घोडचे आवर्तन आठ दिवसात न सोडल्यास सिंचन भरणासमोर धरणे आंदोलनकरू- राजेंद्र नागवडे
                      
                
            
               By : Polticalface Team ,23-08-2023
       
               
                           
                  लिंपणगाव( प्रतिनिधी) घोडचे आवर्तन आठ दिवसात 31 ऑगस्ट पर्यंत न सोडल्यास पुणे येथील सिंचन भावना समोर शेतकऱ्यां समवेत धरणे आंदोलन केले जाईल असा इशारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी श्रीगोंदा येथील आयोजित धरणे आंदोलन प्रसंगी दिला आहे.
         श्रीगोंदा येथील तहसील कार्यालयासमोर काँग्रेस पक्षाच्या वतीने केंद्र शासनाने कांदा निर्यातीवर 40 टक्के निर्यात कर त्वरित रद्द करावा व घोड धरणातून तातडीने आवर्तन सोडावे या प्रश्नांकरता काँग्रेस पक्षाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे हे होते. 
        या धरणे आंदोलनात श्रीगोंद्याचे नगराध्यक्षा शुभांगी पोटे, नागवडे जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष स्मितल वाबळे, कारखान्याचे संचालक सुभाषराव शिंदे, रामचंद्र नागवडे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रा धर्मनाथ काकडे, अॅड रंगनाथ बिबे, अनिल ठवाळ, प्रमोद शिंदे, चांगदेव पाचपुते यांच्यासह नागवडे कारखान्याचे आजी-माजी संचालक, श्रीगोंदा मार्केट कमिटीचे संचालक, पंचायत समितीचे सदस्य, खरेदी विक्री संघाचे सदस्य, विविध कार्यकारी सेवा संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.     
      यावेळी आंदोलकांसमोर बोलताना श्री नागवडे पुढे म्हणाले की, केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर लावलेला आघोरी स्वरूपाचा 40 टक्के निर्यात कर  त्वरित रद्द करून कांदा निर्यातीस परवानगी द्यावी शेतकरी कांदा उत्पन्न घेत असताना सततचा पाऊस असतानाही शेतकऱ्यांनी कांद्याला चांगला भाव मिळेल ही अपेक्षा ठेवली. कष्टातून कांदा पिक घेतले. परंतु केंद्र व राज्य सरकार मात्र शेतकरी विरोधी धोरण राबवत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था आहे. केंद्र व राज्य सरकार वारंवार शेतकऱ्यांच्या प्रश्नसंदर्भात घोषणा देतात. परंतु त्याची अंमलबजावणी केली जात नाही.  केंद्र व राज्य सरकार  शेतकरी विरुद्ध धोरण राबवत आहे. ईडी सारख्या नोटीसा देऊन कष्टकरी शेतकऱ्यांचा आवाज दाबला जात आहे. हे सरकारचे धोरण शेतकरी व सर्वसामान्य जनता कदापिही सहन करणार नाही. असे सांगून श्री नागवडे पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांना कष्ट करून पिकविलेला माल  कवडीमोल किमतीने विकावा लागतो. भाव वाढला तर लगेच त्याच्यावर 40% निर्यात कर लावला जातो. त्यामुळे संपूर्ण देश व राज्यातील शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झालेली आहे. घोड कालव्याचे हक्काचे पाणी आठ दिवसात न सोडल्यास सिंचन भावना समोर शेतकऱ्यांना बरोबर घेऊन पुन्हा तीव्र धरणे आंदोलन करण्याचा इशारा श्री नागवडे यांनी यावेळी दिला.
      याप्रसंगी श्रीगोंद्याचे नायब तहसीलदार निलेश वाघमारे व पी आय ज्ञानेश्वर भोसले यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले.
       यावेळी ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस यावेळी बोलताना म्हणाले की, दोन लाख टन कांदा नाफेड मार्फत २४०० रुपयांनी खरेदी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय अत्यंत दुर्दैवी असून शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा हा निर्णय अत्यंत निंदनीय असल्याचे श्री भोस यावेळी सांगितले.
        युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे यावेळी म्हणाले की शेतकऱ्यांनी आंदोलने किती दिवस करायचे. केंद्र व राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे शेतकऱ्यांना आंदोलन करण्याची वारंवार वेळ येऊन ठेपले आहे. घोड धरणामध्ये एका रोटेशन चे पाणी आहे, परंतु ते सोडले जात नाही. पावसाने पाठ फिरवली. महागाईचा संपूर्ण देशात भस्मासुर झाला असून, शेतकऱ्यांमध्ये केंद्र व राज्य सरकार विषयी नाकारती भावना निर्माण झाल्याचे श्री वाबळे यांनी यावेळी सांगितले.
        याप्रसंगी मुकुंद सोनटक्के, शिवाजीराव पाचपुते, नागवडे कारखान्याचे संचालक प्रशांत दरेकर, भाऊसाहेब बरकडे, प्रा धर्मनाथ काकडे आदींसह अनेक शेतकरी व कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढत तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. प्रस्ताविक नागवडे कारखान्याचे संचालक प्रशांत दरेकर यांनी केले. सूत्रसंचालन धर्मनाथ काकडे यांनी केले. तर आभार युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे यांनी मानले.
              
              
वाचक क्रमांक :
                                    
                                    
                                                                   
                                                              
                                                              
                                    
                                        
                                          
                            
              							
							
							
							प्रकाश म्हस्के 
							संपादक 							
 
							
              
                
 
                
                
             		  	 							  
  स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
      
   
														  
  भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती  
  							  
  श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
  							  
  भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
      
   
														  
  भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
  							  
  कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात. 
  							  
  कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न 
      
   
														  
  त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी 
  							  
  श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला  भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
  							  
  दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
      
   
														  
  निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
  							  
  बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. 
  							  
  लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना. 
      
   
														  
  पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे 
  							  
  पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट 
  							  
  दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
      
   
														  
  लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
  							  
  दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई 
  							  
  श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
      
   
														  
  श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष