घोड कालव्याचे आवर्तन व कुकडी कालव्यातून विसापूर धरणात सोडण्याचा कालवा सल्लागार समितीचा निर्णय राजेंद्र दादा नागवडे यांची माहिती

By : Polticalface Team ,02-09-2023

घोड कालव्याचे आवर्तन व कुकडी कालव्यातून विसापूर धरणात सोडण्याचा कालवा सल्लागार समितीचा निर्णय            राजेंद्र दादा नागवडे यांची माहिती लिंपणगाव( प्रतिनिधी)- घोड कालव्याचे आवर्तन व कुकडी कालव्यातुन विसापूर धरणांत पाणी सोडण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत झाला असल्याची माहिती सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्रदादा नागवडे यांनी दिली.

पुणे येथे व्ही. व्ही.आय.पी. सर्किट हाऊस येथे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा. सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार बेनके पाटील, आमदार अशोकराव पवार, माजी मंत्री राम शिंदे, आमदार बबनराव पाचपुते, कालवा सल्लागार समितीचे सदस्य भगवानराव पाचपुते तसेच पुणे व अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या समवेत झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीस नागवडे यांनी स्वतः उपस्थित राहून श्रीगोंदा तालुक्यातील पाणी टंचाईची समस्या प्रकर्षाने मांडली. सदर बाबत सकारात्मक निर्णय घेवून उद्यापासुन घोड कालव्याचे २५ दिवसांकरीता आवर्तन सोडण्याचा तसेच कुकडी डाव्या कालव्यातून विसापूर धरणांत पाणी सोडण्याचा महत्वपुर्ण निर्णय झाला असल्याचे नागवडे यांनी सांगितले.

श्रीगोंदा तालुक्यात अद्याप पाऊस न झाल्यामुळे व गेली चार महिन्यांपासुन घोडचे आवर्तन न सुटल्यामुळे तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असुन त्याकरीता घोड कालव्याचे आवर्तन सोडणेकरीता दि. २३ ऑगस्ट रोजी तहसिल कार्यालय श्रीगोंदा येथे जन आंदोलन करणेत आले होते तर सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या दि. ३० ऑगस्ट रोजीच्या वार्षिक सभेत आवर्तन सोडणेकरीता सर्व सभासदांनी एकमुखी मागणी करुन मंत्री महोदयांना तशी विनंती करणेचा ठराव मंजूर केला होता. सदरची परिस्थीती कालवा सल्लागार समितीसमोर विषद करणेत आली. याबाबत सकारात्मक निर्णय होवून पाणी सोडण्याचा निर्णय झाला असल्याने लाभक्षेत्रातील पिकांना जीवदान मिळणार असल्यामुळे शेतकरी बांधवांच्या मनामध्ये समाधानाची भावना निर्माण झाली असल्याचे नागवडे यांनी सांगितले.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.