकऱ्यांनी प्रथमतः माती परीक्षणानंतर पिकाला खत टाका. पाणी द्या कमी खर्चामध्ये अधिकाधिक उत्पन्न मिळवण्यास संदर्भात मौलिक असे मार्गदर्शन केले.
यावेळी नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, श्रीगोंदा तालुक्यातील शेती उद्योगातून शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्न मिळवण्यासाठी सहकार महर्षी दिवंगत शिवाजीराव नागवडे बापू यांनी कारखाना स्थापनेपासून वेळोवेळी शेतकऱ्यांना ऊस परिसंवाद घेऊन मार्गदर्शन केले. परंतु शेतकरी स्वतः शेतीबाबत निर्णय घेताना दिसत नाहीत. शेतकरी सध्या जुन्या पद्धतीने शेती करतात. शेतीतज्ञ दीपक सपकाळ हे बारामती परिसरात अनेक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. तिथे जाऊन आपण माहिती उपलब्ध करून घेतली पाहिजे. असे सांगून श्री नागवडे आणखी पुढे म्हणाले की रासायनिक खते आणि पिकांवरील विविध प्रकारच्या फवारण्या त्यामुळे त्याचा मानवी आरोग्यावर देखील मोठा विपरीत परिणाम होत असून, आयुष्यमान देखील घटले जात आहे. अत्यंत कमी वयामध्ये देखील हृदयविकाराचे प्रमाण वाढताना दिसत आहेत. ही गंभीर बाब समोर येताना दिसत आहे. भविष्यकाळात आता सर्वांनाच सतर्क होऊन उत्तम प्रकारे शेती करण्याची आवश्यकता आहे. असे सांगून ते आणखी पुढे म्हणाले की, रासायनिक खतापेक्षा सेंद्रिय पद्धतीने शेती करावी माती परीक्षण करून विविध पिके घ्यावीत. निश्चितपणे उत्पन्नात वाढ होईल. दिवसेंदिवस होणारे पावसाचे अत्यल्प प्रमाण त्यामुळे ठिबक सिंचन सारखा वापर करून आधुनिक पद्धतीने शेती करावी, असे आवाहन श्री नागवडे यांनी यावेळी केले.
सूत्रसंचालन भाऊसाहेब बांदल यांनी केले तर कारखान्याचे संचालक राकेश पाचपुते यांनी आभार मानले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी