घोडचे आवर्तन आठ दिवसात न सोडल्यास सिंचन भरणासमोर धरणे आंदोलनकरू- राजेंद्र नागवडे
By : Polticalface Team ,23-08-2023
लिंपणगाव( प्रतिनिधी) घोडचे आवर्तन आठ दिवसात 31 ऑगस्ट पर्यंत न सोडल्यास पुणे येथील सिंचन भावना समोर शेतकऱ्यां समवेत धरणे आंदोलन केले जाईल असा इशारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी श्रीगोंदा येथील आयोजित धरणे आंदोलन प्रसंगी दिला आहे.
श्रीगोंदा येथील तहसील कार्यालयासमोर काँग्रेस पक्षाच्या वतीने केंद्र शासनाने कांदा निर्यातीवर 40 टक्के निर्यात कर त्वरित रद्द करावा व घोड धरणातून तातडीने आवर्तन सोडावे या प्रश्नांकरता काँग्रेस पक्षाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे हे होते.
या धरणे आंदोलनात श्रीगोंद्याचे नगराध्यक्षा शुभांगी पोटे, नागवडे जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष स्मितल वाबळे, कारखान्याचे संचालक सुभाषराव शिंदे, रामचंद्र नागवडे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रा धर्मनाथ काकडे, अॅड रंगनाथ बिबे, अनिल ठवाळ, प्रमोद शिंदे, चांगदेव पाचपुते यांच्यासह नागवडे कारखान्याचे आजी-माजी संचालक, श्रीगोंदा मार्केट कमिटीचे संचालक, पंचायत समितीचे सदस्य, खरेदी विक्री संघाचे सदस्य, विविध कार्यकारी सेवा संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आंदोलकांसमोर बोलताना श्री नागवडे पुढे म्हणाले की, केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर लावलेला आघोरी स्वरूपाचा 40 टक्के निर्यात कर त्वरित रद्द करून कांदा निर्यातीस परवानगी द्यावी शेतकरी कांदा उत्पन्न घेत असताना सततचा पाऊस असतानाही शेतकऱ्यांनी कांद्याला चांगला भाव मिळेल ही अपेक्षा ठेवली. कष्टातून कांदा पिक घेतले. परंतु केंद्र व राज्य सरकार मात्र शेतकरी विरोधी धोरण राबवत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था आहे. केंद्र व राज्य सरकार वारंवार शेतकऱ्यांच्या प्रश्नसंदर्भात घोषणा देतात. परंतु त्याची अंमलबजावणी केली जात नाही. केंद्र व राज्य सरकार शेतकरी विरुद्ध धोरण राबवत आहे. ईडी सारख्या नोटीसा देऊन कष्टकरी शेतकऱ्यांचा आवाज दाबला जात आहे. हे सरकारचे धोरण शेतकरी व सर्वसामान्य जनता कदापिही सहन करणार नाही. असे सांगून श्री नागवडे पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांना कष्ट करून पिकविलेला माल कवडीमोल किमतीने विकावा लागतो. भाव वाढला तर लगेच त्याच्यावर 40% निर्यात कर लावला जातो. त्यामुळे संपूर्ण देश व राज्यातील शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झालेली आहे. घोड कालव्याचे हक्काचे पाणी आठ दिवसात न सोडल्यास सिंचन भावना समोर शेतकऱ्यांना बरोबर घेऊन पुन्हा तीव्र धरणे आंदोलन करण्याचा इशारा श्री नागवडे यांनी यावेळी दिला.
याप्रसंगी श्रीगोंद्याचे नायब तहसीलदार निलेश वाघमारे व पी आय ज्ञानेश्वर भोसले यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले.
यावेळी ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस यावेळी बोलताना म्हणाले की, दोन लाख टन कांदा नाफेड मार्फत २४०० रुपयांनी खरेदी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय अत्यंत दुर्दैवी असून शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा हा निर्णय अत्यंत निंदनीय असल्याचे श्री भोस यावेळी सांगितले.
युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे यावेळी म्हणाले की शेतकऱ्यांनी आंदोलने किती दिवस करायचे. केंद्र व राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे शेतकऱ्यांना आंदोलन करण्याची वारंवार वेळ येऊन ठेपले आहे. घोड धरणामध्ये एका रोटेशन चे पाणी आहे, परंतु ते सोडले जात नाही. पावसाने पाठ फिरवली. महागाईचा संपूर्ण देशात भस्मासुर झाला असून, शेतकऱ्यांमध्ये केंद्र व राज्य सरकार विषयी नाकारती भावना निर्माण झाल्याचे श्री वाबळे यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी मुकुंद सोनटक्के, शिवाजीराव पाचपुते, नागवडे कारखान्याचे संचालक प्रशांत दरेकर, भाऊसाहेब बरकडे, प्रा धर्मनाथ काकडे आदींसह अनेक शेतकरी व कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढत तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. प्रस्ताविक नागवडे कारखान्याचे संचालक प्रशांत दरेकर यांनी केले. सूत्रसंचालन धर्मनाथ काकडे यांनी केले. तर आभार युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे यांनी मानले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी