बिबट्याची पिल्लांची अफवा मात्र ते निघाले उदमांजर शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
By : Polticalface Team ,25-08-2023
लिंपणगाव( प्रतिनिधी) श्रीगोंदा तालुक्यातील लिंपणगाव शिवारातील शेंडेवाडी येथील कणसे वस्तीवर उसाच्या शेतात बिबट्याची पिल्ले दिसली पिल्ले दिसून शेतकरी घाबरले मात्र ते निघाले उदमांजर. ही घटना शुक्रवारी 25 रोजी दुपारी १२ वाजता घडली. या शेंडेवाडीतील संबंधित शेतकरी उसाच्या शेतीला पाणी देत असताना अचानक त्यांना बिबट्याच्या मादीची पिल्ले निदर्शनास आली. ते पाहिल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाल्याने त्यांनी येथील दीपक शेळके या युवक कार्यकर्त्याला कल्पना देताच श्री शेळके यांनी स्थानिक पत्रकार नंदकुमार कुरुमकर यांना बिबट्या संबंधित माहिती कळविली. पत्रकार कुरुमकर यांनी तात्काळ तालुक्याचे वनअधिकारी श्रीमती खराडे मॅडम यांच्याशी संपर्क करून घडल्या घटनेची माहिती देतात वनाधिकाऱ्यांनी वनरक्षक नितीन डफडे यांना घटनास्थळीची माहिती घेण्याचे सांगितले. वनरक्षक श्री डफडे यांनी संबंधित शेतकऱ्याच्या व्हाट्सअपवर त्या पिल्लांचे फोटो काढून बिबट्याचे पिल्लू संदर्भात खात्री करून घेतली. परंतु ते निघाले उद मांजराची तीन पिल्ले. खात्री पटल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण कमी झाले.
दरम्यान मुंढेकरवाडी, शेंडेवाडी, गणेशा, आनंदवाडी, लोणी व्यंकनाथ या परिसरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून बिबट्याचा वावर वारंवार दिसतो. शेतकरी व शेतमजूर मात्नर आपला जीव मोठे धरून शेतामध्ये काम करत आहेत बिबट्या केव्हा येणारे हल्ला करेल हे भीतीचे वातावरण या गावांमध्ये कायमच दिसून येते. शेंडेवाडी येथील संबंधित शेतकऱ्याला बिबट्याच्या आकाराची तीन पिल्ले दिसल्याने मनामध्ये रुक रुक वाढली. त्यांचे शेतामध्ये काम करण्याचे धाडस झाले नाही. यापूर्वी या परिसरांमध्ये बिबट्याने अनेक वेळा धुमाकूळ घालून पाळीव जनावर हल्ले करण्याचे प्रकार नेहमीच पहावयास मिळत आहेत. त्यामध्ये वनकर्मचाऱ्यांची संख्या तुटुपुंजी असल्याने त्यांना घटनास्थळी जाण्यासाठी विलंब लागतो. हे प्रकार थांबवण्यासाठी राज्य सरकारने वन कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याचे अपेक्षा आहे. सद्यस्थितीला भीमा नदी काठावरील गावांमध्ये जास्त करून बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात दिसत आहे. तेथे ऊस शेती मोठ्या प्रमाणावर असून, नदीकाठावर झाडांचे जंगल असल्याने त्यांना तिथे दडण व आश्रय मिळतो अशा परिस्थितीत ते सायंकाळी गाव परिसरातील वस्त्यांमध्ये बेधडक जनावरांवर हल्ले करून बळी घेत आहेत. विशेष म्हणजे श्रीगोंदा तालुक्यात वन अधिकारी व वन कर्मचारी संख्या कमी असतानाही घटनेची माहिती कळताच तेथे जाऊन माहिती घेतात. व बिबट्या संदर्भात घ्यावयाची काळजी व उपाय यासंबंधी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात. आपले उत्तम प्रकारे कर्तव्य बजावतात. हे प्रकार रोखण्यासाठी वन कर्मचाऱ्यांना तालुक्याच्या ठिकाणी बिबट्यांना झेरबंद करण्यासाठी कर्मचारी संख्या वाढवून पिंजरे देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध करण्याची आवश्यकता असल्याचे शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे. मात्र उद मांजराच्या पिल्लाने बिबट्या समजून शेतकऱ्यांची भीती अधिक वाढण्याचे शेतकरी सांगतात.
वाचक क्रमांक :