बाहेरील कारखान्या प्रमाणे उच्चांकी गाळप झाल्यास नागवडे कारखाना ही ऊस भावात मागे राहणार नाही अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे

By : Polticalface Team ,30-08-2023

बाहेरील कारखान्या प्रमाणे उच्चांकी गाळप झाल्यास नागवडे कारखाना ही ऊस भावात मागे राहणार नाही अध्यक्ष  राजेंद्र दादा नागवडे लिंपणगाव (प्रतिनिधी)- बाहेरील कारखान्यांप्रमाणे नागवडे कारखान्याचे उच्चांकी गाळप झाल्यास निश्चितपणे पुढील गाळपास ऊस भाव देण्यात मागे राहणार नाही, अशी ग्वाही नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे यांनी सर्वसाधारण सभेत बोलताना दिले.

सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखान्याची सन 2022 23 या आर्थिक वर्षाची 58 वी सर्वसाधारण सभा कारखाना कार्यस्थळावर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. अहवाल वाचन कारखान्याचे कार्यकारी संचालक रमाकांत नाईक यांनी केले. सभेपुढील १ ते 14 विषय मंजूर करण्यात आले.

यावेळी अध्यक्ष स्थानावरून बोलताना कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे यावेळी बोलताना म्हणाले की, कारखान्याचे जेवढे ऊस गाळप उच्चांकी होईल त्यानुसार बाहेरील कारखान्यांप्रमाणे नागवडे कारखाना देखील ऊस भाव देईल सहकारी साखर कारखानदारीला सहकाराच्या नियमानुसारच कारभार पहावा लागतो. खाजगी कारखान्यांना बंधने नाहीत त्यामुळे सहकारी साखर कारखान्याची ऊस गळतात जितकी रिकवरी जास्त तेवढा भाव देता येतो. हा सहकाराचा नियम आहे. तरी देखील बाहेरील कारखान्याप्रमाणे उच्चांकी गाळप झाल्यास त्याप्रमाणे ऊस भाव दिला जाईल, असे सांगून नागवडे पुढे म्हणाले की निवडणूक प्राधिकरणाच्या निर्णयानुसार 50 लाख रुपये निवडणूक खर्च पडला. त्यामुळे संशय घेण्याचे कारण नाही. एन सीडी कडे 20 कोटीचे कर्ज सहा टक्के ने मागितले. त्यामध्ये जिल्हा बँकेने 9 ते 12 टक्क्याने कर्ज देण्याची तयारी ठेवली. डिस्टिलरी साठी 98 कोटीचे कर्ज मागणी केली. आपल्या कारखान्याकडे 90 कोटीचे फक्त कर्ज आहे. काहीजण चुकीचे कर्ज दर्शवतात सभासदांमध्ये संभ्रमाचे वातावरण तयार करतात. संस्थेविषयी बाधक वातावरण तयार करतात. अशा सभासदांवर सहकार अधिनियम कायदा 35 नुसार सर्वसाधारण सभेत सभासदत्व रद्द करण्याची तरतूद आहे. तो देखील ठराव मंजुरीसाठी ठेवला आहे. असे सांगून नागवडे पुढे म्हणाले की, साखर कामगारांना शासनाच्या नियमानुसार 8.33% बोनस द्यावा लागतो. तर कार्यकारी संचालकांना देखील शासनाच्या नियमानुसार मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यात गैर काय? असे सांगून ते आणखी पुढे म्हणाले की, सहकार महर्षी बापूंनी सभासद हित डोळ्यासमोर ठेवले त्यांचीच प्रेरणा डोळ्यासमोर ठेवून नागवडे कारखान्याचा कारभार संचालक मंडळ पाहत आहे. ऊस उत्पादक शेतकरी आधुनिक पद्धतीने व शेती करत नाहीत, त्यामुळे उसाची रिकवरी देखील घसरलेली दिसते. घोडच्या आवर्तना संदर्भात बोलताना नागवडे आणखी पुढे म्हणाले की, शेतकरी वेळेत पाणी वापर संस्थांची पाणीपट्टी भरत नाही. वेळेत पाणी फॉर्म भरत नाही, त्यामुळे आवर्तन सुद्धा लांबले जाते. एकमेव वांगदरी पाणी वापर संस्था शंभर टक्के पाणीपट्टी भरते. अशी स्थिती आहे. तालुक्यात 17 ते 25 लाख मॅट्रिक टन ऊस तयार होत आहे. तालुक्यातील एका कारखान्याने दहा वर्षात ऊस उत्पादकांना 100 कोटी कमी दिले. तिथे मात्र कोणी बोलत नाही. ऊस भावाबाबत नागवडे कारखाना कदापिही मागे राहणार नाही. दोन वर्षामध्ये मोलिसिसच्या टाक्या फुटल्यामुळे 52% डिस्टिलरी चालली. असे सांगून नागवडे आणखी पुढे म्हणाले की, कारखान्याचा कारभार अत्यंत काटकसरीने केला जात आहे. पाणी प्रश्नाबाबत बोलताना ते म्हणाले की, कुकडीचे पाणी ओढ्या नाल्यांमध्ये जात आहे तेच पाणी जर घोड मध्ये सोडले असते तर आंदोलन करण्याची वेळ येऊन ठेपली नसती. असे सांगून अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी सभासदांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना समर्पक अशी उत्तरे दिली. यावेळी बी आर एस चे नेते घनश्याम शेलार बोलताना म्हणाले की सभासदांनी नेहमी संस्थेच्या हितासाठी बोलावं. संचालक मंडळाने देखील अभ्यासपूर्ण अंमलबजावणी करावी व संस्थेचे हित जोपासावे आपलीच मातृ संस्था समजून सभासदांनी देखील आपल्याच कारखान्याला ऊस द्यावा, असे सांगून शेलार पुढे म्हणाले की, घोड खालील शेतकरी सदन आहे. शेतकरी मोठ्या संकटात आहे. पाऊस नाही पडला तर गंभीर स्थिती निर्माण होऊ शकते. यासाठी सर्वांना आता एकत्रित लढा द्यावा लागेल असे सांगितले.

अॅड विठ्ठलराव काकडे यावेळी बोलताना म्हणाले की, सहकार महर्षी बापूंनी या तालुक्याच्या हितासाठी प्रथम घोड पाण्यासाठी संघर्ष केला. तालुक्याला पाणी मिळून दिले. त्यानंतर शेतकऱ्यांना कष्टाचे धाम मिळावे, यासाठी खाजगी कारखाना सहकारी तत्त्वावर उभा केला. त्यामुळे सर्वांचीच प्रगती झाली. ही कामधेन जोपासण्याची आम सभासदांची जबाबदारी आहे. पावसाअभावी पाणी प्रश्न तालुक्यात गंभीर बनला आहे. आवर्तन सुटले तरच शेतकरी आणि साखर कारखानदारी वाचणार आहे. त्यामुळे कुकडी बरोबर घोडला देखील एका आवर्तनची नितांत गरज आहे. उपलब्ध पाण्यातून एक आवर्तन घोड ला मिळू शकते. त्यासाठी सर्वांनीच आता संघटित होण्याची वेळ आहे. असे सांगितले.

यावेळी केशवराव मगर, बाबासाहेब इथापे, भाऊसाहेब मांडे, संदीप नागवडे, त्रिंबक मुठाळ, सुदाम कुठे, हनुमंत झिटे, श्रीपाद खिस्ती, राजेंद्र भोस, किरण नागवडे, उत्तमराव नागवडे, साहेबराव जाधव, अॅड बापूसाहेब भोस आदींसह जवळपास 30 सभासदांनी चर्चेत भाग घेऊन मौलिक सूचना मांडल्या.

या सभेस कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस, दीपक शेठ नागवडे, घनश्याम शेलार, जिजाबापू शिंदे, कैलासराव पाचपुते, केशवराव मगर, प्रेमराज भोईटे, विठ्ठल काकडे, बाबासाहेब इथापे ,धर्मनाथ काकडे, अरुणराव पाचपुते, टिळक भोस, स्मितल वाबळे, लक्ष्मणराव नलगे, गणपतराव काकडे, आदींसह कारखान्याचे आजी माजी संचालक विविध संस्थांचे पदाधिकारी सभासद कामगार यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन नागवडे कारखान्याचे संचालक सुभाषराव शिंदे यांनी केले. आभार संचालक भाऊसाहेब नेटके यांनी मानले.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी