देशात आता काँग्रेस शिवाय पर्याय नाही माजी मंत्री बाळासाहेब थोरात,
2024 ला काँग्रेसच्या भावी आमदार अनुराधाताई नागवडे याच असतील -आमदार लहू कानडे
By : Polticalface Team ,05-09-2023
लिंपणगाव (प्रतिनिधी)- देशात आता काँग्रेस शिवाय पर्याय नाही भाजप सरकारने नऊ वर्षात भुलभुलय्या राजकारण केले त्यातून जनतेची घोर निराशा झाली महागाईने जनता हैराण झाली. जनतेला ही चूक लक्षात आली. त्यामुळे आता देशात काँग्रेस शिवाय पर्याय नाही, असे मत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी हिरडगाव येथे आयोजित जनसंवाद यात्रेच्या शुभारंभ प्रसंगी बोलताना केले.
जिल्ह्यात काँग्रेस पक्षाने जनसंवाद यात्रेचे आयोजन केले प्रथम नगर येथे तर सायंकाळी पाच वाजता श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव येथे जनसंवाद यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे होते.
यावेळी मार्गदर्शन करताना माजी मंत्री थोरात पुढे म्हणाले की हिरडगाव येथे जनसंवाद यात्रेची सभा कायम स्मरणात राहील. काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत दरेकर यांनी व जिल्हाध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे यांनी या संवाद यात्रेचे सुंदर नियोजन केले. देशाच्या विकासात काँग्रेस पक्षाचे मोठे बलिदान आहे. पंडित नेहरू यांना दहा वर्षे तुरुंगवास भोगाव लागला. परंतु ते डगमगले नाहीत देशाच्या जडणघडणीत काँग्रेसच्या थोर नेत्यांचे योगदान लाभले. गेल्या नऊ वर्षापासून देशात भाजपचे सरकार आहे. हुकूमशाहीने राज्यकारभार करून एखाद्या पक्षाने विरोध केला तर त्याला ईडीचा धाक दाखवला जातो. असे सांगून ते आणखी पुढे म्हणाले की राष्ट्रवादीचे काही नेते जनतेच्या हितासाठी नव्हे तर स्वतःच्या हितासाठी सरकारमध्ये सामील झाले. हे राज्यातील जनतेने पाहिले. असे सांगून आमदार थोरात पुढे म्हणाले की, श्रीगोंदाच्या जडणघडणीत स्वर्गीय शिवाजीराव नागवडे बापू यांनी मोठे योगदान दिले. काँग्रेस पक्षाचे विचारधारा यांच्यामध्ये होती म्हणूनच त्यांनी तालुक्याच्या या दुष्काळी भागात नंदनवन करत सहकार, सिंचन, शिक्षण क्षेत्रात बापूंनी नेत्र दीपक काम केले. त्यांचाच वारसा राजेंद्र दादा नागवडे व अनुराधाताई नागवडे ह्या सक्षमपणे चालवत आहेत. 2024 ला राज्यातच नव्हे तर देशात देखील काँग्रेसचे सरकार येणार आहे. त्यामध्ये पुढील आमदार ह्या काँग्रेस पक्षाचे अनुराधाताई नागवडे ह्याच असतील असे सांगत तालुक्यातील आम जनतेने देखील नागवडे कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे निश्चितपणे तालुक्यात काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून उज्वल भविष्य मिळवून देऊ अशी ग्वाही थोरात यांनी यावेळी दिली
यावेळी मार्गदर्शन करताना श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे म्हणाले की श्रीगोंदा तालुक्यात गटविकास अधिकारी म्हणून आपण काम पाहिले. हा तालुका सुज्ञ आहे. या तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यामध्ये सहकार महर्षी बापूंचा मोठा वाटा आहे. सर्व क्षेत्रात बापूंनी नेत्र दीपक काम केले. त्यांच्याच संस्कृतीत वाढलेले राजेंद्र दादा नागवडे व अनुराधाताई नागवडे हे दोघेही अभ्यासू आहेत. तालुक्याला काय हवे आहे? ते जाणतात. आंदोलन करून काही होईना परंतु विज पाण्याचा प्रश्न ते मार्गी लावला. त्यामध्ये काँग्रेस पक्षाला आता पुन्हा उज्वल भविष्य आहे. विकासाच्या बळावर 2024 ला अनुराधाताई नागवडे ह्याच आमदार असतील. असे सांगत काँग्रेसचा जनसंवाद यात्रेचा शुभारंभ आणि पावसाचे जोरदार आगमन हा योगायोग निश्चितपणे सर्वांना आनंददायी आहे. असे सांगून भाजप सरकारवर आमदार कानडे यांनी सडकून टीका केली.
महिला काँग्रेस जिल्हा अध्यक्षा सौ अनुराधाताई नागवडे यांनी केंद्रातील व राज्यातील भाजप सरकारवर चौफेर टीका करत त्या म्हणाल्या की मराठा समाजाच्या प्रश्नाकडे केंद्र व राज्य सरकार गांभीर्याने पाहत नाही. याउलट सत्तेच्या बळावर आंदोलकांवर लाठी चार्ज करून सत्तेचा दुरुपयोग केला आहे. भाजप मुक्त करण्यासाठी आता सर्वांना एकसंघ राहावे लागेल. काँग्रेसचा दुसऱ्या राज्यात भूगोल आहे, परंतु महाराष्ट्राला इतिहास लाभला आहे. भाजप सरकारच्या काळात महागाईने उच्चांक केला. त्यामुळे सर्वसामान्य जनता हैराण झाले आहे. असे सांगत सौ नागवडे यांनी अनेक मुद्दे उपस्थित करत केंद्र व राज्य सरकारवर चौफेर टीका केली.
आपल्या अध्यक्षीय भाषणात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे यावेळी म्हणाले की ,देशात कुठेतरी बदल हवा म्हणून जनतेने भाजपला पसंती दिली परंतु सत्तेवर येताच या सरकारला जनतेच्या प्रश्नांवर विसर पडला. सत्ता काबीज करताच भाजप सरकारने अनेक घोषणा केल्या परंतु त्याची अंमलबजावणी न करता या उलट महागाई वाढवली. गतिमान सरकार हा डांगोरा पिटला. या सरकारच्या कालावधीत कोणत्याच शेतीमालाला भाव नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे त्याबरोबरच बेरोजगारांना काम नाही. देशात अनेक महिला बेपत्ता आहेत. त्यांचा शोध लागला जात नाही. मराठा व धनगर समाजाच्या आरक्षणावर भूमिका स्पष्ट नाही. असे सांगून ते पुढे म्हणाले की, या देशात हुकूमशाही सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबवल्या जातात. काँग्रेसच्या काळात मात्र अनेक धोरणात्मक निर्णय झाले. सर्वसामान्य शेतकरी सुरक्षित होता. यापुढे 2024 ला देशात व राज्यात काँग्रेस पक्षाला उज्वल भविष्य असून, काँग्रेसचे नेते राहुल गांधी व राज्यात माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे हात बळकट करण्यासाठी आपण सर्वांनी साथ द्यावी असे आवाहन जिल्हाध्यक्ष नागवडे यांनी केले.
या कार्यक्रमास काँग्रेसचे जिल्हा समन्वय क ज्ञानदेव वाफारे, नागवडे कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस, जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष स्मितल वाबळे प्रशांत ओगले, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष धर्मनाथ काकडे, नगराध्यक्ष शुभांगी पोटे, मनोहर पोटे, अंबादास दरेकर, योगेश भोईटे, मच्छिंद्र सुपेकर, राकेश पाचपुते, सतीश मखरे, प्रेमराज भोईटे, स्वाती दरोडे आदींसह मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
प्रस्ताविक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत दरेकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा शंकर गवते यांनी तर आभार तालुका काँग्रेसचे अध्यक्ष धर्मनाथ काकडे यांनी मानले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
के पी जाधव हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज चिंभळे बारावीच्या परीक्षा केंद्रावर संपूर्ण परीक्षा सुरळीत संपन्न
श्री व्यंकनाथ विद्यालयाने शंभर दिवस विविध उपक्रमांचे विस्ताराधिकाऱ्यांकडून समाधान
काष्टी येथील परिक्रमा तंत्रनिकेतन महाविद्यालयाची यशोगाथा, 39 विद्यार्थ्यांची बजाज ऑटो लि.नामांकित कंपनीमध्ये निवड
काष्टी येथील परिक्रमा तंत्रनिकेतन महाविद्यालयाची यशोगाथा, 39 विद्यार्थ्यांची बजाज ऑटो लि.नामांकित कंपनीमध्ये निवड
23 व्या पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘गिरान’ची विशेष निवड
जबरी चोरीच्या उद्देशानेच आरोपी गेले होते. इतर कोणताही उद्देश नव्हता चोरांची कबुली. मा.पोलीस अधिक्षक पंकज देशमुख
सहजपुर गाडमोडीत कल्याण मटका जुगार जोरदार. अवैध धंदे चालवणाऱ्या महाठकांचा तत्काळ बंदोबस्त करा. नागरीकांची मागणी.
कडेठाण येथील लता बबन धावडे यांचा वन्य प्राण्यांच्या हल्लात मृत्यु झाला नाही. प्रादेशिक न्याय वैज्ञानिक प्रयोग शाळा नागपुर अहवाल प्राप्त. दगडाने ठेचुन जिवे ठार मारले.
दौंड तालुक्यातील मौजे भांडगाव येथील लक्ष्मी इन्टर प्रायजेस या कंपनीतील आगीमध्ये सुमारे ३५ लाख रूपयांचा माल जळून खाक.
पाटबंधारे विभागाच्या हद्दीत पत्रा शेड तयार करून १ लाख ५० हजार घेऊन विक्री. निराधार विधवा महिलेची फसवणूक.
मुळा मुठा कालवा पुलाच्या अपूर्ण बांधकामामुळे कासुर्डी नागरिकांना घालावा लागतोय दुरुन वळसा.
महाराजा जिवाजीराव शिंदे विद्यालयात 395 वी शिवजयंती उत्साहात साजरी
ग्रामपंचायत अधिकारी व सरपंच यांना शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी कारवाईची मागणी
मराठी चित्रपट लवेरिया थेट YouTube वर रिलीज; १४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग एमपीएससी परीक्षेत श्रीगोंद्यातील दोन सख्या बहिणींनी केले यश संपादन
नगर दौंड राष्ट्रीय महामार्गावरील नवीन वृक्ष लागवडीचे घोडे अडले कुठे? , पाच वर्षांनंतरही वनविभागाचे अधिकारी वृक्ष लागवडी बाबत अनभिज्ञ नंदकुमार कुरुमकर
भारतीय बौध्द महासभा कोरेगाव मूळ ग्रामशाखेच्या वतीने माता रमाई जयंती साजरी. समता सैनिक दलाची साप्ताहिक परेड संपन्न.
बिबट्याच्या दहशतीमुळे श्रीगोंदा तालुक्यातील जनतेला जंगलात राहिल्यासारखे वाटते
लिंपणगावच्या ग्रामविकास अधिकाऱ्याचा मनमानी कारभार चव्हाट्यावर! , ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या एकाधिकारशाही विरुद्ध आमरण उपोषण करणार- विजय ओहोळ
यवत पोलीस स्टेशन हद्दीतील जबरी चोरी व घरफोडी करणारी टोळी जेरबंद.१४ घरफोडी चोरीचे गुन्हे उघड. दोन आरोपी अटक