अहमदनगर जिल्ह्यातून 1000 गावात काँग्रेसची जनसंवाद पदयात्रा जाणार.. - जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे.

By : Polticalface Team ,26-08-2023

अहमदनगर जिल्ह्यातून 1000 गावात काँग्रेसची जनसंवाद पदयात्रा जाणार.. - जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे.    
   लिंपणगाव (प्रतिनिधी). - केंद्रातील भाजप सरकारच्या अन्यायकारक धोरण भ्रष्टाचार लोकशाहीची गळचेपी व सत्तेचा गैरवापर या विरोधात जनसमानसामध्ये जागृती निर्माण करण्याचे हेतूने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून राज्यभर जनसंवाद पदयात्रा काढली जाणार आहे या पदयात्रेचा उत्तर महाराष्ट्र विभागातील शुभारंभ दिनांक 4 सप्टेंबर रोजी अहमदनगरच्या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यापासून विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून या पदयात्रेच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यातील 1000 गावापर्यंत ही जनसंवाद पदयात्रा आयोजित करण्यात येणार आहे अशी माहिती अहमदनगर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी दिली.
अहमदनगर जिल्हा काँग्रेसच्या वतीने जनसंवाद पदयात्रेचे नियोजन करण्यासाठी आयोजित केलेल्या जिल्हा काँग्रेसच्या बैठकीमध्ये ते बोलत होते. सदर बैठकीस आमदार लहू कानडे, प्रदेश काँग्रेसचे सचिव सचिन गुंजाळ, जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष स्मितल वाबळे व जिल्ह्याचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना श्री नागवडे पुढे म्हणाले, अहमदनगर जिल्ह्यातील 146 पंचायत समितीचे गण विचारात घेऊन प्रत्येक पंचायत समिती गणात असणाऱ्या मंडल काँग्रेसच्या माध्यमातून प्रत्येक गावापर्यंत जनसंवाद पदयात्रा काढण्याचे काम मंडल काँग्रेसचे पदाधिकारी करणार आहेत सदर जनसंवाद पदयात्रेच्या माध्यमातून लोकांच्या विविध प्रश्नांची मांडणी करणाऱ्या कॉर्नर सभाचे आयोजन या निमित्ताने केले जाणारे असून भारतीय जनता पार्टीचे सरकारची शेतकरी विरोधी धोरणाबाबत ची भूमिका या निमित्ताने मांडण्यात येणार आहे.
प्रदेश काँग्रेसचे सचिव सचिन गुंजाळ यांनी जनसंवाद पदयात्रेची भूमिका स्पष्ट केली या माध्यमातून प्रत्येक गावात स्वतंत्र पदयात्रा आयोजित करण्यात येणार आहे तसेच जिल्हा परिषदेच्या गटाच्या ठिकाणी मोठ्या बाजारपेठेच्या गावात पदयात्रा व सभेचे आयोजन करण्यात येणार आहे तर तालुक्याच्या ठिकाणी तालुका पातळीवर काँग्रेसच्या सर्व संघटना एकत्र येऊन प्रत्येक तालुक्यात दिनांक 3 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर या दहा दिवसाच्या काळात पदयात्रा व जाहीर सभेचे आयोजन करण्यात येणार आहे.
आमदार लहू कानडे याप्रसंगी बोलताना म्हणाले भारतीय जनता पार्टीच्या गेल्या नऊ वर्षाच्या कारकिर्दीच्या बाबत शेतकरी विरोधी घेतलेल्या धोरणाबाबत वाढलेल्या महागाईमुळे सामान्य माणसाचे झालेले हाल तर शेतकऱ्याच्या कांद्याच्या प्रश्नापासून तर विविध प्रश्नांबाबत केलेले अन्यायकारक निर्णय या जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून प्रत्येक गावागावात मांडण्याचे काम काँग्रेसचा कार्यकर्ता करणार असून या जनसंवाद यात्रेमध्ये जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आव्हान आमदार कानडे यांनी केले.
याप्रसंगी श्री धर्मनाथ काकडे, बाळासाहेब आढाव ,नासिर शेख, अरुण म्हस्के, अरुण पाटील नाईक, समीर काझी, शिवाजी नेहे, भानुदास बोराटे, संभाजी माळवदे, प्रकाश पगारे , शोभा पातारे मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच या महत्त्वपूर्ण बैठकीसाठी प्रशांत दरेकर, कार्लस साठे, रंजन जाधव, विष्णुपंत खंडागळे, शहाजीराजे भोसले, संदीप पुंड, रिजवान शेख, युवक काँग्रेस शहराध्यक्ष मोहसीन शेख, प्रवीण गीते, अज्जू शेख, प्रकाश शेलार, संभाजी माळवदे, संजय पगारे आदींसह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष