By : Polticalface Team ,30-08-2023
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड ता २९ ऑगस्ट २०२३
पुणे जिल्हा व दौंड तालुक्यात पावसाने दडी मारल्याने कोरडा दुष्काळाचे संकट अधिक वाढले असल्याने. पावसाविना शेत शिवारातील पिके होरपडून गेली असून नदी तलाव नाले कोरडे पडले आहेत. काही ठिकाणी नेहमी पेक्षा कमी प्रमाणात पाऊस पडल्याने जमिनीतील पाण्याची पातळी खोलवर गेली आहे. त्यामुळे शासनाने पुणे जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपय अनुदान देण्यात यावे, अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने दौंड तालुका तहसीलदार मा अरुण शेलार यांच्याकडे दि,२९ ऑगस्ट २०२३ रोजी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा युवक अध्यक्ष मयूर आबा सोळसकर यांनी दिली.
दौंड तालुक्यात नेहमी पेक्षा पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे, गेल्या अडीच महिन्यापासून पावसाने या भागात पाठ फिरवली आहे, त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी हवालदिल झाला आहे.
दौंड तालुक्यामध्ये शेतीपुरक अनेक व्यवसाय चालतात या मध्ये दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. मात्र पाऊस न झाल्याने जनावरांच्या चाऱ्याचा देखील गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे, सुरुवातीला कमी प्रमाणात पावसाने हजेरी लावली असल्याने शेतकऱ्यांनी शेतामध्ये पेरण्या केल्या परंतु पाऊस वेळेवर न पडल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, पेरणीसाठी बी बियाणे खते खरेदी करून आज रोजी शेतकरी अडचणीत सापडला आहे.
या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दखल घेऊन परिस्थितीचा गांभीर्यपूर्वक विचार करावा, व सरसकट शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत करण्यात यावी, अशी मागणी दौंड तहसीलदार यांना निवेदनाद्वारे मराठा महासंघाच्या वतीने करण्यात आली असल्याचे निवेदनात नमूद केले आहे,
दौंड तालुका अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन दौंड तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार नरेंद्र शिंदे व पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार मा प्रकाश भोंडवे यांना देण्यात आले तसेच दौंड तालुक्यातील नागरिकांच्या शिधापत्रिकेबाबत अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत, या संदर्भात ग्रामीण भागात शिबिर घेण्याची मागणी करण्यात आली आहे, या वेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे युवक अध्यक्ष मयूर सोळसकर, जिल्हा शेतकरी आघाडीचे अध्यक्ष विशाल कुंजीर, जिल्हा युवक कार्याध्यक्ष सुरज चोरगे, दौंड तालुका अध्यक्ष दिनेश गायकवाड, युवक अध्यक्ष भाऊसाहेब जगताप, शेतकरी अध्यक्ष विशाल राजवडे, खजिनदार प्रकाश तरटे, विद्यार्थी अध्यक्ष समीर लोहकरे, शेतकरी उपाध्यक्ष विकास टेमगिरे, युवक प्रसिद्धीप्रमुख गणेश दिवेकर, युवक उपाध्यक्ष प्रशांत ताडगे आदि पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाचक क्रमांक :
अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी
दौड शुगर साखर कारखान्यात एका उस वाहनाचे दोन वेळा वजन करून आर्थिक फसवणुक प्रकरणी ऋषिकेश गिरीधर चैंडे याचे विरुद्ध गुन्हा दाखल.
ओंकार साखर ग्रूप कर्मचाऱ्यांसाठी २०% पगारवाढ जाहीर.चेअरमन मा.श्री.बाबुराव बोत्रे पाटील.
दौंड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 दौंड शहरातील मतदार जन जागृती पथनाट्याने नागरिकांचे लक्ष वेधले
कुरकुंभ येथील देवांश पान शॉप टपरीच्या आडोशाला देशी दारू टँगो पंच विक्री अट्यावर पोलिसांची कारवाई आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
यवत ग्रामपंचायत कार्यालयात आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे. आदर्श पिता रामजी बाबा आंबेडकर. पंडित जवाहरलाल नेहरू. महापुरुषांची जयंती साजरी.
देवदर्शन यात्रेला गेलेल्या बसचा भीषण अपघात 20 महिला जखमी
श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार
श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार
श्रीगोंदा नगरपालिका निवडणुक महाविकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सुरू. यवत नगरी हरिनामाने झाली भक्तीमय
नगराध्यक्ष पदासाठी इंद्रायणी पाचपुते चर्चेत ? श्रीगोंदा नगरीत वातावरण वातावरण सस्पेन्स .!
स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती
श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी
श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक